शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:55 IST

तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकहीं खुशी कहीं गम : गेवराई तालुक्यामध्ये काही भागात पेरणीच नाही तर काही ठिकाणी ब-यापैकी स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती निर्माण झाली आहे. काही भागात अद्याप पेरणीच झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत, तर तालुक्यातील काही भागात बºयापैकी पाऊस असल्याने येथील परिस्थिती बरी आहे. कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.गेवराई तालुक्यातील शेतकरी गतवर्षी पावसाची अवकृपा, गारपीट, बोंडअळीने त्रस्त होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच मंजूर असलेल्या पीकविम्या यादीत अनेकांचे नावच नसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. पीककर्जाचे वाटपही संथगतीने सुरु आहे. त्यातच पावसानेही ओढ दिल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.तालुक्यातील सिरसदेवी, गढी, तळेवाडी, शिंदेवाडी, रांजणीसह परिसरात सोयाबीनबरोबरच अन्य पिकांच्या पेरण्या अद्याप बाकी आहेत. पाचेगाव, मादळमोहीसह परिसरात बºयापैकी पाऊस असल्याने पीक परिस्थिती चांगली आहे. उर्वरित भागात कपाशी, सोयाबीन, तूरसह अन्य पिकांची लागवड होऊनही पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे.हवामान खात्याचे अंदाजही खोटे ठरत असल्याने समाधानकारक पाऊस केव्हा पडेल अशी विचारणा शेतकºयांमधून होत आहे. पावसाअभावी पिकाची स्थिती नाजूक झाल्यामुळे काही शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देत आहेत. मात्र, कोरडवाहू शेतकºयांची मात्र मोठी पंचायत झाली आहे.सद्यस्थितीला पंढरपूर वारीसाठी अनेक दिंड्यांचे प्रस्थान होत आहे. पावसाअभावी तसेच पीकविमा - पीककर्ज मिळाले नसल्याने दिंडीत सहभागी होणाºया भविकांची संख्या कमी झाली आहे. अनुदानित सोयाबीन शेतकºयांना दुकानदाराकडून मिळत नसून कृषी विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. याबाबतही शेतकºयांच्या अनेक तक्रारी आहेत. याकडे संबंधित अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यात आतापर्यंत ८६.१ मिमी पाऊस नोंदला आहे. मागील वर्षी ५ जुलैपर्यंत ११९.३ मिमी पाऊस झाला होता. काही भागात पावसाने साथ दिली असलीतरी काही भागात मात्र शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.दुबार पेरणीसाठी अनुदान द्यातालुक्यात पावसाने दडी मारल्याने उगवलेले पीक जळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पावासाने हजेरी लावली तरीही पिकांची उगवण होणार नाही. त्यामुळे दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासनाने दुबार पेरणीसाठी अनुदान देण्याची मागणी गढी येथील शेतकरी शिवाजी संतराम ससाणे यांनी केली.तीव्र उन्हाने चिंता वाढलीसध्या तालुक्यात उन्हाची तीव्रता जाणवत आहे. पिके सुकू लागली असून, जनावरांच्या चाºयासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकरी हैराण झाले असल्याचे किनगाव येथील शेतकरी तुकाराम चाळक यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीBeedबीड