शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परळी औष्णिक विद्युत केंद्रातून विद्युत निर्मिती सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 16:49 IST

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी केंद्राच्या बंधाऱ्यात पोहोचणे सुरु

ठळक मुद्देबुधवारी रात्री संच ७ सुरु करण्यात आला

परळी (बीड ) :  येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या 250    मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक सात मधून वीज निर्मितीस बुधवारी रात्री 11.55 वाजता सुरूवात झाली. गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता 168 मेगावॅटची वीज निर्मिती झाली. या संचातुन 205 मेगावॅट पर्यंत वीज निर्मिती होत असून 250 मेगावॅट क्षमतेएवढी वीज निर्मिती संच क्रमांक 7 मधून  होईल असे सूत्रांनी सांगितले. 

यासोबतच 250 मेगावॅट संच क्रमांक 6 ही सुरू करण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत. संच क्रमांक 6 मधून दोन दिवसात वीज निर्मिती सुरू होऊ शकते असे सांगण्यात येते तर 250 मेगावॅटच्या संच क्रमांक 8 चे देखभालदुरुस्तीची काम  काढण्यात आले आहे. या तीन ही संचास  लागणारा दगडी कोळसा साठा 25  दिवस पुरेल एवढा येथील विद्युत केंद्रात शिल्लक आहे.

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून  पाणी दि.11 ऑगस्ट रोजी दुपारी येथील नवीन परळी औष्णिक  केंद्राच्या वीज  निर्मितीसाठी सोडण्यात आले. हे पाणी विद्युत केंद्राच्या  खडका (ता सोनपेठ) बंधाऱ्यात सोमवारपासून पोहचणे सुरू झाले आहे. मंगळवारी खडक्यातील पाणी परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या रो  वॉटर टॅंक मध्ये आले आणि संच क्रमांक 7 हा सुरू करण्यात आला. बुधवारी रात्री 11.55 वाजेला संचातून वीज निर्मितीस प्रारंभ झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथील वीज संच बंद ठेवल्याने वीजनिर्मिती ठप्प झाली होती. आता पुन्हा वीज निर्मितीस सुरुवात झाली आहे त्यामुळे परळीच्या बाजारपेठेत समाधान व्यक्त केले जात आहे. नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात 250 मेगावॅटचे 6,7,8 हे तीन संच असून याची एकूण क्षमता 750 मेगावॅट एवढी आहे.

टॅग्स :electricityवीजBeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरण