शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात यंदा स्वस्ताईची ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:21 IST

आयात शुल्कात वाढ केल्याने खाद्यतेलाच्या दरात काहीशी तेजी असलीतरी इतर खाद्यवस्तुंच्या बाबतीत बाजारात स्वस्ताईची संक्रांत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर मागील तीन महिन्यात गुळ आणि साखर आणि चणाडाळीचे भाव उतरल्यामुळे सर्वसामान्यांना सणाचा गोडवा साजरा करणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देबाजारपेठ फुलली : गुळ, साखर, डाळ हसली, संक्रांत गोड झाली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आयात शुल्कात वाढ केल्याने खाद्यतेलाच्या दरात काहीशी तेजी असलीतरी इतर खाद्यवस्तुंच्या बाबतीत बाजारात स्वस्ताईची संक्रांत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर मागील तीन महिन्यात गुळ आणि साखर आणि चणाडाळीचे भाव उतरल्यामुळे सर्वसामान्यांना सणाचा गोडवा साजरा करणे शक्य झाले आहे.आॅक्टोबरमध्ये दिवाळीच्या कालावधीत डाळ , साखर, गुळाच्या दरात तेजीचे वारे होते. मात्र त्यानंतर अडीच- तीन महिने किराणा बाजारात मंदीचे वातावरण होते. प्रत्येक मालाला उठाव कमी असल्याने बाजार सुस्त होता. जानेवारी उजाडल्यानंतर पहिल्या आठवड्यातही हेच वातावरण होते. बुधवारपासून (१० जानेवारी) संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात वर्दळ दिसून आली.आॅक्टोबरमध्ये गुळाचे भाव ४५ रुपये किलो होते. हे भाव किलोमागे १५ रुपयांनी उतरले आहेत. किरकोळ बाजारात गुळाचे भाव सध्या ३० रुपये किलो आहेत. तर रसायनविरहित गुळाचे भाव ५० ते ७० रुपये किलोदरम्यान आहेत. संक्रातीच्या काळात मागणी असलेला चिक्कीचा गुळ ५५ रुपये किलो दराने विकत आहे. गुळाप्रमाणेच साखरेची स्थिती झाली आहे. आॅक्टोबरमध्ये ४० हजार रुपये किलो भाव असलेली साखर किलामागे ४ रुपयांनी घसरली आहे. किरकोळ बाजारात ३६ रुपये किलो साखरेचे भाव आहेत.चणाडाळीचे दर आॅक्टोबरमध्ये ८५ रुपये किलो होते. तीन महिन्यात किलोमागे १५ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या ७० रुपये किलो भाव आहे. चणा बेसनच्या ५० किलो बॅगचे दर ४ हजार ५०० रुपये होते. सध्या या बॅगचे भाव ३००० रुपये आहे. किलोमागे ३० रुपयांनी दर गडगडले आहेत. घरोघरी संक्रांतीला तिळाचे लाडू, पुरणपोळीचा बेत असतो. साखर आणि गुळाचे दर सारखेच असल्याने व चणाडाळीचे भाव कमी असल्याने यंदाची संक्रात गोड झाली आहे.मागील दोन दिवसांपासून रेडिमेड कपडे, साड्या, वाणाच्या वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होती.

 

गोडवा कायम : तिळाचे भाव स्थिरतिळाचे भाव मागील वर्षापासून स्थिर आहेत. १०० ते १२० रुपये किलो तिळाचे भाव आहे. तर साखरतिळाचे भाव ६० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. बाजारात तिळाचे आयते लाडू, तीळपापडी, तीळपट्टी, गजक तसेच इतर व्यंजन उपलब्ध असल्याने तिळाचा उठाव दरवर्षीच्या तुलनेत ७० टक्के कमी असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.उसाचे पीक मुबलक आहे. साखर कारखान्यांचे गाळप सुरु आहे. तसेच हरभºयाचे पीक उत्तम आहे. उत्पादन दृष्टीपथात आल्यामुळे सध्या बाजारात हे दर कमी आहेत. संक्रांतनिमित्त बाजारात ग्राहकी नव्हती.- गंगाबिशन करवा, होलसेल किराणा व्यापारी, बीड