शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही डॉक्टरांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तीन डॉक्टरांना जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. कोरोनाचा ...

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तीन डॉक्टरांना जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तिकडे होत असल्याने या डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या होत आहेत. अंबाजोगाईत रुग्णांची वाढती संख्या असतानाही डॉक्टरांच्या होणाऱ्या बदल्या अंबाजोगाईसाठी गैरसोयीच्या ठरणाऱ्या आहेत.

तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या २० दिवसांत ६०० पेक्षा जास्त रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात निघाले आहेत. येथील स्वा.रा.ती. रुग्णालयात अंबाजोगाईसह परळी, धारूर, केज, माजलगाव येथील रुग्णांची उपचाराची सोय याच रुग्णालयात आहे. अंबाजोगाईत असणारे कोविड रुग्णालय रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल झालेले आहे. याच रुग्णांना उपचारासाठी डॉक्टरांची मोठी कमतरता भासत आहे. अशा स्थितीत अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयातील नेत्र विभागाचे डॉ. एकनाथ शेळके, बधिरीकरण शास्त्र डॉ. प्रसाद सुळे, तर औषध वैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. सदानंद कांबळे या तिघांना जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. त्यांच्या प्रतिनियुक्तीसाठी जळगाव परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे कारण वैद्यकीय प्रशासनाने दिले आहे.

त्या डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करा

अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयातील डॉ. एकनाथ शेळके, डॉ. प्रसाद मुळे, डॉ. सदानंद कांबळे यांच्या जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर होणाऱ्या बदल्या रद्द कराव्यात, असे पत्र आ. नमिता मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना दिले आहे. अंबाजोागईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.

पुन्हा आंदोलनाची वेळ

यापूर्वीही ३४ डॉक्टरांच्या बदल्या मुंबई येथे करण्यात आल्या होत्या. त्याचा विपरित परिणाम आरोग्य सेवेवर झाला होता. त्यावेळी या डॉक्टरांच्या बदल्या रद्द करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी रुग्णालयाच्या दारात ठिय्या मांडून धरणे आंदोलन केल्याने त्या डॉक्टरांच्या बदल्या रद्द झाल्या होत्या. आता पुन्हा तीन डॉक्टरांच्या बदल्याचा प्रश्न पुढे आला आहे. या डॉक्टरंच्या प्रतिनियुक्तीमुळे रुग्णालयात रुग्णसेवेवर विपरित परिणाम होणार आहे.