शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

कुंडलिका उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:30 IST

सिंचनाचा लाभ द्या, नसता आंदोलनाचा इशारा धारूर : कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून तेलगाव नित्रुड, लोणवळ तलावातून जलवाहिनी प्रवाहात ...

सिंचनाचा लाभ द्या, नसता आंदोलनाचा इशारा

धारूर : कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून तेलगाव नित्रुड, लोणवळ तलावातून जलवाहिनी प्रवाहात काढून या गावातील जमिनीसाठी सिंचनाचा लाभ पूर्ववत तत्काळ द्यावा, नसता २५ जानेवारीपासून तेलगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह उपोषणाचा इशारा विठ्ठल लगड व ५० शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून तेलगाव, लोणवळ, नित्रुड या गावच्या हेडपासून टेलपर्यंत जमिनी सिंचनाखाली येतात. मात्र, या शेतकऱ्यांना सात वर्षांपासून पाण्याचा लाभ देणे बंद असल्याने पिके व शेती अडचणीत आली आहे. कॅनलवर अनधिकृत विद्युत मोटारी मोठ्या प्रमाणात असल्याने या शेतकऱ्यांना कॅनलच्या पाण्याचा फायदा होत नाही. या शेतकऱ्यांच्या जमिनी कंमाडमध्ये येत असल्याने जमिनीचा खरेदी - विक्रीचा व्यवहार करताना आर्थिक भुर्दंड या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. याबाबत यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्यामुळे या जमिनी ओलितापासून व कॅनलच्या पाण्यापासून वंचित राहात आहेत. पाण्याचा लाभ तत्काळ द्यावा, नसता २५ जानेवारीपासून उपोषण करण्यात येईल, असा इशारा विठ्ठल लगड, विष्णू लगड, नवनाथ चव्हाण, धोंडिराम चव्हाण, संतोष लगड यांच्यासह पन्नास शेतकऱ्यांनी दिला आहे.