शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

अमानवी अत्याचार होत असतानाही वि. दा. सावरकर स्वातंत्र्याच्या ध्येयापासून कणभरही विचलित झाले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:02 IST

लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर : वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयात व्याख्यान बीड : थोर स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रभक्त वि. दा. सावरकर यांच्यावर परकीय राजवटीद्वारे ...

लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर : वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयात व्याख्यान

बीड : थोर स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रभक्त वि. दा. सावरकर यांच्यावर परकीय राजवटीद्वारे अमानवी अत्याचार केला गेला. त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली गेली तरी स्वातंत्र्याच्या ध्येयापासून कणभरही ते विचलित झाले नाहीत. अंदमान तेथे त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. ही शिक्षा भोगत असतानाही त्यांचा स्वातंत्र्याचा लढा चालू होता. अंदमान येथील कारागृहाच्या अमानवी वागणुकीविरोधात संप करून इंग्रजांना कारागृहाच्या नियमात बदल करण्यास भाग पाडले. राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रीय उन्नतीसाठी वि. दा. सावरकर यांचे विचार आजही प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहेत, असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी व्यक्त केले.

बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय आणि अटल जनसेवक मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अंदमानातील सावरकर’ या विषयावर उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश भाऊ पोकळे तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. नामदेव सानप, भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्यवाहक चंद्रकांत मुळे, प्रा. बन्सी हवाळे, डॉ. राजेश भुसारी, संस्था सचिव गणेश पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर म्हणाले की, वि. दा. सावरकर हे जहाल मतवादी होते. सशस्त्र क्रांतीवर त्यांचा विश्वास होता. सावरकर भाषा साहित्याचे गाढे अभ्यासक होते. अंदमानातील कारागृहात कैद्यांना एकत्र करून साक्षरता मोहीम त्यांनी राबविली. भाषेचा प्रचार व प्रसार केला. कारागृहात ग्रंथालय सुरू करण्यास भाग पाडले. जाती व धर्मभेदाला विरोध केला. सावरकरांनी मानवी एकतेचा संदेश दिला. सावरकर यांचे विचार, लेखन आजही प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहे, असे डॉ. बाहेगव्हाणकर यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना संस्था अध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले की, वि. दा. सावरकर हे आक्रमक देशभक्त होते. सशस्त्र क्रांतीमुळे परकीय राजवटीला खऱ्या अर्थाने सुरुंग लावण्याचे काम त्यांनी केले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी संतोष सावंत, प्रवीण पवार, सत्यशील मिसाळ, अशोक रसाळ, राहुल मुळे, विशाल जोशी, प्रा. वैजनाथ शिंदे, प्रा. सुरेश कसबे, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. बप्पासाहेब हावळे यांनी केले तर प्रा. विजय दहिवाळ यांनी आभार मानले.

===Photopath===

010321\070701bed_29_01032021_14.jpg

===Caption===

बीड येथे ‘अंदमानातील सावरकर’ या विषयावर उपप्राचार्य डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रमेश भाऊ पोकळे होते.