शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

धारूर तालुक्यात वणव्यात ३०० एकरातील झाडे भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:43 IST

धारुर तालुक्यातील कासारी, व्हरकटवाडी, मोटेवाडी या तीन गावच्या शिवारातील वनविभागाच्या मालकीच्या जंगलास आग लागून ३०० एकरच्या जवळपास क्षेत्रावरील झाडे जळून खाक झाले आहेत. तसेच जंगलालगतच्या शेतक-यांचे चार गोठे व सहा गंजी जळून खाक झाल्या. बारा तासानंतर या वणव्याची माहिती वन विभागाला मिळाली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याच्या संशयावरून वन विभागाने गुन्हा नोंद केला आहे. या आगीने बाजूच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधारुर : तालुक्यातील कासारी, व्हरकटवाडी, मोटेवाडी या तीन गावच्या शिवारातील वनविभागाच्या मालकीच्या जंगलास आग लागून ३०० एकरच्या जवळपास क्षेत्रावरील झाडे जळून खाक झाले आहेत. तसेच जंगलालगतच्या शेतक-यांचे चार गोठे व सहा गंजी जळून खाक झाल्या. बारा तासानंतर या वणव्याची माहिती वन विभागाला मिळाली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याच्या संशयावरून वन विभागाने गुन्हा नोंद केला आहे. या आगीने बाजूच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धारूर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत कासारी, व्हरकटवाडी, मोटेवाडी या तीन गावच्या शिवारात मोठया प्रमाणात बालाघाटाचा डोंगर आहे. या डोंगरात वनविभागाचे २ हजार एकरच्या जवळपास जंगल आहे. या जंगलात वनविभागाने लागवड केलेले व नैसर्गिकरीत्या वाढलेली शिसू, कडूनिंब, सीताफळ, बाभूळ, पळस, धामुडा, साग इ. झाडांसह रानससे, हरीण, खोकड, मोर इ. प्राणी व पक्ष्यांचा वावर आहे. या जंगलास सोमवारी दुपारी अचानक आग लागली.

या आगीत ३०० एकरच्या जवळपास वनक्षेत्र जळून खाक झाले. सोमवारी दुपारी लागलेली आग मंगळवारी दुपारपर्यंत सुरु होती. काही शेतकरी व वनविभागाच्या कर्मचाºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.वन जमिनीच्या लगत असलेल्या कासारी येथील सिद्राम सोनवणे, सय्यद मुस्ताफा यांच्यासह चार शेतक-यांच्या गोठ्यास आग लागून शेती साहित्य खाक झाले. तसेच भोगलवाडी, कासारी येथील शेतक-यांच्या कडब्याच्या सहा गंजी जळून खाक झाल्या आहेत.

आगीमुळे जंगलातील झाडांचे मोठे नुकसान झाले असून अनेक वन्य प्राण्यांचा जीव गेल्याचे सांगण्यात आले. आगीमुळे जंगलातील मोठमोठी झाडे नंतर वाळून जातात. वन विभागाने जाळरेषा न काढल्यामुळे जंगल मोठ्या प्रमाणात जळाले आहे. जंगल किती जळाले, याची निश्चित आकडेवारी काढण्यासाठी मंगळवारी दुपारपासून जीपीएस यंत्राद्वारे कर्मचारी मोजणी करीत आहेत. या प्रकरणी वन विभागाने कोणीतरी आग लावल्याचा संशय धरून अज्ञात व्यक्ती विरोधात वन विभागाच्या कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दोन दिवस आगीची महिती कळू दिली नाहीसोमवारी दुपारी एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक लागलेली आग मंगळवारी दुपारपर्यंत सुरूच होती. एवढी मोठी घटना असतानाही दोन दिवस याची कोणाला माहितीच होऊ दिली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या आगीमुळे झाडांचे आणि शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे.