शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांना अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST

अंबाजोगाई :कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात निराधारांना एक हजार रुपये मदत देण्याची ...

अंबाजोगाई :कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात निराधारांना एक हजार रुपये मदत देण्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने निराधारांना तात्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी मानवलोक जनसहयोगचे शाम सरवदे यांनी केली आहे.

कोरोनाविषयक नियमांचे पालन करा

अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप घोणसीकर यांनी केले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला

अंबाजोगाई : लसीकरण असो अथवा कोरोना रुग्णांवरील उपचार या दोन्ही कामात आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. सध्या तालुक्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लस पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होऊ लागली आहे. याचा आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठा ताण वाढू लागला आहे.

कडक उन्हाळा, आरोग्य सांभाळा

अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. वाढत्या उन्हापासून नागरिकांनी आपले योग्य संरक्षण करावे, काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, कडक उन्हात बाहेर फिरणे टाळावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ .विवेक कुलकर्णी कुंभारीकर यांनी केले आहे.

प्लाझ्माबाबत वाढतेय जनजागृती

अंबाजोगाई : कोरोनाबधित रुग्णाला प्लाझ्मा दिल्यानंतर तो रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लाझ्माबाबत जनजागृती सुरू आहे. याला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णांना प्लाझ्मा दिलासादायक ठरू शकतो. यासाठी ज्यांना कोरोना होऊन गेला, अशा व्यक्तींनी प्लाझा देण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे विभागीय समन्वयक संतोष कुंकुलोळ यांनी केले आहे.

वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवा

अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात सध्या विजेच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झालेले आहेत. मांजरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, सध्या वीज उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ३३ के.व्ही. उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची गरज असून पाण्याची उपलब्धता असल्याने पिकांना पाणी देता येईल. त्यामुळे क्षमता वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.