शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

संततधार पाऊस होऊनही पाण्याचा निचरा, सोयाबीनला झाला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:21 IST

केज : तालुक्यातील पळसखेड येथील शेतकरी प्रशांत ईखे यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी केली. ...

केज : तालुक्यातील पळसखेड येथील शेतकरी प्रशांत ईखे यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी केली. यामुळे मागच्या आठवड्यात संततधार पाऊस होऊनही वरंब्यावर लागवड केल्यामुळे सोयाबीनच्या पिकात पाणी थांबले नाही. रानातील पाणी बाजूला असलेल्या सऱ्यांतून वाहून गेले. सोयाबीन वाफशावर राहून झाडे तजेलदार दिसून येत आहेत. मागील वर्षी याच रानात पाणी थांबले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांचे नुकसान झाले होते. परंतु या वर्षी बीबीएफ पद्धतीने पेरणीचा फायदा झाल्याचे सांगत मोहन ईखे यांनी समाधान व्यक्त केले. किडींच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क तयार करणे व कामगंध सापळे लावण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले तसेच बीजोत्पादन व बीबीएफ पद्धतीने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अनुदान मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षक अनिकेत पोटभरे यांनी हवामान आधारित पीक सल्ला माहितीपत्रके वाटप केली.

शेतीशाळेला लहू मुळे, मारुती गायकवाड, अविनाश चव्हाण, कल्याण गायकवाड, रावण गायकवाड, किशोर गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, प्रतीक गायकवाड, कमलेश गायकवाड, सोपान पौळ, महादेव गायकवाड, बन्सी गायकवाड, दिलीप मुळे, ऋषीकेश चव्हाण, बाळासाहेब चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते.

पिकांचे निरीक्षण

रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाचे फायदे इतर शेतकऱ्यांनी समजून घेण्यासाठी उपविभागीय प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी शेतीशाळा वर्गाच्या प्रक्षेत्रावर शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना निरीक्षणे दाखवली असता शेतकऱ्यांनी पारंपरिक पेरणीचे सोयाबीन पिवळे पडले, पाणी साठून राहिल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्याचे सांगितले. येळकर यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा फायदा विस्तृतपणे समजावून सांगितला.

210721\1439-img-20210721-wa0005.jpg

पळसखेड येथे हवामान अनुकूल शेतीशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना उप विभागीय प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांच्या सह शेतकरी.