शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

२३ हजार शेतकऱ्यांना १५७ कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST

बीड : खरीप हंगामात बीड जिल्ह्यात पीक कर्ज वाटपात मागील वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी गती आली आहे. १४ जूनपर्यंत २३ ...

बीड : खरीप हंगामात बीड जिल्ह्यात पीक कर्ज वाटपात मागील वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी गती आली आहे. १४ जूनपर्यंत २३ हजार ३४ शेतकऱ्यांना १५७ कोटी ६५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण ९.८५ टक्के इतके आहे. गतवर्षी १ एप्रिल ते १५ जूनपर्यंत पीक कर्ज वाटपाचे प्रमाण ९.२८ टक्के होते. मात्र यंदा कर्ज वाटपाची रक्कम गतवर्षीपेक्षा दुप्पट आहे.

खरीप हंगाम २०२१-२०२२ साठी बीड जिल्ह्याला १६०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. एक एप्रिलपासून पीक कर्ज वाटपाला जिल्ह्यातील बँकांनी सुरुवात केली. पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी वेळोवेळी पाठपुरावा सुरू ठेवला आहे तर अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीधर कदम यांनी जिल्ह्यातील बँकांशी समन्वय राखत पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुलभ व गतिमान करण्यासाठी सातत्याने संपर्क ठेवला आहे.

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने ५ हजार ९०५ शेतकऱ्यांना ५४ कोटी ३० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ॲक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय, कोटक महिंद्रा, आरबीएल बँकेच्या वतीने ४४५ शेतकऱ्यांना १० कोटी ८० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने ४,६९९ शेतकऱ्यांना ३३ कोटी ८३ लाख रुपयांचे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ११ हजार ९८५ शेतकऱ्यांना ५८ कोटी ७२ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात १५ जूनपर्यंत ११ हजार ७०४ शेतकऱ्यांना ८८ कोटी १२ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यावेळी खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे उद्दिष्ट ९५० कोटी रुपयांचे होते. यावर्षी १६०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट असल्याने व ते शंभर टक्के साध्य करण्यासाठी शासन, प्रशासन व बँक पातळीवर प्रयत्न होत आहेत.

पीक कर्ज वाटपाला गती

चालू आर्थिक वर्षात १ ते ३० एप्रिलपर्यंत ८५१ शेतकऱ्यांना १८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. एप्रिल आणि मे मध्ये ४ हजार ५८२ शेतकऱ्यांची प्रकरणे मंजूर तसेच कर्ज वाटप झाले. त्यानंतर मात्र जूनमध्ये या प्रक्रियेला वेग आला ७ जूनपर्यंत ११ हजार ५३० शेतकऱ्यांना ९५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. तर १४ जूनपर्यंत एकूण २३ हजार ३४ शेतकऱ्यांना १५७ कोटी ६५ लाख रूपयांचे वाटप झाले.

---------

पीक कर्ज वाटप १५ जून २०२० पर्यंत

११,७०४ शेतकरी- ८८ कोटी १२ लाख - प्रमाण ९.२८ टक्के

चालू वर्षात पीक कर्ज वाटप १४ जूनपर्यंत

२३,०३४ शेतकरी - १५७ कोटी ६५ लाख- प्रमाण ९.८५ टक्के

---------------------