शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

ऊसदर जाहीर केल्याशिवाय गळीत चालू करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 23:48 IST

जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या ऊस पट्यातील सर्वच सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी सन २०१९-२० च्या ऊसगळीत हंगामाची जोरदार तयारी केली आहे.

ठळक मुद्देकरपे : १७-१८,१८-१९ च्या ऊस गळीत हंगामातील १५ टक्के विलंब व्याज अदा करा

बीड : जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या ऊस पट्यातील सर्वच सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी सन २०१९-२० च्या ऊसगळीत हंगामाची जोरदार तयारी केली आहे. अद्याप कोणत्याही साखर कारखान्यांनी आपला ऊस दर निश्चित केला नाही.केंद्र शासनाच्या निर्धारित एफआरपी नुसार ऊस दर निश्चित केल्याशिवाय गळीत हंगाम चालू करू नये अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ऊस वाहतूक रोखून आक्र मक आंदोलन छेडतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, गेवराई तालुकाध्यक्ष राजेंद्र डाके पाटील, रेवकी सर्कल प्रमुख बळीराम शिंदे, पाचेगाव सर्कल प्रमुख उद्धव साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना २१ रोजी लेखी निवेदन देऊन दिला आहे.वास्तविक पाहता ऊसउत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी अधिक २०० रु . दर मिळणे आवश्यक असून ते अद्याप मराठवाड्यातील साखर कारखाने देण्यास सर्रास टाळतात. ऊसदर नियंत्रण अध्यादेश १९६६ प्रमाणे १४ दिवसांत संबंधित शेतकºयांना ऊसबिल बँक खात्यात जमा करावे लागते.विहित मुदतीत ऊसबिल न दिल्यास सदर कायद्यानुसार थकीत रकमेवर १५ टक्के विलंब व्याज द्यावे लागते. मात्र सदर कायद्याची पायमल्ली होत असल्याने याप्रकरणी कडक कायदेशीर कारवाई करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साखर आयुक्त, प्रादेशिक साखर संचालक, जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार निवेदन, आंदोलन करून विनंती केली आहे. मात्र याबाबतीत प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने साखर कारखानदारांवर कायद्याचा वचक बसत नाही परिणामी ऊस उत्पादक शेतक-यांचे कोट्यवधी रु पयांचे प्रचंड नुकसान होत आहे.हे थांबवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीडचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी २१ रोजी निवेदन देऊन २०१९-२० च्या ऊस गळीत हंगामासाठी बीड जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी केंद्र शासनाच्या निर्धारित एफआरपी नुसार ऊसदर निश्चित करूनच आपला गळीत हंगाम सुरू करावा अशी मागणी केली आहे. तसेच २०१७-१८, १८्-१९ मधील थकीत रकमेचे १५ टक्के विलंब व्याज संबंधित शेतक-यांना तात्काळ अदा न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ३० नोव्हेंबरनंतर संपूर्ण ऊस वाहतूक रोखून बीड जिल्ह्यात आक्र मक आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखाने