शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे संयुक्त पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी व पंचायत विभागाला दिले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी व पंचायत विभागाला दिले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच नुकसानाचा आकडा समोर येऊन कार्यवाही करता येईल. हा अहवाल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावरून मदतीसाठी मागणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

दि. ३० ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या दरम्यान जिल्ह्यातील जवळपास ६२ महसूल मंडलांत पाऊस झाला आहे. काही ठिकाणी जीवितहानीदेखील झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून, तहसीलदारांना विविध उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. कोणत्या महसूल मंडलात किती पाऊस झाला व अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाले, याचा अहवाल पंचनामा झाल्यानंतर प्राप्त होईल. प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. ज्याठिकाणी मदतकार्य आवश्यक आहे, तिथे स्थानिक प्रशासन व एनडीआरएफचे जवान पोहोचत आहेत. शेतीपिकांचे नुकसान व जीवितहानी तसेच इतर नुकसानासंदर्भात तहसील स्तरावरून अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ मदत करणार असल्याचेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर, माहिती अधिकारी किरण वाघ उपस्थित होते.

विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरू

पिकांचे नुकसान झाल्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशाने २५ टक्के अग्रिम रक्कम विमा कंपनीने शेतकऱ्यांना द्यावी, यासाठी अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, विमा कंपनीने काही त्रुटी काढल्यामुळे त्यासंदर्भात कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभाग विमा कंपनीकडे पाठपुरावा करत असून, त्यावरही लवकरच तोडगा निघेल, असेही शर्मा म्हणाले.

रिक्त पदांमुळे कामावर परिणाम

जिल्ह्यातील महसूल, कृषी, जिल्हा प्रशासन सर्वच विभागांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा कामावर परिणाम होत असून, काहीवेळा विलंबदेखील होत असल्याची खंतही शर्मा यांनी बोलून दाखवली.

--

सरसकट मदत देण्याची मागणी

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे अहवाल तयार होईपर्यंत सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल

व्यक्ती मयत ६

पशुधन मयत २९

कोंबड्या वाहून गेल्या १२००

घरांची पडझड २०

080921\08_2_bed_14_08092021_14.jpg

पत्रकारपरिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर माहिती अधिकारी किरन वाघ