शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

निकृष्ट रस्त्याचे देयक अदा करू नये : वसंत मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:50 IST

बीड : राष्ट्रीय महामार्ग ५४८ ‘ब’ परळी-अंबाजोगाईला २०१७ साली केंद्र सरकारने निविदा काढून रस्त्याच्या कामाची संबंधित कंत्राटदाराला ...

बीड : राष्ट्रीय महामार्ग ५४८ ‘ब’ परळी-अंबाजोगाईला २०१७ साली केंद्र सरकारने निविदा काढून रस्त्याच्या कामाची संबंधित कंत्राटदाराला ऑर्डर देऊन काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु, महामार्ग दोन्ही बाजूने खोदल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच कामाचा निकृष्ट दर्जा व विहीत मुदतीत काम न झाल्यामुळे देयके अदा करू नयेत अशी तक्रार काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी भारत सरकार व राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीमुळे निविदा रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात आले. निकृष्ट दर्जाच्या कामाचे सर्व पुरावे संबंधित केंद्र व राज्य सरकारच्या रस्ते वाहतूक विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे जुने टेंडर रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात आले. त्यात १५३ कोटी वरून १३४ कोटी रुपयांचे काम १०० कोटी रुपये कमी दराने औरंगाबाद येथील एका खसगी कंपनीला मिळाले. जानेवारी २०२० ला कामाची सुरुवात झाली होती. मात्र, धिम्या गतीने काम सुरू असून, आतापर्यंत अनेक अपघात महामार्गावर झाले आहेत. त्यात मृत्यूदेखील झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी बीड यांनी कंत्राटदारावर मनुष्यवध गुन्हा दाखल करण्याची तंबीदेखील दिली होती. तसेच तक्रारीद्वारे निविदेच्या तरतुदीनुसार महामार्ग कामाच्या नियमाचे उल्लंघन होत आहे.

तक्रारीवरून दक्षता पथकामार्फत चौकशी करून सूचनाही देण्यात आल्या. परंतु, कामाच्या गुणवत्तेचा दर्जा खराब असून, निकृष्ट काम चालू आहे. कामाचा दर्जा सुधारणा होत नसल्यामुळे परळी अंबाजोगाई ५४८ ब रस्त्याचे कामाची देयके अदा करू नयेत अशी मागणी मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यावर १ जानेवारी २०२१ ला शासनाकडून संपूर्ण कामाच्या दर्जासंदर्भात चौकशी होऊन अहवाल सादर होईपर्यंत देयके अदा करू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तक्रारीमुळे जनतेच्या पैसा वाचला

नागरिकांनी भरलेल्या करातून विकासकामे केली जातात, महामार्गाच्या कामाची तक्रार दिल्यामुळे फेरनिविदा काढण्यात आल्या होत्या, या कामात जवळास ५० कोटी रुपये शासनाचे म्हणजेच जनतेचा पैसा वाचला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली.