शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी शासनाकडे २१ कोटी ५५ लाखांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, शेती वाहून जाणे, जनावरांचा व व्यक्तीचा मृत्यू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, शेती वाहून जाणे, जनावरांचा व व्यक्तीचा मृत्यू अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे या नुकसानभरपाईपोटी व मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून २१ कोटी ५५ लाख ९५ हजार रुपयांच्या अनुदानाची मागणी नैसर्गिक आपत्ती विभागाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शेतीपिकांच्या नुकसानाचे पंचनामे सुरूच असून, अहवाल आल्यानंतर नुकसानभरपाई किती मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये जवळपास १८४ मालमत्तांचे नुकसान झाले आहे तसेच घरांची पडझड होऊन काही व्यक्तींचा मृत्यूदेखील झाला होता. त्याचसोबत ७१ लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला होता तर २,५२५ कोंबड्या अतिवृष्टीत दगावल्या आहेत. ओढे, नद्या व तळे फुटून जवळपास ५ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यापोटी शासनाकडे २० कोटी १५ लाख २६ हजार ८७५ रुपयांची मागणी करण्यात आली आहे. इतर नुकसानापोटी १ कोटी ४० लाख ६८ हजार अशी मिळून २१ कोटी ५५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हे अनुदान तत्काळ मिळावे, अशी मागणी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांमधून केली जात आहे.

शेती पिकांचे नुकसान सर्वाधिक

जिल्ह्यातील अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खरीप हंगामातील पिकांना व फळबागांना बसला आहे. त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून त्याचा अहवालदेखील शासनाकडे पाठवावा, अशी मागणी होत आहे. पुढील दोन दिवसात यासंदर्भात अहवाल तयार होऊन नुकसानभरपाई रकमेची मागणी शासनाकडे जिल्हा प्रशासन करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिली आहे.