शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

धारूर तालुक्यात वणव्यात ३०० एकरातील झाडे भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:43 IST

धारुर तालुक्यातील कासारी, व्हरकटवाडी, मोटेवाडी या तीन गावच्या शिवारातील वनविभागाच्या मालकीच्या जंगलास आग लागून ३०० एकरच्या जवळपास क्षेत्रावरील झाडे जळून खाक झाले आहेत. तसेच जंगलालगतच्या शेतक-यांचे चार गोठे व सहा गंजी जळून खाक झाल्या. बारा तासानंतर या वणव्याची माहिती वन विभागाला मिळाली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याच्या संशयावरून वन विभागाने गुन्हा नोंद केला आहे. या आगीने बाजूच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधारुर : तालुक्यातील कासारी, व्हरकटवाडी, मोटेवाडी या तीन गावच्या शिवारातील वनविभागाच्या मालकीच्या जंगलास आग लागून ३०० एकरच्या जवळपास क्षेत्रावरील झाडे जळून खाक झाले आहेत. तसेच जंगलालगतच्या शेतक-यांचे चार गोठे व सहा गंजी जळून खाक झाल्या. बारा तासानंतर या वणव्याची माहिती वन विभागाला मिळाली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याच्या संशयावरून वन विभागाने गुन्हा नोंद केला आहे. या आगीने बाजूच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धारूर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत कासारी, व्हरकटवाडी, मोटेवाडी या तीन गावच्या शिवारात मोठया प्रमाणात बालाघाटाचा डोंगर आहे. या डोंगरात वनविभागाचे २ हजार एकरच्या जवळपास जंगल आहे. या जंगलात वनविभागाने लागवड केलेले व नैसर्गिकरीत्या वाढलेली शिसू, कडूनिंब, सीताफळ, बाभूळ, पळस, धामुडा, साग इ. झाडांसह रानससे, हरीण, खोकड, मोर इ. प्राणी व पक्ष्यांचा वावर आहे. या जंगलास सोमवारी दुपारी अचानक आग लागली.

या आगीत ३०० एकरच्या जवळपास वनक्षेत्र जळून खाक झाले. सोमवारी दुपारी लागलेली आग मंगळवारी दुपारपर्यंत सुरु होती. काही शेतकरी व वनविभागाच्या कर्मचाºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.वन जमिनीच्या लगत असलेल्या कासारी येथील सिद्राम सोनवणे, सय्यद मुस्ताफा यांच्यासह चार शेतक-यांच्या गोठ्यास आग लागून शेती साहित्य खाक झाले. तसेच भोगलवाडी, कासारी येथील शेतक-यांच्या कडब्याच्या सहा गंजी जळून खाक झाल्या आहेत.

आगीमुळे जंगलातील झाडांचे मोठे नुकसान झाले असून अनेक वन्य प्राण्यांचा जीव गेल्याचे सांगण्यात आले. आगीमुळे जंगलातील मोठमोठी झाडे नंतर वाळून जातात. वन विभागाने जाळरेषा न काढल्यामुळे जंगल मोठ्या प्रमाणात जळाले आहे. जंगल किती जळाले, याची निश्चित आकडेवारी काढण्यासाठी मंगळवारी दुपारपासून जीपीएस यंत्राद्वारे कर्मचारी मोजणी करीत आहेत. या प्रकरणी वन विभागाने कोणीतरी आग लावल्याचा संशय धरून अज्ञात व्यक्ती विरोधात वन विभागाच्या कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दोन दिवस आगीची महिती कळू दिली नाहीसोमवारी दुपारी एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक लागलेली आग मंगळवारी दुपारपर्यंत सुरूच होती. एवढी मोठी घटना असतानाही दोन दिवस याची कोणाला माहितीच होऊ दिली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या आगीमुळे झाडांचे आणि शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे.