शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आठ दिवसांत २१ कावळे व तीन चिमण्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:30 IST

शिरूर कासार : तालुक्यात आठ दिवसांत २१ कावळे व तीन चिमण्यांचा मृत्यू झाला. यापैकी पाडळी येथील मृत पक्ष्यांचा ...

शिरूर कासार : तालुक्यात आठ दिवसांत २१ कावळे व तीन चिमण्यांचा मृत्यू झाला. यापैकी पाडळी येथील मृत पक्ष्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने पशुवैद्यकीय विभागाचे सर्व डाॅक्टर व कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी दिली.

कुक्कुटपालकांनी घाबरून न जाता वेळोवेळी पशुवैद्यकीय दवाखाना व डाॅक्टरांशी संपर्कात रहावे तसेच काळजीसुध्दा घेणे जरूरी आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे जरूरी आहे. त्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतीची मदत घेणे,कोंबड्यांचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहे,अहवाल आल्यानंतरच कोंबड्यामधे या रोगाचा संसर्ग झाला किंवा नाही हे स्पष्ट होईल,सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सतर्क राहण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. बर्ड फ्लू हा संसर्गजन्य असल्याने सर्वांनीच काळजी घेणे जरूरीचे आहे. पक्ष्यांमध्ये असाधारण मरतुक आढळून आल्यास त्याला न हाताळता त्याची अगदी शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावावी तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात रहावे, असे आवाहन डॉ. आघाव यांनी केले.

तालुक्यात कावळ्याबरोबर चिमण्यांचा मृत्यू झाला, मात्र आतापर्यंत कोंबडी मरतुक नसल्याचे सांगण्यात आले. १२ ते २० जानेवारीदरम्यान आठ दिवसांत पाडळी येथे २,जाटनांदूर १,पिंपळनेर १,राक्षसभुवन ५,तिंतरवणी १,शिरूर १,तर रायमोहा येथे ५ कावळे मृत पावले तर पिंपळनेर २ व घोगसपारगाव येथे १ चिमणी मृत पावल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातून १०६ कुक्कुट पक्ष्यांचे नमुने बुधवारी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.