शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका तोंडावर भाजपमध्ये निरुत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : मतदार संघातील वैद्यनाथ सहकारी बँक, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, जिल्हा बँकेतील रिक्त जागा, परळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परळी : मतदार संघातील वैद्यनाथ सहकारी बँक, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, जिल्हा बँकेतील रिक्त जागा, परळी नगर परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या संस्थांच्या निवडणुकीसाठी मात्र भाजपच्या गोटात काहीच हालचाल दिसत नाही. पदाधिकारी निरुत्साही दिसत असल्याचे चित्र आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेल्या पराभवापासून पक्ष सावरल्या नसल्याचे चित्र सध्या परळी मतदारसंघात दिसून येत आहे. खा. प्रीतम मुंडे यांना न मिळालेले मंत्रिपद, यानिमित्त झालेले पदाधिकाऱ्यांचे राजीनामा नाट्य यानंतर शहरात झालेले काही कार्यक्रम वगळता भाजपकडून कुठलेही कार्यक्रम, बैठका झाल्याचे दिसून येत नाही. आगामी सहा महिन्यांत महत्त्वाच्या संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत. परंतु निवडणुकीच्या दृष्टीने पक्षांतर्गत कुठलीही हालचाल दिसून येत नाही. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे असताना त्यांनी तयार केलेले शहराचे पदाधिकारी मागील १४ वर्षांपासून बदलले गेले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून कुठलेही नवीन कार्यक्रम होत नाहीत. भाजप तालुकाध्यक्ष निवडून एक वर्ष होऊन गेले आहे. परंतु उर्वरित कार्यकारिणी न निवडल्यामुळे तालुका भाजपचे सुद्धा कुठलेही कार्यक्रम दिसून येत नाहीत. भाजयुमोची स्थिती ही यापेक्षा वेगळी नाही. माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक युवा चेहरे या मतदार संघात भाजपचे प्रतिनिधित्व करतात. परंतु युवा मोर्चा आक्रमक झाल्याचे दिसून आले नाही. पक्षातील पदे नावापुरतीच राहिली आहेत. गटबाजीने युवक नेतृत्वाना संधी मिळत नाही. युवकात नाराजी आहे. मतदार संघाला महिला नेतृत्व असूनही शहरात नसलेली महिला आघाडी सुद्धा पक्षाच्या काळजीचा विषय आहे. पंकजा मुंडे यांनी चालू केलेले द टर्निंग पॉईंट व गौरी-गणपतीसारखे जनसामान्यात अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम सुद्धा कोरोनामुळे बंद पडले आहेत. यामुळे मुंडे यांचा महिलांशी थेट संवाद राहिला नाही. सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला टक्कर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांना आगामी काळात मरगळ झटकून कामाला लागावे लागणार आहे. यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.