शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट!
2
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
3
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
4
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
5
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
6
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
7
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
8
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
9
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
10
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
11
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
12
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
13
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
14
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
15
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
16
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
17
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
18
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
19
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोललो..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
20
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video

कोरोनाकाळात निराधार झालेल्या ७०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

अंबाजोगाई : कोरोनाच्या संसर्ग काळात अनाथ झालेल्या ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलण्याचा संकल्प भारतीय जैन संघटनेने केला आहे. ...

अंबाजोगाई : कोरोनाच्या संसर्ग काळात अनाथ झालेल्या ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलण्याचा संकल्प भारतीय जैन संघटनेने केला आहे. त्यादृष्टीने आई अथवा वडिलांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष धनराज सोळंकी यांनी दिली.

कोरोनाच्या संसर्गकाळात अनेक कुटुंबीयांवर मोठे आघात झाले. काही जण कोरोनामधून सुखरूप बाहेर पडले; परंतु काही जणांना मात्र आप्तस्वकीयांना गमवावे लागले. कोरोनामुळे आई किंवा वडिलांचे निधन झाल्याने अनेक बालके अनाथ झाली. त्यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच आधाराची गरज आहे. कुटुंबात निर्माण झालेल्या संकटामुळे हे विद्यार्थी सध्या मानसिक तणावाखाली आहेत. या तणावातून बाहेर काढून समाजाच्या प्रवाहात आणून आत्मविश्वास वाढवत त्यांना सक्षम करण्यासाठी भारतीय जैन संघटना प्रयत्न करणार आहे. या विद्यार्थ्यांना पुणे येथे निवास, भोजन तसेच शैक्षणिक सुविधा संघटनेच्या वतीने उपलब्ध केली जाणार असल्याचे धनराज सोळंकी यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय पदाधिकारी करणार यादी

याअंतर्गत संघटनेचे पदाधिकारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्या जिल्ह्यातील कोविडमुळे आई किंवा वडील अथवा आई आणि वडील असे दोन्ही छत्र हरपलेल्या पाचवी ते बारावीपर्यंत मराठी माध्यमाचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणार आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याची संमती पालकांकडून घेतली जाणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची याबाबत परवानगी घेतली जाईल.

तीस वर्षांपासून कार्य

भारतीय जैन संघटना भागील ३० वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीच्या क्षेत्रात कार्य करीत आहे. मार्च २०२० पासून मोबाइल डिस्पेंसरी सेवा, मिशन झिरो प्लाज्मा डोनर्स जीवनदाता योजना, रक्तदान चळवळ, सेरो सव्हॅलन्स, कोविड केअर सेंटर, मिशन लसीकरण, मिशन ऑक्सिजन बँक आदी उपक्रम संघटनेने राबविले आहेत.

यापूर्वी भारतीय जैन संघटनेने लातूर भूकंपातील १२००, मेळघाट व ठाण्यातील १ हजार १०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० मुले अशा ३ हजार विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचे काम केले आहे.