शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:29 IST

राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासान दिले होते. मात्र सरकारला चार चार वर्षे होत आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तात्काळ आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी यशवंत सेनेच्या वतीने काठी न् घोंगडं मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते,

ठळक मुद्देकाठी, घोंगडे हातात घेऊन नागरिक सहभागी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासान दिले होते. मात्र सरकारला चार चार वर्षे होत आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तात्काळ आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी यशवंत सेनेच्या वतीने काठी न् घोंगडं मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी शेकडो कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते.भाजपाने २०१४ साली धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्या दिवसांपासून धनगर समाज आरक्षण मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत येऊन चार वर्षे होत आहेत. मात्र दिलेला शब्द शासनाने पाळला नाही. त्यामुळे समाजात तसेच तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी बीड शहरात मोर्चा काढण्यात आला. तसेच धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलावून प्रश्न मार्गी लावावा अन्यथा येणाºया निवडणुकीमध्ये भाजपाला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोन्नर यांनी केले. यावेळी जिल्हाभरातून समाजबांधव सहभागी झाले होते.मंत्री जानकरांना पडला विसरआरक्षण मुद्द्यावर राजकारण करणारे व सध्या मंत्री असलेले महादेव जानकर यांना मात्र समाज आरक्षणासंदर्भांत विसर पडल्याचे चित्र आहे. आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे धनगर समाजाचा जानकरांवरचा विश्वास उडाल्याची प्रतिक्रिया मोर्चात सहभागी नागरिकांनी दिली.राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशाराधनगर समाजाला एस.टी प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्याची मागणी वेळोवेळी केली आहे. मात्र भाजप सरकार हे वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भात तात्काळ निर्णय शासनाने घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यळकोट, यळकोट‘जय मल्हार’मोर्चामध्ये सहभागी झालेल्या धनगर बांधवांनी काढलेल्या मोर्चामध्ये शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी धनगर आरक्षण आमच्या हक्काचे, ‘यळकोट, यळकोट जय मल्हार’च्या घोषणा देण्यात आल्या तसेच काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन देखील झाले.

टॅग्स :BeedबीडDhangar Reservationधनगर आरक्षणMorchaमोर्चा