शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

ढगाळ वातावरणामुळे बीड जिल्ह्यात तूर उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:13 IST

बीड : मागील चार दिवसांपासून थंडी गायब झाल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यातच रविवारी झालेल्या ...

बीड : मागील चार दिवसांपासून थंडी गायब झाल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यातच रविवारी झालेल्या तुरकळ सरींमुळे अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी साधी फवारणी केल्यास उत्पादनातील घट टाळता येणार आहे. दरम्यान, ज्वारीसाठी हे वातावरण फायद्याचे असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

चार दिवसांपासून थंडी नसल्यासारखीच आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत आहे. याचा बहरात आलेल्या तुरीला फटका बसेल की काय? याची चिंता शेतकºयांना लागली आहे. जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड झाली असून, दमदार पावसामुळे तुरीचे पीक जोमात आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव होतो. शेंगा पोखरणा-या या अळीमुळे पिकांना फटका बसू शकतो, त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. तुरीबरोबरच पालेभाज्यांच्या पिकांनाही फटका बसू शकतो. तसेच फळबागांनाही नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. विशेषत: तूर सोडल्यास कीड रोगाचा इतर रोगांना धोका नसल्याच कृषीक्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

तुरीची उंची वाढल्यामुळे फवारणीवेळी शेतकºयांनी काळजी घ्यावी, आवश्यक उपाय करावेत, फवारणीबाबत कृषी विभागाने मागील आठवड्यापासून पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. कमीत कमी औषधाची साधी फवारणी केल्यास अळीचा प्रादुर्भाव व उत्पादनातील घट देखील टाळता येईल, असे कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी व्ही.एन. मिसाळ म्हणाले.