शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सत्ताधाऱ्यांना व्हिजन नसल्यानेच मराठवाड्याचा विकास खुंटला - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

बीड : सत्ताधारी हे नियोजन शून्य असून, त्यांना व्हिजन नसल्याने मराठवाड्याचा विकास खुंटल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ...

बीड : सत्ताधारी हे नियोजन शून्य असून, त्यांना व्हिजन नसल्याने मराठवाड्याचा विकास खुंटल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर उतरणार असून, मराठवाड्याचा सर्वांगीण विकास अणि नागरी सुविधा या प्रमुख विषयांवर आपले लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनात्मक समीक्षा आणि संवाद यात्रेदरम्यान शनिवारी त्या बीड येथे आल्या होत्या पत्रकार परिषदेत बोलताना ठाकूर म्हणाल्या, घराणेशाहीचे चाललेले राजकारण, एमआयडीसीच्या जमिनीवर उद्योग नसल्याने रोजगाराची वाढती समस्या तसेच पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाबाबत कसलेही नियोजन नसल्याने नागरी सुविधांचा अभाव या प्रमुख विषयांवर वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार असल्याचे त्या म्हणाल्या. सत्ताधारी हे नियोजन शून्य असून, त्यांना व्हिजन नसल्याने मराठवाड्याचा विकास खुंटल्याचा आरोपही ठाकूर यांनी यावेळी केला. गेल्या २३ वर्षांत ओबीसींसाठी केवळ ५० कोटी रुपयांचे कर्जवाटप झाल्याचे सांगून ओबीसी महामंडळाला भरीव निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली. ३० व ३१ ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणीही ठाकूर यांनी केली. मुस्लिम आरक्षणाबाबत अंमलबजावणी करावी म्हणून वंचित बहुजन आघाडी आग्रही असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, प्रवक्ते फारूक अहमद, प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे, महिला आघाडीच्या महासचिव अरुंधती शिरसाठ, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, विष्णू देवकते, बबन वडमारे आदी उपस्थित होते.

-----

जनगणना वैधानिक बंधन

केंद्र शासनाने ओबीसी जनगणना करावी तसे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. मात्र आता त्याचे पालन होत नसून कायदेशीरपणे इंम्पिरियल डाटा जनगणनेतूनच उपलब्ध होऊ शकेल. जनगणना हे वैधानिक बंधन आहे. ओबीसीचे भले होण्यासाठी त्यांची जनगणना आवश्यक असल्याचे मत ठाकूर यांनी व्यक्त केले. काही पक्ष, नेते ओबीसींच्या हिताचा विचार न करता फसवणूक करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

------