शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

पाणी पिताय ना, मग काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:40 IST

बीड : जिल्ह्यात सध्या अनेक गावांसह शहरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी आहेत. आपण पाणी पिताना काळजी ...

बीड : जिल्ह्यात सध्या अनेक गावांसह शहरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी आहेत. आपण पाणी पिताना काळजी घेणे आवश्यक आहे. दूषित पाणी पिल्याने विविध आजारांना निमंत्रण मिळते, यात मोठा त्रास होतो. त्यामुळे शुद्ध अथवा उकळून पाणी पिण्यावर अधिक भर द्यावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होतात. हे अनेकांना माहीत आहे. तरीही, लोक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे सध्या दूषित पाण्यामुळे झालेल्या आजारांचे रुग्ण जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागांतील सरकारी आरोग्य संस्थेत रुग्णांची गर्दी होत आहे. त्यांच्यावर उपचार केले जात असले, तरी नागरिकांनीच पाणी पिताना काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

--

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

दूषित पाणी पिल्याने टायफाॅइड, कॉलरा, डायरिया, डिसेंट्री यासह पोटाचे विविध आजार होण्याची दाट शक्यता आहे.

--

ही आहेत लक्षणे

संडास पातळ होणे, पोट दुखणे, उलटी, ताप, मळमळ, अंगदुखी, थकवा येणे, अशी लक्षणे दूषित पाणी पिल्यावर होतात.

--

पाणी उकळून प्यायलेले बरे

भांडे, पातेल्यात स्वच्छ दिसणारे पाणीही दूषित असू शकते. त्यामुळे पाणी पिताना उकळून पिलेले कधीही लाभदायक ठरते. यामुळे पाण्यातील विषाणू नष्ट होतात.

--

दूषित पाण्यामुळे पोटासह इतरही विविध आजार होतात. पाणी उकळून पिल्यास लाभ होतो. तसेच थोडीही लक्षणे जाणवली की, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अंगावर दुखणे काढणे अंगलट येऊ शकते. पाणी पिताना काळजी घ्यावी.

डॉ. महादेव चिंचाळे, वैद्यकीय अधीक्षक, गेवराई

080921\08_2_bed_1_08092021_14.jpeg

डॉ.महादेव चिंचाळे