शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

परळीच्या राखमिश्रित विटांना चार राज्यांत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:43 IST

येथील औष्णिक विद्युत केंद्रातील अनेक संच बंद असतानाही वीजनिर्मितीसाठी पूर्वी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. राखेपासून तयार झालेली वीट तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकराज्यात लोकप्रिय झाली आहे. या व्यवसायामुळे कामगारांना रोजगार मिळत आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेला आधार। औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कोळसा जाळल्यानंतर तयार होणाऱ्या राखेतून मोठा रोजगार

संजय खाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रातील अनेक संच बंद असतानाही वीजनिर्मितीसाठी पूर्वी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. राखेपासून तयार झालेली वीट तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकराज्यात लोकप्रिय झाली आहे. या व्यवसायामुळे कामगारांना रोजगार मिळत आहे.राखमिश्रित वीट बांधकामासाठी वजनांस हलकी व टिकण्यास मजबूत असल्याने परळीच्या विटास मोठी मागणी आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईपर्यंत ही वीट जाते. शिवाय इतर राज्यातही पुरवठा होतो. तालुक्यातील टोकवाडी, नागापूर, दाऊतपूर, चांदापूर रोडवर, सिरसाळा व इतर प्रत्येक वीटभट्टीवर किमान ५० वीट कामगारांना दुष्काळात आधार मिळाला आहे. तर तालुक्यात ३० हजार कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परिणामी आठवडी बाजाराच्या दिवशी दर सोमवारी हे वीटभट्टी कामगार कपडे, किराणा, भाजीपाला व खरेदीसाठी परळीच्या बाजारपेठेत गर्दी करतात. बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल होते. नोव्हेंबर ते मे दरम्यान विटेचे उत्पादन केले जाते. वीटभट्टीवर कामासाठी जिंतूर, परभणी, गंगाखेड, लातूर येथून कामगार आलेले आहेत. कामगारांना ३५० रु पये रोज हजेरी मिळते. ७० टक्के राख व ३० टक्के मातीचा वापर करून वीट बनविली जाते. राखेमुळे वीट दर्जेदार बनते. पाणी विकत घेतले जाते. वीजनिर्मितीसाठी दगडी कोळशाचा वापर केला जातो. सध्या एक संच चालू आहे. दगडी कोळसा रेल्वेने कोळशाच्या खाणीतून परळीत येतो. कोळसा वीजनिर्मितीसाठी जाळल्यानंतरची राख दाऊतपूर व इंदपवाडी- टोकवाडी यथील राख तळ्यात पाण्यावाटे पाईपमधून सोडली जाते. ही राख ट्रॅक्टर, हायवा या वाहनातून वाहतूक केली जाते. ती राख वीटभट्टी चालक घेतात व सिमेंट उत्पादनासाठीही घेतली जाते. दहा वर्षांपासून परळी तालुक्यातील वीट उद्योग फोफावला आहे. यातून अनेकांचे जीवनमान उंचावले आहे तर कामगारांना रोजगार मिळत आहे. परळी शहर व परिसर राखेच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत.अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर याच राखेने अनेकांचे म्हणजे वीट उद्योग चालकांचे व कामगारांचे जीवन फुलल्याचे टोकवाडीचे बालाजी मुंडे, दाऊतपूरचे श्रीकांत फड म्हणाले.राखमिश्रित वीट टिकाऊ, मजबूतऔष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मितीसाठी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर राखतळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. या राखेपासून तयार झालेली वीट राखमिश्रित वीट टिकण्यास मजबूत असल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या चार राज्यात मागणी वाढली आहे. यामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :Beedबीड