शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

निराधारांना अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST

अंबाजोगाई :कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात निराधारांना एक हजार रुपये मदत देण्याची ...

अंबाजोगाई :कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात निराधारांना एक हजार रुपये मदत देण्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने निराधारांना तात्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी मानवलोक जनसहयोगचे शाम सरवदे यांनी केली आहे.

कोरोनाविषयक नियमांचे पालन करा

अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप घोणसीकर यांनी केले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला

अंबाजोगाई : लसीकरण असो अथवा कोरोना रुग्णांवरील उपचार या दोन्ही कामात आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. सध्या तालुक्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लस पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होऊ लागली आहे. याचा आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठा ताण वाढू लागला आहे.

कडक उन्हाळा, आरोग्य सांभाळा

अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. वाढत्या उन्हापासून नागरिकांनी आपले योग्य संरक्षण करावे, काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, कडक उन्हात बाहेर फिरणे टाळावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ .विवेक कुलकर्णी कुंभारीकर यांनी केले आहे.

प्लाझ्माबाबत वाढतेय जनजागृती

अंबाजोगाई : कोरोनाबधित रुग्णाला प्लाझ्मा दिल्यानंतर तो रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लाझ्माबाबत जनजागृती सुरू आहे. याला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णांना प्लाझ्मा दिलासादायक ठरू शकतो. यासाठी ज्यांना कोरोना होऊन गेला, अशा व्यक्तींनी प्लाझा देण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे विभागीय समन्वयक संतोष कुंकुलोळ यांनी केले आहे.

वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवा

अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात सध्या विजेच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झालेले आहेत. मांजरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, सध्या वीज उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ३३ के.व्ही. उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची गरज असून पाण्याची उपलब्धता असल्याने पिकांना पाणी देता येईल. त्यामुळे क्षमता वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.