शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

जीपमध्येच चालकाचा खून, वाघाळा शिवारात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:00 IST

तालुक्यातील कावळेचीवाडी-म्हातारगाव रोडवर वाघाळा शिवारात एका जीपमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्देपरळी तालुक्यातील कावळेचीवाडी-म्हातारगाव रोडवरील घटना

परळी : तालुक्यातील कावळेचीवाडी-म्हातारगाव रोडवर वाघाळा शिवारात एका जीपमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली.विजय सखाराम यमगर (वय ३० रा. दगडवाडी ता.परळी) असे मयताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या बाबत मिळालेली माहिती अशी आहे की, विजय यमगर हे स्वत:चे वाहन किरायाने चालवतात. सोमवारी जीप (क्र.एमएच २४ व्ही ५१४८)घेऊन ते अंबाजोगाईला गेले होते. रात्री तेथून परळीला भाडे घेऊन जाणार होते. मात्र, मंगळवारी सकाळी कावळेचीवाडी-म्हातारगाव रोडवर वाघाळा शिवारात त्यांच्याच जीपमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मानेवर आणि डोक्याजवळ तिक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून येत होते. ही जीप सोमवारी रात्रीपासून या ठिकाणी उभी होती. दरम्यान सकाळी नागरिकांनी गाडीत डोकावून पाहिले असता आतमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. चारचाकीमध्ये कोणीही नसताना आतमध्ये मृतदेह पाहून परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांनी याची माहिती प्रथम सिरसाळा पोलीस ठाण्यास दिल्याने पोनि श्रीकांत डोंगरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर संबंधित पोलीस ठाणे व वरिष्ठांना या घटनेची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पाहणी करुन पंचनामा करण्यात आला. परळी उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले. मयत विजय यांचे भाऊ नरेश सखाराम यमगर यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजय यमगर यांचा खून का झाला याचे कारण तपासानंतरच पुढे येणार आहे.पोनि प्रदीप त्रिभुवन हे तपास करत आहेत. विजय यमगर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. या घटनेचे धागेदोरे हाती लागतात का? यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.अर्ध्या तासात येतो, असे म्हणाले होते विजयसोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास विजय हे त्यांची किरायाची गाडी घेऊन जाणार होते. फिर्यादीत नमुद केल्याप्रमाणे भाऊ नरेश यांचे फोनवरून बोलणे झाले होते. यावेळी आपण परळीवरुन पेशंट आणण्यासाठी जात असल्याचे विजय यांनी सांगितले होते. लवकर ये उद्या पण भाडे आहे असे सांगितले होते.दरम्यान शेवटचा फोन झाला त्यावेळी दवाखान्याबाहेर आहे अर्ध्या तासात पोहचतो असे विजय म्हणाले होते. त्यानंतर उशीरापर्यंत फोन लावला परंतु फोन बंद होता. रात्रभर फोन करुन देखील फोन लागला नाही. सकाळी थेट सिरसाळा पोलीस ठाण्यातून खून झाल्याचा फोन आला.तपास पथके रवानाखूनाची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, परळी ग्रामीण ठाण्याचे पोनि प्रदीप त्रिभूवन व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरोडा प्रतिबंधक पथक प्रमुख गजानन जाधव यांच्या पथकानेही परळी ग्रामीण हद्दीत भेट देत तपासचक्रे फिरविली आहेत.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी