शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

लॉकडाऊन काळात प्रशासनावर ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:34 IST

बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आजपासून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात विविध ठिकाणी ...

बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आजपासून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात विविध ठिकाणी सेवा देणे अत्यावश्यक असते, यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. तर, यामुळे प्रशासनावरील ताणदेखील वाढला आहे.

बीड जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी पोलीस, महसूल व जि.प.चे कर्मचारी कार्यरत असणार आहेत. त्या ठिकाणी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. तर, बाहेर जाणाऱ्यांना देखील प्रशासनाची परवानगी असणे बंधनकारक आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जणार आहे. लॉकडाऊनच्या संदर्भात जनजागृती देखील केली जाणार आहे. या काळात परवानगी असणाऱ्यांची कागदपत्रे तपासून त्यांना सूट देण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर व विद्यार्थी तसेच शिक्षकांना देखील मुभा दिली आहे. लॉकडाऊनचे पालन नागरिकांनी करावे तसेच कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घरी बसून घ्यावी, तसेच आवश्यक असेल तरच बाहेर पडावे. असे ‌आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर, नागरिकांना मारहाण न करता, समजून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हाभरात पोलीस प्रशासनाकडून पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. तर, नाकाबंदीवर देखील चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन नागरिकांनी करावे, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

आर. राजा पोलीस अधीक्षक बीड

===Photopath===

250321\252_bed_21_25032021_14.jpg

===Caption===

चेकपोस्ट फोटो