शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

बीडचे पीकविमा मॉडेल राज्यात राबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:41 IST

प्रभात बुडूख लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत निसर्गाचा असमतोल आढळून येतो. यामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेत राज्यात ...

प्रभात बुडूख

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत निसर्गाचा असमतोल आढळून येतो. यामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेत राज्यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होतात. मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१९ बीडचा गौरव साली करण्यात आला होता. मात्र, कंपन्यांची नफाखोरी टाळण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाकडून विशेष आदेश पारीत करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात हे मॉडेल लागू करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यातील शिष्टमंडळाने केली आहे.

भारतीय पीकविमा कंपनीमार्फत बीड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेला ‘पीकविमा पॅटर्न’ संपूर्ण राज्यात लागू करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांकडे केली आहे. कंपनी तोट्यात जात असल्याची ओरड करीत २०१९ खरीप व रब्बी दोन्ही हंगामात बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विमा घेण्यास कुठलीही पीकविमा कंपनी तयार नव्हती. २०२० च्या खरीप हंगामात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे सतत पाठपुरावा करीत भारतीय विमा कंपनीशी तीन वर्षांचा करार करत नवा पॅटर्न बीड जिल्ह्यात राबविला. हा पॅटर्न राज्यात केवळ बीड पुरताच मर्यादित होता.

....

काय आहे बीड ‘पीक विमा पॅटर्न’

पीकविमा कंपनीस जमा केलेला हप्ता १०० कोटी असेल तर देय नुकसानभरपाई ११५ कोटी असल्यास भारतीय कृषी विमा कंपनी ११० कोटी नुकसानभरपाई अदा करेल. तर यासाठी राज्य शासन ५ कोटी अदा करेल. दुसऱ्या परिस्थितीमध्ये जमा विमा रक्कम १०० कोटी असेल व देय नुकसानभरपाई ७५ कोटी असल्यास भारतीय कृषी विमा कंपनी ७५ कोटी नुकसानभरपाई अदा करेल, तर २० कोटी स्वत:कडे ठेवेल. पाच कोटी राज्य शासनास परत करेल. अशा प्रकारचा पीकविम्याबाबतचा नवा पॅटर्न गेल्यावर्षीपासून राबविण्यात आला होता.

आज पंतप्रधान मोदी यांच्याशी राज्यातील पीक विम्याबाबत चर्चा झाली. तेव्हा बीड जिल्ह्यात जो पीक विम्याबाबतचा पॅटर्न राबविण्यात येत आहे. तो पॅटर्न महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधांनाकडे केल्याची माहिती महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.

...

बीडचे शेतकरी तोट्यातच

२०२० खरीप हंगामात भारतीय कृषी विमा कंपनीकडे १७ लाख ९० हजार शेतकऱ्यांचे ६० कोटी तसेच केंद्र व राज्य मिळून ७९८ कोटी रुपये भरणा केला होता. मात्र, त्यापैकी फक्त २० हजार ५३९ शेतकऱ्यांना १३ कोटी ४६ लाख रुपये भरपाई देण्यात आली. त्यामुळे मॉडेल २नुसार कंपनीला जवळपास १५९ कोटींचा नफा झाला आहे. सुमारे ६२५ कोटी रुपये शासनाकडे परत केले जाणार आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पंचनामा कृषी व महसूल विभागाने केला. त्यावेळी ४ लाख ३२ हजार शेतकरी बाधित झाले होते. त्यामुळे शासनाला ही रक्कम परत न करता सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या पंचनाम्याप्रमाणे विमा रक्कम अदा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे, तर परत केलेला पैसा हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा आहे. हा पैसा राज्यातील इतर जिल्ह्यांत वळवण्याचा घाट असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली आहे.