शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

बीड जिल्ह्यात यंदा स्वस्ताईची ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:21 IST

आयात शुल्कात वाढ केल्याने खाद्यतेलाच्या दरात काहीशी तेजी असलीतरी इतर खाद्यवस्तुंच्या बाबतीत बाजारात स्वस्ताईची संक्रांत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर मागील तीन महिन्यात गुळ आणि साखर आणि चणाडाळीचे भाव उतरल्यामुळे सर्वसामान्यांना सणाचा गोडवा साजरा करणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देबाजारपेठ फुलली : गुळ, साखर, डाळ हसली, संक्रांत गोड झाली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आयात शुल्कात वाढ केल्याने खाद्यतेलाच्या दरात काहीशी तेजी असलीतरी इतर खाद्यवस्तुंच्या बाबतीत बाजारात स्वस्ताईची संक्रांत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर मागील तीन महिन्यात गुळ आणि साखर आणि चणाडाळीचे भाव उतरल्यामुळे सर्वसामान्यांना सणाचा गोडवा साजरा करणे शक्य झाले आहे.आॅक्टोबरमध्ये दिवाळीच्या कालावधीत डाळ , साखर, गुळाच्या दरात तेजीचे वारे होते. मात्र त्यानंतर अडीच- तीन महिने किराणा बाजारात मंदीचे वातावरण होते. प्रत्येक मालाला उठाव कमी असल्याने बाजार सुस्त होता. जानेवारी उजाडल्यानंतर पहिल्या आठवड्यातही हेच वातावरण होते. बुधवारपासून (१० जानेवारी) संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात वर्दळ दिसून आली.आॅक्टोबरमध्ये गुळाचे भाव ४५ रुपये किलो होते. हे भाव किलोमागे १५ रुपयांनी उतरले आहेत. किरकोळ बाजारात गुळाचे भाव सध्या ३० रुपये किलो आहेत. तर रसायनविरहित गुळाचे भाव ५० ते ७० रुपये किलोदरम्यान आहेत. संक्रातीच्या काळात मागणी असलेला चिक्कीचा गुळ ५५ रुपये किलो दराने विकत आहे. गुळाप्रमाणेच साखरेची स्थिती झाली आहे. आॅक्टोबरमध्ये ४० हजार रुपये किलो भाव असलेली साखर किलामागे ४ रुपयांनी घसरली आहे. किरकोळ बाजारात ३६ रुपये किलो साखरेचे भाव आहेत.चणाडाळीचे दर आॅक्टोबरमध्ये ८५ रुपये किलो होते. तीन महिन्यात किलोमागे १५ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या ७० रुपये किलो भाव आहे. चणा बेसनच्या ५० किलो बॅगचे दर ४ हजार ५०० रुपये होते. सध्या या बॅगचे भाव ३००० रुपये आहे. किलोमागे ३० रुपयांनी दर गडगडले आहेत. घरोघरी संक्रांतीला तिळाचे लाडू, पुरणपोळीचा बेत असतो. साखर आणि गुळाचे दर सारखेच असल्याने व चणाडाळीचे भाव कमी असल्याने यंदाची संक्रात गोड झाली आहे.मागील दोन दिवसांपासून रेडिमेड कपडे, साड्या, वाणाच्या वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होती.

 

गोडवा कायम : तिळाचे भाव स्थिरतिळाचे भाव मागील वर्षापासून स्थिर आहेत. १०० ते १२० रुपये किलो तिळाचे भाव आहे. तर साखरतिळाचे भाव ६० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. बाजारात तिळाचे आयते लाडू, तीळपापडी, तीळपट्टी, गजक तसेच इतर व्यंजन उपलब्ध असल्याने तिळाचा उठाव दरवर्षीच्या तुलनेत ७० टक्के कमी असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.उसाचे पीक मुबलक आहे. साखर कारखान्यांचे गाळप सुरु आहे. तसेच हरभºयाचे पीक उत्तम आहे. उत्पादन दृष्टीपथात आल्यामुळे सध्या बाजारात हे दर कमी आहेत. संक्रांतनिमित्त बाजारात ग्राहकी नव्हती.- गंगाबिशन करवा, होलसेल किराणा व्यापारी, बीड