शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

शेतकऱ्यांची आर्थिक लूट कारवाईकडे कृषी विभागाचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST

अंबाजोगाई : परवानगी नसतानाही कृषी बाजारपेठेत अनेक बनावट कीटकनाशके विक्री केली जात असून, शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असताना कृषी ...

अंबाजोगाई : परवानगी नसतानाही कृषी बाजारपेठेत अनेक बनावट कीटकनाशके विक्री केली जात असून, शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असताना कृषी विभाग मात्र कारवाईकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, काही भागांत सोयाबीन व कापसावर थ्रीप्स, मावा, बुरशी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कीडींपासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी आता फवारणीमध्ये गुंतले आहेत. या फवारणीसाठी बाजारपेठेत विविध कंपन्यांची कीटकनाशके उपलब्ध आहेत. मात्र, यापैकी अनेक कंपन्यांच्या कीटकनाशकांना ॲक्टनुसार विक्रीची परवानगी नाही. असे असताना केवळ पीजीआरचा सहारा घेऊन आणि नावे बदलून कीटकनाशकांची विक्री चालवली आहे. गेल्यावर्षी अंबाजोगाईच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या बोगस बियाणांची विक्री झाली होती. याचा फटका तालुक्यातील एक हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना बसला होता. बोगस कंपन्यांचे बियाणे न उगवल्याने अनेक कंपन्यांवर गुन्हा नोंद झाला. बियाण्यापाठोपाठ आता बनावट कीटकनाशकेही बाजारात विक्रीसाठी आल्याने शेतकरीही धास्तावले आहेत.

उत्पन्न घटण्याची भीती

विशेष म्हणजे, अनधिकृतरित्या विक्री केल्या जाणाच्या अनेक कीटकनाशकांमध्ये निंबोळी अर्काशिवाय इतर कोणत्याही रासायनिक घटकांचा समावेश केलेला नाही. ही कीटकनाशके शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करणारी असून बाजारपेठेत अशा कीटकनाशकांची सर्रास विक्री केली जात आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त होत आहे.

---------

गुणनियंत्रकामार्फत तपासणी करावी

कीटकनाशकांची प्रयोगशाळेत तपासणी करूनच ती बाजारपेठेत विक्री करावीत, असा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. मात्र, कोणतीही तपासणी न करता विविध कंपन्यांची कीटकनाशके शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत.

त्यामुळे या कीटकनाशकांची गुणनियंत्रकामार्फत तपासणी झाली पाहिजे. -प्रभाकर कुलकर्णी, शेतकरी

---------

कृषी विभागाचे कानावर हात

बाजारात येणारी बियाणी, कीटकनाशके यांची प्रतवारी व गुणवत्ता तपासणीसाठी तालुका कृषी विभागाचे पथक कार्यरत असते. मात्र, व्यापारी व कृषी अधिकाऱ्यांतील प्रेमळ संबंधामुळे कारवाई होत नाही. शेकऱ्यांच्या तक्रारीच कृषी कार्यालयात येत नाहीत. असे समर्पक उत्तर कृषी विभागाकडून दिले जाते.

--------

पावतीही मिळत नाही

विविध कंपन्यांची बनावट कीटकनाशके २२०० ते २६०० रुपये लीटर या दराने विक्री केली जातात. विशेष म्हणजे काही कीटकनाशकांच्या खरेदीनंतर शेतकऱ्यांना रितसर पावतीही दिली जात नाही, तर मागणी असलेली कीटकनाशके आड मार्गाने दामदुप्पट दरानेही व भेसळ करून विक्री केली जात आहेत. परवानगी नसतानाही ही कीटकनाशके बाजारपेठेत विक्री होताना कृषी विभागाकडून मात्र कारवाई होत नाही.