शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

नेकनूर परिसरात पाऊस नसल्याने पिकांनी टाकल्या माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST

विशाल शिंदे नेकनूर : पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये पडत असलेल्या महाभयंकर पावसामुळे नद्यांना मोठे पूर येत आहेत. एवढा पाऊस ...

विशाल शिंदे

नेकनूर : पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये पडत असलेल्या महाभयंकर पावसामुळे नद्यांना मोठे पूर येत आहेत. एवढा पाऊस पडत आहे की पाण्यामुळे लोक बेहाल झाले आहेत. त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे ; पण बीड जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

पाऊस पडत नसल्याने शेतकरी हताश होऊन बेहाल झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊन व मार्केट बंदमुळे शेतकऱ्यांचा शेतातील माल शेतातच राहिला. त्याला मार्केटमध्ये नेता आला नाही आले. लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले. नुकसान झालेले असतानाही पुन्हा नव्या जोमाने शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आता तरी गेल्या वर्षी झालेले नुकसान भरून काढू या आशेवर शेतकरी होता ; पण आज चक्क पावसाने पाठ फिरवली. गेल्या पंधरा दिवसांपासून नेकनूर व परिसरात पाऊस नसल्याने पिके कोमेजून गेली आहेत.

अजून पाच-सहा दिवस पाऊस नाही आला तर आलेली पिकेही जळून जातील की काय, याची भीती शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाऊस नसल्याने नद्या, तलाव, बंधारे, विहिरी अजून कोरडे ठणठणीत.

बीड जिल्ह्यातील नेकनूर परिसरात अजून पिकांना पुरेल इतका पाऊस पडला नाही. नद्या, तलाव, विहारी अजूनही कोरड्या आहेत.

पाऊस पडत नसल्याने नेकनूर भागात खूप कमी प्रमाणात पाऊस पडला असल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. अजून ५, ६ दिवस पाऊस नाही पडला तर पिके करपून जातील. अजून एकदा शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सरसकट पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

-अरविंद जाधव, सामाजिक कार्यकर्ते.