शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

निवडणूक पोरखेळ नाही, लोकप्रतिनिधी जबाबदारीने निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:53 IST

बीड : आपला लोकप्रतिनिधी निवडताना जबाबदारीने निवडावा. जयदत्त आण्णा हे विकासिप्रय नेतृत्व आहे. ही पोरखेळ असलेली निवडणूक नाही. आण्णा ...

ठळक मुद्देबाळासाहेब पिंगळे : जरूड, बाभुळखुंटा, मौजवाडीत ग्रामस्थांशी संवाद; विकासासाठी साथ देण्याचे जयदत्त क्षीरसागर यांचे आवाहन

बीड : आपला लोकप्रतिनिधी निवडताना जबाबदारीने निवडावा. जयदत्त आण्णा हे विकासिप्रय नेतृत्व आहे. ही पोरखेळ असलेली निवडणूक नाही. आण्णा हे अनुभवी व सक्षम असे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या रूपाने शिवसेनेचा अनुशेष भरून काढायचा आहे असे प्रतिपादन बाळासाहेब पिंगळे यांनी केले.नाळवंडी जिल्हा परिषद सर्कलमधील जरु ड, बाभूळखुंटा तसेच मौजवाडी येथे विधानसभा निवडणूक प्रचारासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी भेटी दिल्या. त्याप्रसंगी शिवेसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पिंगळे बोलत होते. यावेळी बैठकीस शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, गणपत डोईफोडे, विलास बडगे, अरूण डाके, नितीन धांडे, जगदीश काळे, अरूण बोंगाणे, राजेंद्र राऊत, बप्पासाहेब घुगे, झुंजार धांडे, सखाराम मस्के, गणेश वरेकर, रामनाथ काकडे, बबन कोरडे, शहादेव काकडे, पंजाब काकडे इत्यादींची उपस्थिती होती.बाभळखुंटा येथील बैठकीतही धनुष्यबाणाला मतदान हाच विकासाचा रामबाण उपाय आहे असा कार्यकर्त्यांचा सूर होता. मौज, मौजवाडी येथे प्रभाकर ढेमरे व सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी गणेश वरेकर म्हणाले की, नाळवंडी सर्कलमधून नंबर एकचे मताधिक्य शिवसेनेला होणार आहे. आण्णांना आपण एकमताने ताकद दिली तर शिवसेनेकडून सर्व आश्वासने पूर्ण होतील. मतदान मशीनवर पहिल्याच क्र मांकाचे चिन्ह धनुष्यबाण असल्याचे ते यावेळी म्हणाले.यावेळी दिनकर कदम यांच्या नेतृत्वाखाली डी.सी.सी. बँकेचे संचालक स्व.बन्सीधरराव सातपुते यांचे नातू शिवम सातपुते यांच्यासह पांडूरंग सातपुते, रामेश्वर जाधव, रवि डोंगरे, राजेश डोंगरे, शरद विटकर, सुरेश सातपुते, सदाशिव सातपुते, अशोक सातपुते, लक्ष्मण सातपुते, किशोर टेकाळे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.विरोधकांच्या प्रयोगाला बळी पडू नकाजयदत्त क्षीरसागर म्हणाले, गावागावात शासनाच्या योजना पोहोचवून त्याचा लाभ गावाला मिळवून देण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो. मतदारांनी दिलेला विश्वास पाच वर्ष निरंतर सेवा देऊन सार्थ करतो. तुमच्यासमोर जी कामे केली आहेत ती आपण पुढाकार घेऊन केलेली आहेत.केवळ आश्वासने दिलेली नाहीत. विरोधक रोटी-बोटी-चपटीचा प्रयोग करतील त्यांना आपण बळी पडू नका. केंद्रात जे सरकार आहे ते सरकार राज्यात येणार आहे त्यामुळे विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आपली साथ मला द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना