शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दूरसंचार सेवा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:34 IST

अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण परिसरात दूरसंचारची सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. इंटरनेट सेवा सतत खंडित होत असल्याने अनेक शासकीय ...

अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण परिसरात दूरसंचारची सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. इंटरनेट सेवा सतत खंडित होत असल्याने अनेक शासकीय व निमशासकीय यंत्रणा ठप्प होते. त्यामुळे याचा मोठा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. विस्कळीत सेवा सुरळीत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कऱ्हाडे यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना

अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात अनेक रस्त्यांची मोठी दुर्दशा झालेली आहे, तर अनेक गावांमधील गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी झालेल्या पावसात अनेक रस्ते खचून गेले आहेत. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे या रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातून संताप व्यक्त होत आहे.

केबल चोरी वाढली

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात सध्या शेतातील उसाला पाणी देणे सुरू आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला पाणी सोडण्यात आले होते. विद्युतपंप चालवण्यासाठी ठिकठिकाणी केबल टाकली होती. या केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

व्यायामशाळा उभारण्याची मागणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अजूनही काही गावांत व्यायामशाळा नसल्याने युवकांना मोठी अडचण होत आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. युवकांना शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामशाळा गरजेच्या आहेत. त्यामुळे ज्या गावात व्यायामशाळा नाहीत त्या गावात उभारणी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पांडव यांनी केली आहे.

जडवाहतुकीने रस्त्यांची दुरवस्था

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात नवीन रस्ते मोठ्या प्रमाणात झाले आहेत. तसेच कॉलनीमध्येही रस्ते झालेले आहेत. शहरात सध्या बांधकामे जोरदार सुरू आहेत. यात अवजड वाहने रेती, विटा वाहतूक मोठ्या प्रमाणावर करीत असल्याने रस्ते खचत आहेत.

उसाला पाणी देण्याचा प्रश्न

माजलगाव : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कडक उन्हाळ्यामुळे विहिरी व इंधन विहिरीच्या पाणीपातळीवर परिणाम होऊ लागला आहे. तालुक्यातील काही भागांत विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यात यावर्षी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पाणीपातळी घटत चालल्याने उसाला पाणी द्यायचे कसे? असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

गादी व्यावसायिकांना मदत द्यावी

बीड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून लग्नसराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. याशिवाय लॉजिंगही बंद आहे. शाळा, महाविद्यालयेदेखील बंद असल्याने वसतिगृहे ओस पडली आहेत. परिणामी गाद्यांची मागणी कमालीची घटली असून गादी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या गादी व्यावसायिकांना कुटुंब चालवणे अवघड झाल्याने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महबूब खान यांनी केली आहे.