शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

पळीभर तेल स्वस्ताईचा लिटरभर वाजतोय ढोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

अनिल भंडारी बीड : आयात वाढल्याने तसेच आयात शुल्क कमी होणार असल्याने खाद्यतेल स्वस्त होणार असे वृत्त मागील काही ...

अनिल भंडारी

बीड : आयात वाढल्याने तसेच आयात शुल्क कमी होणार असल्याने खाद्यतेल स्वस्त होणार असे वृत्त मागील काही दिवसांत झळकल्यानंतर बाजारात खाद्यतेलांच्या दरात किरकोळ घसरण झाली असली तरी खूप मोठी स्वस्ताई झाल्याचा ढोल सगळीकडे बडविला जात आहे.

दैनंदिन जीवनात खाद्यतेल सर्वसामान्यांपासून ते श्रीमंत कुटुंबांपर्यंत सर्वांसाठी आवश्यक आहे. मागील वर्षी कोरोनाच्या काळात खाद्यतेलांचे दर तसे स्थिरच होते. मात्र त्यानंतर वाढती मागणी आणि परदेशात घटलेल्या उत्पादनामुळे खाद्यतेलांचे दर हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली. सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात वाढ झल्यानंतर ऑक्टोबरपासून खाद्यतेल दरवाढीचा आलेख १० महिन्यांपासून वाढताच राहिला. त्यामुळे महागडे तेल खरेदी करून दिवाळीचा सण साजरा करावा लागला. मात्र त्यानंतरही तेलाचे भाव चढतेच राहिले. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या निर्बंधांमुळे लग्नसोहळे, सप्ताह, सार्वजनिक कार्यक्रम होत नसल्याने मागणी घटत असतानाही तेलाचे भाव वाढत राहिल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहक अचंबित झाले. तेलाच्या भाववाढीचे चटके सामान्यांना बसत असल्याची ओरड झाल्यानंतर सरकारी धोरणात बदलाच्या हालचाली सुरू झाल्या. मागील आठवड्यापासून आयात वाढल्याने आणि आयात शुल्कात कपात होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. त्यामुळे खाद्यतेल खूप स्वस्त होणार असे स्वप्न दाखविणे सुरू झाले आहे. परंतु बाजाराचा कानोसा घेतला असता गेल्या दहा महिन्यांत दुपटीपर्यंत वाढत जाणाऱ्या तेलाचे भाव सध्या लिटरमागे दहा ते पंधरा रुपयांनी कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पळीभर स्वस्त झालेले खाद्यतेल लिटरभर स्वस्त झाल्याचा ढोल बडविणे सुरू आहे. घसरलेल्या या किमती कधी वाढतील याचा नेम नाही; त्यामुळे खाद्यतेलाची स्वस्ताई सर्वसामान्यांपासून अद्याप दूरच आहे.

---------------

सोयाबीन १४०

सूर्यफूल १६५

-----------

शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल

१) पारंपरिक व्यवसायासाठी तसेच घरात खाण्यासाठी आम्ही शेतात करडई, जवस, सूर्यफूलाचे पीक घेत होतो. मात्र काळाच्या ओघात हा व्यवसाय मागे पडत गेला. त्यामुळे मागील १५-२० वर्षांपासून तेलबियांचे उत्पादन घेणे बंद केले. आता पॅकबंद खाद्यतेलाचा वापर करतो.

- रामेश्वर देशमाने, बीड.

------------

२) आमच्याकडे तेलाचे घाणे होते. करडई, सूर्यफूल, शेंगदाण्याचे पीक घेत होतो. तसेच बाहेरहूनही खरेदी करीत होतो. मात्र तेलघाण्याच्या व्यवस्थापनावर वाढता खर्च आणि वाढलेल्या मजुरीमुळे आर्थिक गणित बिघडले. घाणे बंद पडले. आता बाजारातून तेल खरेदी करावे लागत आहे.

- बालाजी पवार, बीड.

---------------

आधीचे दर

पाम -१४५

सोयबीन -१६०

सूर्यफूल - १८५

शेंगदाणा -१८०

करडी -१९८

मोहरी -१२०

तीळ -१५०

-------

सध्याचे दर

पाम -१२५

सोयाबीन -१४०

सूर्यफूल - १६५

शेंगदाणा- १६५

करडी - २०८

मोहरी -१५०

तीळ १९०

---------------

ज्या पटीने वाढले तसे घटले नाही

नोव्हेंबरमध्ये सोयाबीन तेलाचा १५ लिटरचा डबा १६०० रुपयांना होता. तो २५०० रुपयांपर्यंत वाढला; तर सध्या २२५० वर स्थिरावला आहे. सूर्यफूल तेल १८०० रुपयांना डबा होता. तो २६०० पर्यंत झाला व आता २४०० वर थांबला आहे. ज्या पटीने खाद्यतेलाचे भाव वाढले, त्या पटीत मात्र घट झालेली नाही. करडी, मोहरी, तीळ तेलाच्या दरात मात्र वाढ झाल्याचे दिसत आहे.

-----------------

किचन बजेट कोलमडलेलेच

गतवर्षी मार्चमध्ये १४० रुपये किलो असलेले शेंगदाणा तेल मेमध्ये १८५ रुपयांपर्यंत पोहोचले. सूर्यफूल तेलाचे दर ११५ वरून १८५ पर्यंत तेजीत राहिले. १०० रुपये किलोचे सोयाबीन तेल १६० रुपयांवर पोहोचले; तर पामतेल ९५ वरून १४५ रुपये किलोपर्यंत झाले. खाद्यतेलाचा भडका उडाला. गेल्या काही दिवसांत कमी झालेले दर फार कमी नसल्याने व इतर वस्तूंचे दर चढते राहिल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडलेलेच आहे.

---------