शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही डॉक्टरांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तीन डॉक्टरांना जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. कोरोनाचा ...

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तीन डॉक्टरांना जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तिकडे होत असल्याने या डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या होत आहेत. अंबाजोगाईत रुग्णांची वाढती संख्या असतानाही डॉक्टरांच्या होणाऱ्या बदल्या अंबाजोगाईसाठी गैरसोयीच्या ठरणाऱ्या आहेत.

तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या २० दिवसांत ६०० पेक्षा जास्त रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात निघाले आहेत. येथील स्वा.रा.ती. रुग्णालयात अंबाजोगाईसह परळी, धारूर, केज, माजलगाव येथील रुग्णांची उपचाराची सोय याच रुग्णालयात आहे. अंबाजोगाईत असणारे कोविड रुग्णालय रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल झालेले आहे. याच रुग्णांना उपचारासाठी डॉक्टरांची मोठी कमतरता भासत आहे. अशा स्थितीत अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयातील नेत्र विभागाचे डॉ. एकनाथ शेळके, बधिरीकरण शास्त्र डॉ. प्रसाद सुळे, तर औषध वैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. सदानंद कांबळे या तिघांना जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. त्यांच्या प्रतिनियुक्तीसाठी जळगाव परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे कारण वैद्यकीय प्रशासनाने दिले आहे.

त्या डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करा

अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयातील डॉ. एकनाथ शेळके, डॉ. प्रसाद मुळे, डॉ. सदानंद कांबळे यांच्या जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर होणाऱ्या बदल्या रद्द कराव्यात, असे पत्र आ. नमिता मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना दिले आहे. अंबाजोागईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.

पुन्हा आंदोलनाची वेळ

यापूर्वीही ३४ डॉक्टरांच्या बदल्या मुंबई येथे करण्यात आल्या होत्या. त्याचा विपरित परिणाम आरोग्य सेवेवर झाला होता. त्यावेळी या डॉक्टरांच्या बदल्या रद्द करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी रुग्णालयाच्या दारात ठिय्या मांडून धरणे आंदोलन केल्याने त्या डॉक्टरांच्या बदल्या रद्द झाल्या होत्या. आता पुन्हा तीन डॉक्टरांच्या बदल्याचा प्रश्न पुढे आला आहे. या डॉक्टरंच्या प्रतिनियुक्तीमुळे रुग्णालयात रुग्णसेवेवर विपरित परिणाम होणार आहे.