शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

बीड जिल्ह्यात यंदा स्वस्ताईची ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:21 IST

आयात शुल्कात वाढ केल्याने खाद्यतेलाच्या दरात काहीशी तेजी असलीतरी इतर खाद्यवस्तुंच्या बाबतीत बाजारात स्वस्ताईची संक्रांत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर मागील तीन महिन्यात गुळ आणि साखर आणि चणाडाळीचे भाव उतरल्यामुळे सर्वसामान्यांना सणाचा गोडवा साजरा करणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देबाजारपेठ फुलली : गुळ, साखर, डाळ हसली, संक्रांत गोड झाली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आयात शुल्कात वाढ केल्याने खाद्यतेलाच्या दरात काहीशी तेजी असलीतरी इतर खाद्यवस्तुंच्या बाबतीत बाजारात स्वस्ताईची संक्रांत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर मागील तीन महिन्यात गुळ आणि साखर आणि चणाडाळीचे भाव उतरल्यामुळे सर्वसामान्यांना सणाचा गोडवा साजरा करणे शक्य झाले आहे.आॅक्टोबरमध्ये दिवाळीच्या कालावधीत डाळ , साखर, गुळाच्या दरात तेजीचे वारे होते. मात्र त्यानंतर अडीच- तीन महिने किराणा बाजारात मंदीचे वातावरण होते. प्रत्येक मालाला उठाव कमी असल्याने बाजार सुस्त होता. जानेवारी उजाडल्यानंतर पहिल्या आठवड्यातही हेच वातावरण होते. बुधवारपासून (१० जानेवारी) संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात वर्दळ दिसून आली.आॅक्टोबरमध्ये गुळाचे भाव ४५ रुपये किलो होते. हे भाव किलोमागे १५ रुपयांनी उतरले आहेत. किरकोळ बाजारात गुळाचे भाव सध्या ३० रुपये किलो आहेत. तर रसायनविरहित गुळाचे भाव ५० ते ७० रुपये किलोदरम्यान आहेत. संक्रातीच्या काळात मागणी असलेला चिक्कीचा गुळ ५५ रुपये किलो दराने विकत आहे. गुळाप्रमाणेच साखरेची स्थिती झाली आहे. आॅक्टोबरमध्ये ४० हजार रुपये किलो भाव असलेली साखर किलामागे ४ रुपयांनी घसरली आहे. किरकोळ बाजारात ३६ रुपये किलो साखरेचे भाव आहेत.चणाडाळीचे दर आॅक्टोबरमध्ये ८५ रुपये किलो होते. तीन महिन्यात किलोमागे १५ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या ७० रुपये किलो भाव आहे. चणा बेसनच्या ५० किलो बॅगचे दर ४ हजार ५०० रुपये होते. सध्या या बॅगचे भाव ३००० रुपये आहे. किलोमागे ३० रुपयांनी दर गडगडले आहेत. घरोघरी संक्रांतीला तिळाचे लाडू, पुरणपोळीचा बेत असतो. साखर आणि गुळाचे दर सारखेच असल्याने व चणाडाळीचे भाव कमी असल्याने यंदाची संक्रात गोड झाली आहे.मागील दोन दिवसांपासून रेडिमेड कपडे, साड्या, वाणाच्या वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होती.

 

गोडवा कायम : तिळाचे भाव स्थिरतिळाचे भाव मागील वर्षापासून स्थिर आहेत. १०० ते १२० रुपये किलो तिळाचे भाव आहे. तर साखरतिळाचे भाव ६० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. बाजारात तिळाचे आयते लाडू, तीळपापडी, तीळपट्टी, गजक तसेच इतर व्यंजन उपलब्ध असल्याने तिळाचा उठाव दरवर्षीच्या तुलनेत ७० टक्के कमी असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.उसाचे पीक मुबलक आहे. साखर कारखान्यांचे गाळप सुरु आहे. तसेच हरभºयाचे पीक उत्तम आहे. उत्पादन दृष्टीपथात आल्यामुळे सध्या बाजारात हे दर कमी आहेत. संक्रांतनिमित्त बाजारात ग्राहकी नव्हती.- गंगाबिशन करवा, होलसेल किराणा व्यापारी, बीड