शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

ग्राहकांअभावी सुका मेव्याच्या बाजारपेठेचीच तब्येत रोडावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:52 IST

ग्राहकांतून पुरेशी मागणी नसल्याने काजु, बदामाचा हलवा तयार होत नसल्याने बाजारपेठ सुस्तावली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : थंडीच्या मोसमात सुका मेव्याला नेहमी मागणी असते. परंतू यंदा दिवाळीपासून बाजारात ग्राहकी थंडावलेली आहे. मागील चार महिन्यात भावही स्थिर आहेत. परंतू ग्राहकांतून पुरेशी मागणी नसल्याने काजु, बदामाचा हलवा तयार होत नसल्याने बाजारपेठ सुस्तावली आहे.थंडीच्या दिवसात पौष्टीक असलेल्या बदामाचा हलवा घरोघरी बनविला जातो. त्याचबरोबर इतर सुकामेव्यांचा या हलव्यात वापर केला जातो. दिवाळीपासून मागील दीड महिन्यात बाजारात मंदीचा प्रभाव आहे. मागील चारपाच महिन्यात सुका मेव्याच्या दरातही तेजी नसल्याने भाव स्थिर आहेत. असे असलेतरी यंदा विविध कारणांमुळे सुका मेव्याचा हलवा खाण्याची व त्यासाठी सुका मेवा खरेदी करण्याची मानसिकता घटल्याचे दिसत आहे. तर बाजारात चांगली मागणी येईल या आशेने मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी गुंतवणूक करीत सुका मेवा उपलब्ध केला आहे.दिवाळीपासून भाव उतरलेकिराणा बाजारात दिवाळीपासून तेल, साबुदाणा, पोहे, शेंगदाण्याचे भाव किलोमागे पाच रुपयांनी घसरलेले आहेत.दिवाळी नंतर भाव तेजीतसध्या मूग डाळ ८० रुपये, तूर, उडीद ७५ तर चणा व मसूर डाळीचे भाव ६५ रुपये किलो आहेत. दिवाळीनंतर मात्र डाळींच्या दरात तेजीचे वारे राहिले. सर्वच डाळींमध्ये किलोमागे दहा रुपयांनी तेजी आली. २६०० रुपये क्विंटल मिळणा-या गव्हाचे भाव २८०० रुपये आहेत. परिणामी यावर आधारित आटा, रवा आणि मैद्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाली आहे. पावसाअभावी खरीप व रबी हंगाम वाया गेल्याने बाजारपेठेत हा परिणाम दिसत आहे.किसमिस वधारलीमागील वर्षी द्राक्षांचे उत्पादन घटल्याने किसमिसच्या दरात किलोमागे १०० रुपये किलोने वधारले आहेत. अफगाण किसमिसचे भाव ४०० रुपये तर भारतीय किसमिसचे भाव ३०० रुपये किलो आहेत. बाजारात अपेक्षेनुसार ग्राहकी नसल्याचे व्यापा-यांनी सांगितले. सुकामेवा खरेदीसाठी अतिरिक्त तरतूद करावी लागते. ते नाही खाल्ले तर काही फरक पडत नाही, अशी मानसिकता सध्या दुष्काळजन्य स्थितीमुळे आहे. त्यात ग्रामीण ग्राहक नसल्यासारखेच आहे.

टॅग्स :Marketबाजारbusinessव्यवसायWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन