शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:55 IST

तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकहीं खुशी कहीं गम : गेवराई तालुक्यामध्ये काही भागात पेरणीच नाही तर काही ठिकाणी ब-यापैकी स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती निर्माण झाली आहे. काही भागात अद्याप पेरणीच झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत, तर तालुक्यातील काही भागात बºयापैकी पाऊस असल्याने येथील परिस्थिती बरी आहे. कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.गेवराई तालुक्यातील शेतकरी गतवर्षी पावसाची अवकृपा, गारपीट, बोंडअळीने त्रस्त होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच मंजूर असलेल्या पीकविम्या यादीत अनेकांचे नावच नसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. पीककर्जाचे वाटपही संथगतीने सुरु आहे. त्यातच पावसानेही ओढ दिल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.तालुक्यातील सिरसदेवी, गढी, तळेवाडी, शिंदेवाडी, रांजणीसह परिसरात सोयाबीनबरोबरच अन्य पिकांच्या पेरण्या अद्याप बाकी आहेत. पाचेगाव, मादळमोहीसह परिसरात बºयापैकी पाऊस असल्याने पीक परिस्थिती चांगली आहे. उर्वरित भागात कपाशी, सोयाबीन, तूरसह अन्य पिकांची लागवड होऊनही पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे.हवामान खात्याचे अंदाजही खोटे ठरत असल्याने समाधानकारक पाऊस केव्हा पडेल अशी विचारणा शेतकºयांमधून होत आहे. पावसाअभावी पिकाची स्थिती नाजूक झाल्यामुळे काही शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देत आहेत. मात्र, कोरडवाहू शेतकºयांची मात्र मोठी पंचायत झाली आहे.सद्यस्थितीला पंढरपूर वारीसाठी अनेक दिंड्यांचे प्रस्थान होत आहे. पावसाअभावी तसेच पीकविमा - पीककर्ज मिळाले नसल्याने दिंडीत सहभागी होणाºया भविकांची संख्या कमी झाली आहे. अनुदानित सोयाबीन शेतकºयांना दुकानदाराकडून मिळत नसून कृषी विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. याबाबतही शेतकºयांच्या अनेक तक्रारी आहेत. याकडे संबंधित अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यात आतापर्यंत ८६.१ मिमी पाऊस नोंदला आहे. मागील वर्षी ५ जुलैपर्यंत ११९.३ मिमी पाऊस झाला होता. काही भागात पावसाने साथ दिली असलीतरी काही भागात मात्र शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.दुबार पेरणीसाठी अनुदान द्यातालुक्यात पावसाने दडी मारल्याने उगवलेले पीक जळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पावासाने हजेरी लावली तरीही पिकांची उगवण होणार नाही. त्यामुळे दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासनाने दुबार पेरणीसाठी अनुदान देण्याची मागणी गढी येथील शेतकरी शिवाजी संतराम ससाणे यांनी केली.तीव्र उन्हाने चिंता वाढलीसध्या तालुक्यात उन्हाची तीव्रता जाणवत आहे. पिके सुकू लागली असून, जनावरांच्या चाºयासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकरी हैराण झाले असल्याचे किनगाव येथील शेतकरी तुकाराम चाळक यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीBeedबीड