शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

खुर्ची सुटेना ! ५८ ते ६२ वयोगटातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पुन्हा मागवली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 12:41 IST

शासन निर्णयात १९३ अधिकाऱ्यांचा उल्लेख असतानाही आणि आरोग्य विभागात सर्व माहिती उपलब्ध असतानाही केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी ही चालढकल

- सोमनाथ खताळबीड : आरोग्य विभागातील सेवानिवृत्तीच्या वयवाढीला उच्च न्यायालयाने विरोध केला. याच निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले. असे असले तरी ठाण मांडून बसलेले बडे अधिकारी अद्यापही खुर्ची सोडायला तयार नाहीत. आरोग्य विभागाने सर्वच उपसंचालकांना पत्र काढून ५८ ते ६२ वयोगटातील अधिकाऱ्यांची माहिती मागवली आहे. शासन निर्णयात १९३ अधिकाऱ्यांचा उल्लेख असतानाही आणि आरोग्य विभागात सर्व माहिती उपलब्ध असतानाही केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी ही चालढकल केली जात असल्याचे साेमवारी उघड झाले आहे.

राज्यातील वैद्यकीय अधिकारी ते संचालकापर्यंतच्या काही बड्या अधिकाऱ्यांनी शासनाला वेगवेगळी कारणे सांगून आणि काेरोनाचे कारण पुढे करत सेवानिवृत्तीचे वय ५८वरून ६२पर्यंत वाढविले होते. याला बीडच्या सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने ही वय वाढ नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले होते. तरीही ठाण मांडलेल्या काही बड्या अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. येथेही त्यांना न्यायालयाने चपराक देत पहिला निर्णय कायम ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आपल्या नोकरीवर गदा आल्याचे चित्र त्यांना दिसू लागले. हाच धागा पकडून आता त्यांनी कागदी घोडे नाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आरोग्य विभागात वय वाढीच्या लोकांची यादी असतानाही मुख्य प्रशासकीय अधिकारी शैलेश पाटणकर यांनी सोमवारी पुन्हा एक पत्र काढून सर्वच उपसंचालकांकडून यादी मागवून घेतली आहे. यावरून केवळ वेळ वाया घालविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाने या सर्वांची माहिती मागवून घेण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ५८ वर्षांवरील सर्वांनाच कार्यमुक्त केले जात असल्याचा आदेश काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु, शासन आणि प्रशासन यांच्यातील मिलीभगत सोमवारच्या पत्रावरून दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

अगोदर कोरोना, आता ओमायक्रॉनचे कारण?३१ मे २०२१चा शासन निर्णय काढताना कोरोना महामारीचे कारण देऊन एक वर्षासाठी मुदतवाढ घेतली. आता ओमायक्रॉनचे कारण सांगून ठाण मांडण्याचा प्रयत्न बड्या अधिकाऱ्यांकडून होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी उच्च न्यायालयाचा अवमान करत शासनाने काही निर्णय घेतले होते. या प्रकरणात अवमान याचिकाही बीडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाखल केलेली आहे. आता शासन पुन्हा अवमान करणार की ठाण मांडून बसलेल्यांना खुर्चीवरून उठवून नवख्यांना संधी देणार, हे वेळच ठरविणार आहे.

अध्यक्ष बोलले, मंत्री, सचिवांचा संपर्क होईनायाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. आर. बी. पवार म्हणाले, यापूर्वी अवमान याचिका दाखल केलेली आहे. तसेच निवेदनही देणार आहोत. काही तांत्रिक मुद्यांमुळे उशीर होत असला, तरीही दोन दिवसात देऊ. आम्ही गप्प बसलेलो नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भ्रमणध्वणी घेतला नाही. स्वीय सहाय्यकांनी आपण सोबत नसल्याचे सांगितले. प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास व आयुक्त एन. रामास्वामी यांनी फोन उचलला नाही.

 

टॅग्स :Beedबीडdoctorडॉक्टरCourtन्यायालय