शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे संयुक्त पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी व पंचायत विभागाला दिले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी व पंचायत विभागाला दिले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच नुकसानाचा आकडा समोर येऊन कार्यवाही करता येईल. हा अहवाल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावरून मदतीसाठी मागणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

दि. ३० ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या दरम्यान जिल्ह्यातील जवळपास ६२ महसूल मंडलांत पाऊस झाला आहे. काही ठिकाणी जीवितहानीदेखील झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून, तहसीलदारांना विविध उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. कोणत्या महसूल मंडलात किती पाऊस झाला व अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाले, याचा अहवाल पंचनामा झाल्यानंतर प्राप्त होईल. प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. ज्याठिकाणी मदतकार्य आवश्यक आहे, तिथे स्थानिक प्रशासन व एनडीआरएफचे जवान पोहोचत आहेत. शेतीपिकांचे नुकसान व जीवितहानी तसेच इतर नुकसानासंदर्भात तहसील स्तरावरून अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ मदत करणार असल्याचेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर, माहिती अधिकारी किरण वाघ उपस्थित होते.

विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरू

पिकांचे नुकसान झाल्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशाने २५ टक्के अग्रिम रक्कम विमा कंपनीने शेतकऱ्यांना द्यावी, यासाठी अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, विमा कंपनीने काही त्रुटी काढल्यामुळे त्यासंदर्भात कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभाग विमा कंपनीकडे पाठपुरावा करत असून, त्यावरही लवकरच तोडगा निघेल, असेही शर्मा म्हणाले.

रिक्त पदांमुळे कामावर परिणाम

जिल्ह्यातील महसूल, कृषी, जिल्हा प्रशासन सर्वच विभागांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा कामावर परिणाम होत असून, काहीवेळा विलंबदेखील होत असल्याची खंतही शर्मा यांनी बोलून दाखवली.

--

सरसकट मदत देण्याची मागणी

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे अहवाल तयार होईपर्यंत सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल

व्यक्ती मयत ६

पशुधन मयत २९

कोंबड्या वाहून गेल्या १२००

घरांची पडझड २०

080921\08_2_bed_14_08092021_14.jpg

पत्रकारपरिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर माहिती अधिकारी किरन वाघ