शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

आंदोलनामुळे बीडमध्ये आरोग्य सेवा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आधी बारा दिवस काम बंद आंदोलन, आश्वासनानंतर पंधरा दिवसांची प्रतीक्षा, त्यानंतर पुन्हा नऊ दिवस काम बंद आंदोलन करणा-या राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्ह्यातील ६०० कंत्राटी कर्मचारी नाशिक ते मुंबई लॉँगमार्चसाठी रवाना झाले. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.राष्टÑीय ग्रामीण अभियानांतर्गत जिल्ह्यात ६०० कंत्राटी कर्मचारी कार्यरत ...

ठळक मुद्देदोन वेळा काम बंद; नोटिसीचा परिणाम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आधी बारा दिवस काम बंद आंदोलन, आश्वासनानंतर पंधरा दिवसांची प्रतीक्षा, त्यानंतर पुन्हा नऊ दिवस काम बंद आंदोलन करणा-या राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्ह्यातील ६०० कंत्राटी कर्मचारी नाशिक ते मुंबई लॉँगमार्चसाठी रवाना झाले. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.

राष्टÑीय ग्रामीण अभियानांतर्गत जिल्ह्यात ६०० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय सेवेत सामावून घ्यावे, समान काम समान वेतन द्यावे तसेच अनुभवाच्या आधारे प्राधान्य द्यावे आदी मागण्यांसाठी या कर्मचाºयांचा लढा सुरु आहे. ११ एप्रिलपासून ६०० कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन पुकारले. जिल्हा परिषदेसमोर सलग १२ दिवस त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर आरोग्य संचालकांनी दहा दिवसांचा अवधी मागून बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या कालावधीत शासनाकडून बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे मागण्यांबाबत कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी ८ मेपासून या कर्मचा-यांनी पुन्हा काम बंद पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले.१६ मेपर्यंत सुरु राहिलेल्या या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्य संघटनेने पुकारलेल्या लॉँगमार्चसाठी ६०० कर्मचारी नाशिककडे रवाना झाले आहेत. १८ मेपासून नाशिक ते मुंबई लॉँगमार्च काढण्यात येणार आहे. २८ मेपर्यंत लॉँगमार्च मुंबईत पोहचणार असल्याचे कर्मचारी नेते आर. वाय. कुलकर्णी यांनी सांगितले.कर्मचाºयांचे आंदोलन सुरु असल्याने आरोग्य सेवेवर होणा-या परिणामामुळे एनआरएचएम समितीचे अध्यक्ष तथा जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिका-यांनी या कर्मचा-यांना ४८ दिवसांच्या आत कामावर हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. परंतु या नोटिसा आपल्यापर्यंत पोहोचल्याच नसल्याचे कर्मचा-यांनी सांगितले.जिल्हा, ग्रामीण रुग्णालयात गर्दीएनआरएचएम कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे आरोग्य सत्र सेवा बंद पडली आहे. ग्रामीण भागात प्रसूती इतर उपचार होत नसल्याने रुग्णांची उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढली आहे.

बाल आरोग्य सेवेवरही परिणामजिल्हा रुग्णालयात कमी वजनाच्या बाळांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) आहे. तेथे नियुक्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या सरकारी रुग्णालयातील स्थायी कर्मचा-यांना बोलविण्यात आले आहे. मात्र ते प्रशिक्षित नसल्याने ही उपचार सेवा थंडावली आहे.

‘आयुष्यमान भारत’ ला अडथळाभारत सरकारने जाहीर केलेल्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. यासाठी ३० मे पर्यंत नोंदणी करण्याचे निर्देश आहेत. मात्र या कामावर आशांनी बहिष्कार टाकल्यामुळे व कंत्राटी कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे ही नोंदणी वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नाही.