धारूर : बीड जिल्ह्यात कोरोना लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना नुकतेच किराणा सामानाचे वाटप केले. ग्रामीण विकास केंद्र व जनसाहस इंडिया या संस्थेच्यावतीने आधार देण्याचे काम केले आहे.
बीड जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना परिस्थितीमुळे लॉॅकडाऊन सुरू झाला. या लॉकडाऊनमुळे ऊसतोड कामगार कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अडचणीत सापडले. हाताला काम नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. ऊसतोड कामगारांना ऊसतोडीवरून परत येताच लॉकडाऊनचा सामना करावा लागला. त्यामुळे मुलांना पालनपोषण करण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला रेशन किट वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील मालीपारगाव, पुरूषोत्तमपुरी, ब्रह्मगाव, राजेवाडी, डुकडेगाव, माणिकनगर, पुसरा या गावांत २५० कुटुंबांना एक महिन्याचे रेशन किट वाटप करण्यात आले. यामध्ये २५ किलो गव्हाचा आटा, १० किलो तांदुळ, २ किलो तेल, साखर, मिरची, मसुरडाळ, मूगडाळ, मीठ, हळद, साबण, सॅनिटाइजर, मास्क आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संस्थेचे जिल्हा समन्वयक परमेश्वर अडागळे, दत्ता आवाड, महादेव उमाप, बाजीराव खंडागळे, शरद लोखंडे, रोहित आवाड, बाबा मुजमुले, जयश्री लोखंडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करून कष्टकरी, गरीब, विधवा महिला, अपंगांना आधार देण्याचे काम केले.
===Photopath===
290621\img_20210629_192054.jpg
===Caption===
ग्रामीण विकास केंद्र व जनसाहस इंडिया या संस्थेच्या वतीने ऊस तोड कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.