शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

कर्मचा-यांच्या मनमानीमुळे जय महेशचा उतारा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:17 IST

पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याचे कर्मचारी ऊसतोड करण्यासाठी शेतक-यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. पैसे देणा-या शेतक-यांचा आठ महिन्याचाही ऊस गाळपासाठी घेऊन जात असल्याने जय महेश कारखान्याची रिकव्हरी जवळपास एक टक्क्यापर्यंत घटली आहे. यामुळे कारखान्याचे नुकसान होत असून शेतकºयांची पिळवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याचे कर्मचारी ऊसतोड करण्यासाठी शेतक-यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. पैसे देणा-या शेतक-यांचा आठ महिन्याचाही ऊस गाळपासाठी घेऊन जात असल्याने जय महेश कारखान्याची रिकव्हरी जवळपास एक टक्क्यापर्यंत घटली आहे. यामुळे कारखान्याचे नुकसान होत असून शेतकºयांची पिळवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या वर्षीचा ऊस गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात असतानाही कारखानदार मात्र बाहेरच्या क्षेत्रातील ऊस आणत असल्याने तालुक्यातील शेतकºयांचा ऊस अद्यापही फडातच उभा आहे. जय महेश कारखान्याने आतापर्यंत बाहेरच्या क्षेत्रातील ऊस गाळपासाठी आणल्याने क्षेत्रातील ऊस उभा असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उशीर होत असल्याने ऊस ऊत्पादक शेतकरी कारखानदाराच्या दारात चकरा मारत असून तोड देण्याची मागणी करीत आहेत.

शेतक-यांच्या या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी जय महेश कारखान्याचे कर्मचारी पुढे सरसावले आहेत. या संधीचा फायदा घेत अडचणीत सापडलेल्या शेतक-यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. जो शेतकरी कर्मचाºयांना पैसे देईल त्याचा जूनमध्ये लावलेला अडसाली उसाची तोड करण्यात येत आहे. ८ महिन्याचा ऊस गाळपासाठी येत असल्याने जय महेश कारखान्याची रिकव्हरी शेवटच्या टप्प्यात वाढण्याऐवजी घटायला सुरुवात झाली आहे.

आठ दिवसांपूर्वी कारखान्याची रिकव्हरी ११.३० एवढी होती. आर्थिक तडजोडीतून आठ महिन्याचा ऊस गाळपास आणत असल्याने साखर उतारा कमालीचा घटला आहे. सध्या उतारा १०.४० टक्क्यांपर्यंत आला आहे.

यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जय महेश कारखान्याच्या कर्मचा-यांकडून होणारी पिळवणूक थांबविण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे.

शेतक-याला भाव न मिळू देण्यासाठी डावशासनाच्या नियमाप्रमाणे शेतक-यांना एफ.आर.पी. प्रमाणे भाव देण्याचा नियम आहे. या नियमाप्रमाणे साडेनऊ टक्के पर्यंतच्या रिकव्हरी येणे बंधनकारक आहे. यापुढे जशी रिकव्हरी वाढेल तसा उसाचा भावही वाढवून द्यावा लागतो. रिकव्हरी वाढली तर जास्त पैसे द्यावे लागतील यामुळे कारखान्याच्या उपाध्यक्षाकडून जाणीवपूर्वक रिकव्हरी कमी आणत असल्याचे कारखान्याच्या कर्मचाºयाकडून नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले.