शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी शासनाकडे २१ कोटी ५५ लाखांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, शेती वाहून जाणे, जनावरांचा व व्यक्तीचा मृत्यू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, शेती वाहून जाणे, जनावरांचा व व्यक्तीचा मृत्यू अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे या नुकसानभरपाईपोटी व मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून २१ कोटी ५५ लाख ९५ हजार रुपयांच्या अनुदानाची मागणी नैसर्गिक आपत्ती विभागाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शेतीपिकांच्या नुकसानाचे पंचनामे सुरूच असून, अहवाल आल्यानंतर नुकसानभरपाई किती मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये जवळपास १८४ मालमत्तांचे नुकसान झाले आहे तसेच घरांची पडझड होऊन काही व्यक्तींचा मृत्यूदेखील झाला होता. त्याचसोबत ७१ लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला होता तर २,५२५ कोंबड्या अतिवृष्टीत दगावल्या आहेत. ओढे, नद्या व तळे फुटून जवळपास ५ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यापोटी शासनाकडे २० कोटी १५ लाख २६ हजार ८७५ रुपयांची मागणी करण्यात आली आहे. इतर नुकसानापोटी १ कोटी ४० लाख ६८ हजार अशी मिळून २१ कोटी ५५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हे अनुदान तत्काळ मिळावे, अशी मागणी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांमधून केली जात आहे.

शेती पिकांचे नुकसान सर्वाधिक

जिल्ह्यातील अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खरीप हंगामातील पिकांना व फळबागांना बसला आहे. त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून त्याचा अहवालदेखील शासनाकडे पाठवावा, अशी मागणी होत आहे. पुढील दोन दिवसात यासंदर्भात अहवाल तयार होऊन नुकसानभरपाई रकमेची मागणी शासनाकडे जिल्हा प्रशासन करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिली आहे.