शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

निराधारांना अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST

अंबाजोगाई :कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात निराधारांना एक हजार रुपये मदत देण्याची ...

अंबाजोगाई :कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात निराधारांना एक हजार रुपये मदत देण्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने निराधारांना तात्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी मानवलोक जनसहयोगचे शाम सरवदे यांनी केली आहे.

कोरोनाविषयक नियमांचे पालन करा

अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप घोणसीकर यांनी केले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला

अंबाजोगाई : लसीकरण असो अथवा कोरोना रुग्णांवरील उपचार या दोन्ही कामात आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. सध्या तालुक्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लस पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होऊ लागली आहे. याचा आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठा ताण वाढू लागला आहे.

कडक उन्हाळा, आरोग्य सांभाळा

अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. वाढत्या उन्हापासून नागरिकांनी आपले योग्य संरक्षण करावे, काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, कडक उन्हात बाहेर फिरणे टाळावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ .विवेक कुलकर्णी कुंभारीकर यांनी केले आहे.

प्लाझ्माबाबत वाढतेय जनजागृती

अंबाजोगाई : कोरोनाबधित रुग्णाला प्लाझ्मा दिल्यानंतर तो रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लाझ्माबाबत जनजागृती सुरू आहे. याला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णांना प्लाझ्मा दिलासादायक ठरू शकतो. यासाठी ज्यांना कोरोना होऊन गेला, अशा व्यक्तींनी प्लाझा देण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे विभागीय समन्वयक संतोष कुंकुलोळ यांनी केले आहे.

वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवा

अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात सध्या विजेच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झालेले आहेत. मांजरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, सध्या वीज उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ३३ के.व्ही. उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची गरज असून पाण्याची उपलब्धता असल्याने पिकांना पाणी देता येईल. त्यामुळे क्षमता वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.