शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे संयुक्त पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी व पंचायत विभागाला दिले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी व पंचायत विभागाला दिले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच नुकसानाचा आकडा समोर येऊन कार्यवाही करता येईल. हा अहवाल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावरून मदतीसाठी मागणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

दि. ३० ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या दरम्यान जिल्ह्यातील जवळपास ६२ महसूल मंडलांत पाऊस झाला आहे. काही ठिकाणी जीवितहानीदेखील झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून, तहसीलदारांना विविध उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. कोणत्या महसूल मंडलात किती पाऊस झाला व अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाले, याचा अहवाल पंचनामा झाल्यानंतर प्राप्त होईल. प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. ज्याठिकाणी मदतकार्य आवश्यक आहे, तिथे स्थानिक प्रशासन व एनडीआरएफचे जवान पोहोचत आहेत. शेतीपिकांचे नुकसान व जीवितहानी तसेच इतर नुकसानासंदर्भात तहसील स्तरावरून अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ मदत करणार असल्याचेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर, माहिती अधिकारी किरण वाघ उपस्थित होते.

विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरू

पिकांचे नुकसान झाल्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशाने २५ टक्के अग्रिम रक्कम विमा कंपनीने शेतकऱ्यांना द्यावी, यासाठी अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, विमा कंपनीने काही त्रुटी काढल्यामुळे त्यासंदर्भात कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभाग विमा कंपनीकडे पाठपुरावा करत असून, त्यावरही लवकरच तोडगा निघेल, असेही शर्मा म्हणाले.

रिक्त पदांमुळे कामावर परिणाम

जिल्ह्यातील महसूल, कृषी, जिल्हा प्रशासन सर्वच विभागांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा कामावर परिणाम होत असून, काहीवेळा विलंबदेखील होत असल्याची खंतही शर्मा यांनी बोलून दाखवली.

--

सरसकट मदत देण्याची मागणी

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे अहवाल तयार होईपर्यंत सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल

व्यक्ती मयत ६

पशुधन मयत २९

कोंबड्या वाहून गेल्या १२००

घरांची पडझड २०

080921\08_2_bed_14_08092021_14.jpg

पत्रकारपरिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर माहिती अधिकारी किरन वाघ