शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:55 IST

तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकहीं खुशी कहीं गम : गेवराई तालुक्यामध्ये काही भागात पेरणीच नाही तर काही ठिकाणी ब-यापैकी स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती निर्माण झाली आहे. काही भागात अद्याप पेरणीच झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत, तर तालुक्यातील काही भागात बºयापैकी पाऊस असल्याने येथील परिस्थिती बरी आहे. कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.गेवराई तालुक्यातील शेतकरी गतवर्षी पावसाची अवकृपा, गारपीट, बोंडअळीने त्रस्त होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच मंजूर असलेल्या पीकविम्या यादीत अनेकांचे नावच नसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. पीककर्जाचे वाटपही संथगतीने सुरु आहे. त्यातच पावसानेही ओढ दिल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.तालुक्यातील सिरसदेवी, गढी, तळेवाडी, शिंदेवाडी, रांजणीसह परिसरात सोयाबीनबरोबरच अन्य पिकांच्या पेरण्या अद्याप बाकी आहेत. पाचेगाव, मादळमोहीसह परिसरात बºयापैकी पाऊस असल्याने पीक परिस्थिती चांगली आहे. उर्वरित भागात कपाशी, सोयाबीन, तूरसह अन्य पिकांची लागवड होऊनही पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे.हवामान खात्याचे अंदाजही खोटे ठरत असल्याने समाधानकारक पाऊस केव्हा पडेल अशी विचारणा शेतकºयांमधून होत आहे. पावसाअभावी पिकाची स्थिती नाजूक झाल्यामुळे काही शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देत आहेत. मात्र, कोरडवाहू शेतकºयांची मात्र मोठी पंचायत झाली आहे.सद्यस्थितीला पंढरपूर वारीसाठी अनेक दिंड्यांचे प्रस्थान होत आहे. पावसाअभावी तसेच पीकविमा - पीककर्ज मिळाले नसल्याने दिंडीत सहभागी होणाºया भविकांची संख्या कमी झाली आहे. अनुदानित सोयाबीन शेतकºयांना दुकानदाराकडून मिळत नसून कृषी विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. याबाबतही शेतकºयांच्या अनेक तक्रारी आहेत. याकडे संबंधित अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यात आतापर्यंत ८६.१ मिमी पाऊस नोंदला आहे. मागील वर्षी ५ जुलैपर्यंत ११९.३ मिमी पाऊस झाला होता. काही भागात पावसाने साथ दिली असलीतरी काही भागात मात्र शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.दुबार पेरणीसाठी अनुदान द्यातालुक्यात पावसाने दडी मारल्याने उगवलेले पीक जळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पावासाने हजेरी लावली तरीही पिकांची उगवण होणार नाही. त्यामुळे दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासनाने दुबार पेरणीसाठी अनुदान देण्याची मागणी गढी येथील शेतकरी शिवाजी संतराम ससाणे यांनी केली.तीव्र उन्हाने चिंता वाढलीसध्या तालुक्यात उन्हाची तीव्रता जाणवत आहे. पिके सुकू लागली असून, जनावरांच्या चाºयासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकरी हैराण झाले असल्याचे किनगाव येथील शेतकरी तुकाराम चाळक यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीBeedबीड