शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

निवडणूक पोरखेळ नाही, लोकप्रतिनिधी जबाबदारीने निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:53 IST

बीड : आपला लोकप्रतिनिधी निवडताना जबाबदारीने निवडावा. जयदत्त आण्णा हे विकासिप्रय नेतृत्व आहे. ही पोरखेळ असलेली निवडणूक नाही. आण्णा ...

ठळक मुद्देबाळासाहेब पिंगळे : जरूड, बाभुळखुंटा, मौजवाडीत ग्रामस्थांशी संवाद; विकासासाठी साथ देण्याचे जयदत्त क्षीरसागर यांचे आवाहन

बीड : आपला लोकप्रतिनिधी निवडताना जबाबदारीने निवडावा. जयदत्त आण्णा हे विकासिप्रय नेतृत्व आहे. ही पोरखेळ असलेली निवडणूक नाही. आण्णा हे अनुभवी व सक्षम असे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या रूपाने शिवसेनेचा अनुशेष भरून काढायचा आहे असे प्रतिपादन बाळासाहेब पिंगळे यांनी केले.नाळवंडी जिल्हा परिषद सर्कलमधील जरु ड, बाभूळखुंटा तसेच मौजवाडी येथे विधानसभा निवडणूक प्रचारासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी भेटी दिल्या. त्याप्रसंगी शिवेसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पिंगळे बोलत होते. यावेळी बैठकीस शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, गणपत डोईफोडे, विलास बडगे, अरूण डाके, नितीन धांडे, जगदीश काळे, अरूण बोंगाणे, राजेंद्र राऊत, बप्पासाहेब घुगे, झुंजार धांडे, सखाराम मस्के, गणेश वरेकर, रामनाथ काकडे, बबन कोरडे, शहादेव काकडे, पंजाब काकडे इत्यादींची उपस्थिती होती.बाभळखुंटा येथील बैठकीतही धनुष्यबाणाला मतदान हाच विकासाचा रामबाण उपाय आहे असा कार्यकर्त्यांचा सूर होता. मौज, मौजवाडी येथे प्रभाकर ढेमरे व सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी गणेश वरेकर म्हणाले की, नाळवंडी सर्कलमधून नंबर एकचे मताधिक्य शिवसेनेला होणार आहे. आण्णांना आपण एकमताने ताकद दिली तर शिवसेनेकडून सर्व आश्वासने पूर्ण होतील. मतदान मशीनवर पहिल्याच क्र मांकाचे चिन्ह धनुष्यबाण असल्याचे ते यावेळी म्हणाले.यावेळी दिनकर कदम यांच्या नेतृत्वाखाली डी.सी.सी. बँकेचे संचालक स्व.बन्सीधरराव सातपुते यांचे नातू शिवम सातपुते यांच्यासह पांडूरंग सातपुते, रामेश्वर जाधव, रवि डोंगरे, राजेश डोंगरे, शरद विटकर, सुरेश सातपुते, सदाशिव सातपुते, अशोक सातपुते, लक्ष्मण सातपुते, किशोर टेकाळे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.विरोधकांच्या प्रयोगाला बळी पडू नकाजयदत्त क्षीरसागर म्हणाले, गावागावात शासनाच्या योजना पोहोचवून त्याचा लाभ गावाला मिळवून देण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो. मतदारांनी दिलेला विश्वास पाच वर्ष निरंतर सेवा देऊन सार्थ करतो. तुमच्यासमोर जी कामे केली आहेत ती आपण पुढाकार घेऊन केलेली आहेत.केवळ आश्वासने दिलेली नाहीत. विरोधक रोटी-बोटी-चपटीचा प्रयोग करतील त्यांना आपण बळी पडू नका. केंद्रात जे सरकार आहे ते सरकार राज्यात येणार आहे त्यामुळे विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आपली साथ मला द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना