शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

निकृष्ट रस्त्याचे देयक अदा करू नये : वसंत मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:50 IST

बीड : राष्ट्रीय महामार्ग ५४८ ‘ब’ परळी-अंबाजोगाईला २०१७ साली केंद्र सरकारने निविदा काढून रस्त्याच्या कामाची संबंधित कंत्राटदाराला ...

बीड : राष्ट्रीय महामार्ग ५४८ ‘ब’ परळी-अंबाजोगाईला २०१७ साली केंद्र सरकारने निविदा काढून रस्त्याच्या कामाची संबंधित कंत्राटदाराला ऑर्डर देऊन काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु, महामार्ग दोन्ही बाजूने खोदल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच कामाचा निकृष्ट दर्जा व विहीत मुदतीत काम न झाल्यामुळे देयके अदा करू नयेत अशी तक्रार काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी भारत सरकार व राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीमुळे निविदा रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात आले. निकृष्ट दर्जाच्या कामाचे सर्व पुरावे संबंधित केंद्र व राज्य सरकारच्या रस्ते वाहतूक विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे जुने टेंडर रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात आले. त्यात १५३ कोटी वरून १३४ कोटी रुपयांचे काम १०० कोटी रुपये कमी दराने औरंगाबाद येथील एका खसगी कंपनीला मिळाले. जानेवारी २०२० ला कामाची सुरुवात झाली होती. मात्र, धिम्या गतीने काम सुरू असून, आतापर्यंत अनेक अपघात महामार्गावर झाले आहेत. त्यात मृत्यूदेखील झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी बीड यांनी कंत्राटदारावर मनुष्यवध गुन्हा दाखल करण्याची तंबीदेखील दिली होती. तसेच तक्रारीद्वारे निविदेच्या तरतुदीनुसार महामार्ग कामाच्या नियमाचे उल्लंघन होत आहे.

तक्रारीवरून दक्षता पथकामार्फत चौकशी करून सूचनाही देण्यात आल्या. परंतु, कामाच्या गुणवत्तेचा दर्जा खराब असून, निकृष्ट काम चालू आहे. कामाचा दर्जा सुधारणा होत नसल्यामुळे परळी अंबाजोगाई ५४८ ब रस्त्याचे कामाची देयके अदा करू नयेत अशी मागणी मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यावर १ जानेवारी २०२१ ला शासनाकडून संपूर्ण कामाच्या दर्जासंदर्भात चौकशी होऊन अहवाल सादर होईपर्यंत देयके अदा करू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तक्रारीमुळे जनतेच्या पैसा वाचला

नागरिकांनी भरलेल्या करातून विकासकामे केली जातात, महामार्गाच्या कामाची तक्रार दिल्यामुळे फेरनिविदा काढण्यात आल्या होत्या, या कामात जवळास ५० कोटी रुपये शासनाचे म्हणजेच जनतेचा पैसा वाचला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली.