शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST

बीड : सध्या पावसाळ्याचे दिवस असून कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. वातावरणामध्ये दमटपणाही वाढला ...

बीड : सध्या पावसाळ्याचे दिवस असून कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. वातावरणामध्ये दमटपणाही वाढला आहे. यातच लॉकडाऊनचे निर्बंध सैल झाल्याने लहान-मोठी हॉटेल्स सुरू झाली आहेत. त्याचबरोबर रस्त्यांवर हातगाड्यांवर भजी, वडापाव, मिसळ, दाबेली, पोहे आदी अल्पाेपाहाराची दुकाने सुरू आहेत. गरमागरम भजे, पकोडे, वडा, मिसळभाजीचा खमंग सुगंध येताच मनाला आवर घालता येत नाही. मात्र पावसाळ्याच्या दिवसात आजार टाळण्यासाठी जिभेचे लाड कमीच असायला हवेत. त्याचबरोबर अनियंत्रित खाण्यावर मर्यादा घालण्याची गरज आहे. अति तेलकट, शिळे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होत आहे. परिणामी पोटांचे आजार वाढतात. पावसाळी हंगामात पचनक्रिया मंदावते व प्रतिकारशक्ती कमकुवत होते ती वाढविण्यासाठी आवश्यक तोच चांगला व शुद्ध आहार घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात हे खायला हवे

धान्याच्या विशेषत: साळीच्या लाह्या, दगडी पोहे, मुगाचे वरण मोड आलेली कडधान्ये, भाज्यांचे सूप,

आहारात गुळाचा वापरही महत्वाचा आहे. पचनास हलके व्यवस्थित शिजलेले ताजे गरम पदार्थ असलेला आहार महत्त्वाचा ठरेल.

गरम मसाला, हिंग, सुंठ, मिरी, जिरे, ओवा, लसणाचा वापर आहारात जास्त करण्याची गरज आहे.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

शेतातून थेट बाजारात आलेल्या पालेभाज्यांमध्ये माती, चिखल लागलेला असतो. त्यामुळे कच्च्या पालेभाज्या खाऊ नये. कमी शिजवलेले पदार्थ खाऊ नये.

पचनास अवघड असणारे पदार्थ खायचे टाळावे. जंक फूड, फास्टफूड, दही, थंड पदार्थ खाऊ नये.

उघड्यावरील पदार्थ, शिळे अन्न, टाळावे. तळलेल्या पदार्थांचे सेवन शक्यतो कमी करावे.

दूषित अथवा सार्वजनिक ठिकाणचे पाणी पिण्याचे टाळावे.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे म्हणजे रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. जंतुसंसर्ग, ताप, अतिसाराची लागण होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी बाहेरचे अन्नपदार्थ वातावरण संतुलित होईपर्यंत न खाल्लेले चांगले. स्वच्छ पाणी उकळून पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पचनाला हलक्या असणाऱ्या पदार्थांचे सेवन महत्त्वाचे ठरते.

उघड्यावरचे पदार्थ खाणे धोक्याचे

पावसाळा कालावधीत पचनक्रिया मंद असते. मात्र भूक वाढते. त्यामुळे आहाराच्या बाबतीत संयम राखावा. उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावे. असे पदार्थ टायफाईड, डायरियासारख्या विविध आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकतात. शरीराला पोषक असलेले हलके पदार्थ खाणे उत्तम ठरेल. - डॉ. नीलेश जगदाळे, बीड.