शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

धारूर तालुक्यात वणव्यात ३०० एकरातील झाडे भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:43 IST

धारुर तालुक्यातील कासारी, व्हरकटवाडी, मोटेवाडी या तीन गावच्या शिवारातील वनविभागाच्या मालकीच्या जंगलास आग लागून ३०० एकरच्या जवळपास क्षेत्रावरील झाडे जळून खाक झाले आहेत. तसेच जंगलालगतच्या शेतक-यांचे चार गोठे व सहा गंजी जळून खाक झाल्या. बारा तासानंतर या वणव्याची माहिती वन विभागाला मिळाली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याच्या संशयावरून वन विभागाने गुन्हा नोंद केला आहे. या आगीने बाजूच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधारुर : तालुक्यातील कासारी, व्हरकटवाडी, मोटेवाडी या तीन गावच्या शिवारातील वनविभागाच्या मालकीच्या जंगलास आग लागून ३०० एकरच्या जवळपास क्षेत्रावरील झाडे जळून खाक झाले आहेत. तसेच जंगलालगतच्या शेतक-यांचे चार गोठे व सहा गंजी जळून खाक झाल्या. बारा तासानंतर या वणव्याची माहिती वन विभागाला मिळाली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याच्या संशयावरून वन विभागाने गुन्हा नोंद केला आहे. या आगीने बाजूच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धारूर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत कासारी, व्हरकटवाडी, मोटेवाडी या तीन गावच्या शिवारात मोठया प्रमाणात बालाघाटाचा डोंगर आहे. या डोंगरात वनविभागाचे २ हजार एकरच्या जवळपास जंगल आहे. या जंगलात वनविभागाने लागवड केलेले व नैसर्गिकरीत्या वाढलेली शिसू, कडूनिंब, सीताफळ, बाभूळ, पळस, धामुडा, साग इ. झाडांसह रानससे, हरीण, खोकड, मोर इ. प्राणी व पक्ष्यांचा वावर आहे. या जंगलास सोमवारी दुपारी अचानक आग लागली.

या आगीत ३०० एकरच्या जवळपास वनक्षेत्र जळून खाक झाले. सोमवारी दुपारी लागलेली आग मंगळवारी दुपारपर्यंत सुरु होती. काही शेतकरी व वनविभागाच्या कर्मचाºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.वन जमिनीच्या लगत असलेल्या कासारी येथील सिद्राम सोनवणे, सय्यद मुस्ताफा यांच्यासह चार शेतक-यांच्या गोठ्यास आग लागून शेती साहित्य खाक झाले. तसेच भोगलवाडी, कासारी येथील शेतक-यांच्या कडब्याच्या सहा गंजी जळून खाक झाल्या आहेत.

आगीमुळे जंगलातील झाडांचे मोठे नुकसान झाले असून अनेक वन्य प्राण्यांचा जीव गेल्याचे सांगण्यात आले. आगीमुळे जंगलातील मोठमोठी झाडे नंतर वाळून जातात. वन विभागाने जाळरेषा न काढल्यामुळे जंगल मोठ्या प्रमाणात जळाले आहे. जंगल किती जळाले, याची निश्चित आकडेवारी काढण्यासाठी मंगळवारी दुपारपासून जीपीएस यंत्राद्वारे कर्मचारी मोजणी करीत आहेत. या प्रकरणी वन विभागाने कोणीतरी आग लावल्याचा संशय धरून अज्ञात व्यक्ती विरोधात वन विभागाच्या कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दोन दिवस आगीची महिती कळू दिली नाहीसोमवारी दुपारी एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक लागलेली आग मंगळवारी दुपारपर्यंत सुरूच होती. एवढी मोठी घटना असतानाही दोन दिवस याची कोणाला माहितीच होऊ दिली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या आगीमुळे झाडांचे आणि शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे.