शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST

बीड : सध्या पावसाळ्याचे दिवस असून कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. वातावरणामध्ये दमटपणाही वाढला ...

बीड : सध्या पावसाळ्याचे दिवस असून कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. वातावरणामध्ये दमटपणाही वाढला आहे. यातच लॉकडाऊनचे निर्बंध सैल झाल्याने लहान-मोठी हॉटेल्स सुरू झाली आहेत. त्याचबरोबर रस्त्यांवर हातगाड्यांवर भजी, वडापाव, मिसळ, दाबेली, पोहे आदी अल्पाेपाहाराची दुकाने सुरू आहेत. गरमागरम भजे, पकोडे, वडा, मिसळभाजीचा खमंग सुगंध येताच मनाला आवर घालता येत नाही. मात्र पावसाळ्याच्या दिवसात आजार टाळण्यासाठी जिभेचे लाड कमीच असायला हवेत. त्याचबरोबर अनियंत्रित खाण्यावर मर्यादा घालण्याची गरज आहे. अति तेलकट, शिळे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होत आहे. परिणामी पोटांचे आजार वाढतात. पावसाळी हंगामात पचनक्रिया मंदावते व प्रतिकारशक्ती कमकुवत होते ती वाढविण्यासाठी आवश्यक तोच चांगला व शुद्ध आहार घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात हे खायला हवे

धान्याच्या विशेषत: साळीच्या लाह्या, दगडी पोहे, मुगाचे वरण मोड आलेली कडधान्ये, भाज्यांचे सूप,

आहारात गुळाचा वापरही महत्वाचा आहे. पचनास हलके व्यवस्थित शिजलेले ताजे गरम पदार्थ असलेला आहार महत्त्वाचा ठरेल.

गरम मसाला, हिंग, सुंठ, मिरी, जिरे, ओवा, लसणाचा वापर आहारात जास्त करण्याची गरज आहे.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

शेतातून थेट बाजारात आलेल्या पालेभाज्यांमध्ये माती, चिखल लागलेला असतो. त्यामुळे कच्च्या पालेभाज्या खाऊ नये. कमी शिजवलेले पदार्थ खाऊ नये.

पचनास अवघड असणारे पदार्थ खायचे टाळावे. जंक फूड, फास्टफूड, दही, थंड पदार्थ खाऊ नये.

उघड्यावरील पदार्थ, शिळे अन्न, टाळावे. तळलेल्या पदार्थांचे सेवन शक्यतो कमी करावे.

दूषित अथवा सार्वजनिक ठिकाणचे पाणी पिण्याचे टाळावे.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे म्हणजे रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. जंतुसंसर्ग, ताप, अतिसाराची लागण होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी बाहेरचे अन्नपदार्थ वातावरण संतुलित होईपर्यंत न खाल्लेले चांगले. स्वच्छ पाणी उकळून पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पचनाला हलक्या असणाऱ्या पदार्थांचे सेवन महत्त्वाचे ठरते.

उघड्यावरचे पदार्थ खाणे धोक्याचे

पावसाळा कालावधीत पचनक्रिया मंद असते. मात्र भूक वाढते. त्यामुळे आहाराच्या बाबतीत संयम राखावा. उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावे. असे पदार्थ टायफाईड, डायरियासारख्या विविध आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकतात. शरीराला पोषक असलेले हलके पदार्थ खाणे उत्तम ठरेल. - डॉ. नीलेश जगदाळे, बीड.