शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे संयुक्त पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी व पंचायत विभागाला दिले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी व पंचायत विभागाला दिले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच नुकसानाचा आकडा समोर येऊन कार्यवाही करता येईल. हा अहवाल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावरून मदतीसाठी मागणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

दि. ३० ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या दरम्यान जिल्ह्यातील जवळपास ६२ महसूल मंडलांत पाऊस झाला आहे. काही ठिकाणी जीवितहानीदेखील झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून, तहसीलदारांना विविध उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. कोणत्या महसूल मंडलात किती पाऊस झाला व अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाले, याचा अहवाल पंचनामा झाल्यानंतर प्राप्त होईल. प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. ज्याठिकाणी मदतकार्य आवश्यक आहे, तिथे स्थानिक प्रशासन व एनडीआरएफचे जवान पोहोचत आहेत. शेतीपिकांचे नुकसान व जीवितहानी तसेच इतर नुकसानासंदर्भात तहसील स्तरावरून अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ मदत करणार असल्याचेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर, माहिती अधिकारी किरण वाघ उपस्थित होते.

विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरू

पिकांचे नुकसान झाल्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशाने २५ टक्के अग्रिम रक्कम विमा कंपनीने शेतकऱ्यांना द्यावी, यासाठी अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, विमा कंपनीने काही त्रुटी काढल्यामुळे त्यासंदर्भात कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभाग विमा कंपनीकडे पाठपुरावा करत असून, त्यावरही लवकरच तोडगा निघेल, असेही शर्मा म्हणाले.

रिक्त पदांमुळे कामावर परिणाम

जिल्ह्यातील महसूल, कृषी, जिल्हा प्रशासन सर्वच विभागांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा कामावर परिणाम होत असून, काहीवेळा विलंबदेखील होत असल्याची खंतही शर्मा यांनी बोलून दाखवली.

--

सरसकट मदत देण्याची मागणी

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे अहवाल तयार होईपर्यंत सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल

व्यक्ती मयत ६

पशुधन मयत २९

कोंबड्या वाहून गेल्या १२००

घरांची पडझड २०

080921\08_2_bed_14_08092021_14.jpg

पत्रकारपरिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर माहिती अधिकारी किरन वाघ