शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पेरणीदरम्यान शेतकऱ्यांनी चतु:सूत्रीचा अवलंब करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात मागील खरीप हंगामात जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. यावर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात मागील खरीप हंगामात जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. यावर्षी देखील विक्रमी पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात आहे. दरम्यान सोयाबीन पेरणी करत असताना चतु:सूत्रीची अंमलबजावणी शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

सोयाबीन पेरणी करण्यासाठी शक्यतो शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे वापरावे तसेच सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी करावी, पेरणी करण्यापूर्वी बियाणास बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, पेरणी करताना बी.बी.एफ म्हणजे रुंद सरी वरंबा या पद्धतीने पेरणी करावी जेणेकरून उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकेल, या चतु:सूत्रीचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यासंदर्भात बीड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्व गावांमध्ये जनजागृती देखील करण्यात येत आहे.

सोयाबीन लगावडीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणीकरिता कृषी सहाय्यकामार्फत विविध गावांमध्ये उगवणक्षमता तपासणी पीक प्रात्यक्षिके घेण्यात येत असून, त्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. उगवण क्षमता तपासणी जर ७० टक्के येत असेल तर ७५ किलो प्रति हेक्टर सोयाबीन बियाणांचा वापर करावा. जर उगवण क्षमता कमी असेल तर प्रति एक टक्के याला अर्धा किलो बियाणे अशा प्रमाणात बियाणे वाढवावे. जर उगवण क्षमता ६० टक्के पेक्षा कमी असेल तर अशा पद्धतीच बियाणे शक्यतो वापरू नये. त्याचबरोबर बियाणास जिवाणूसंवर्धक व तसेच रासायनिक कीटकनाशक याची बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. जेणेकरून पेरणी झाल्यानंतर असे पीक कीड व रोगास कमी प्रमाणात बळी पडते. जिवाणूसंवर्धकामुळे पिकाची जोमदार वाढ होते. लागवड करताना रुंद सरी, वरंबा पद्धतीने लागवड करावी. जेणेकरून पिकाची वाढही चांगल्या पद्धतीने होते. जास्तीत जास्त ओलावा पिकाच्या मुळांमध्ये धरुन ठेवला जातो. याचा फायदा उत्पन्न वाढीमध्ये होतो. चतु:सूत्रीचा वापर करून सोयाबीन पिकाची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

सोयाबीन पेरणी करत असताना शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरावे, तसाच वरील चतुसूत्रीचा अवलंब करून, उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत करावे. या कामासाठी गावातील संबंधित कृषी सहाय्याकाची मदत शेतकऱ्यांनी घ्यावे. तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

-बी.आर गंडे, तालुका कृषी अधिकारी, बीड.

===Photopath===

280421\034728_2_bed_9_28042021_14.jpg

===Caption===

सोयाबीन