शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ढगाळ वातावरणामुळे बीड जिल्ह्यात तूर उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:13 IST

बीड : मागील चार दिवसांपासून थंडी गायब झाल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यातच रविवारी झालेल्या ...

बीड : मागील चार दिवसांपासून थंडी गायब झाल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यातच रविवारी झालेल्या तुरकळ सरींमुळे अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी साधी फवारणी केल्यास उत्पादनातील घट टाळता येणार आहे. दरम्यान, ज्वारीसाठी हे वातावरण फायद्याचे असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

चार दिवसांपासून थंडी नसल्यासारखीच आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत आहे. याचा बहरात आलेल्या तुरीला फटका बसेल की काय? याची चिंता शेतकºयांना लागली आहे. जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड झाली असून, दमदार पावसामुळे तुरीचे पीक जोमात आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव होतो. शेंगा पोखरणा-या या अळीमुळे पिकांना फटका बसू शकतो, त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. तुरीबरोबरच पालेभाज्यांच्या पिकांनाही फटका बसू शकतो. तसेच फळबागांनाही नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. विशेषत: तूर सोडल्यास कीड रोगाचा इतर रोगांना धोका नसल्याच कृषीक्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

तुरीची उंची वाढल्यामुळे फवारणीवेळी शेतकºयांनी काळजी घ्यावी, आवश्यक उपाय करावेत, फवारणीबाबत कृषी विभागाने मागील आठवड्यापासून पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. कमीत कमी औषधाची साधी फवारणी केल्यास अळीचा प्रादुर्भाव व उत्पादनातील घट देखील टाळता येईल, असे कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी व्ही.एन. मिसाळ म्हणाले.