शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

परळीच्या राखमिश्रित विटांना चार राज्यांत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:43 IST

येथील औष्णिक विद्युत केंद्रातील अनेक संच बंद असतानाही वीजनिर्मितीसाठी पूर्वी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. राखेपासून तयार झालेली वीट तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकराज्यात लोकप्रिय झाली आहे. या व्यवसायामुळे कामगारांना रोजगार मिळत आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेला आधार। औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कोळसा जाळल्यानंतर तयार होणाऱ्या राखेतून मोठा रोजगार

संजय खाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रातील अनेक संच बंद असतानाही वीजनिर्मितीसाठी पूर्वी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. राखेपासून तयार झालेली वीट तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकराज्यात लोकप्रिय झाली आहे. या व्यवसायामुळे कामगारांना रोजगार मिळत आहे.राखमिश्रित वीट बांधकामासाठी वजनांस हलकी व टिकण्यास मजबूत असल्याने परळीच्या विटास मोठी मागणी आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईपर्यंत ही वीट जाते. शिवाय इतर राज्यातही पुरवठा होतो. तालुक्यातील टोकवाडी, नागापूर, दाऊतपूर, चांदापूर रोडवर, सिरसाळा व इतर प्रत्येक वीटभट्टीवर किमान ५० वीट कामगारांना दुष्काळात आधार मिळाला आहे. तर तालुक्यात ३० हजार कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परिणामी आठवडी बाजाराच्या दिवशी दर सोमवारी हे वीटभट्टी कामगार कपडे, किराणा, भाजीपाला व खरेदीसाठी परळीच्या बाजारपेठेत गर्दी करतात. बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल होते. नोव्हेंबर ते मे दरम्यान विटेचे उत्पादन केले जाते. वीटभट्टीवर कामासाठी जिंतूर, परभणी, गंगाखेड, लातूर येथून कामगार आलेले आहेत. कामगारांना ३५० रु पये रोज हजेरी मिळते. ७० टक्के राख व ३० टक्के मातीचा वापर करून वीट बनविली जाते. राखेमुळे वीट दर्जेदार बनते. पाणी विकत घेतले जाते. वीजनिर्मितीसाठी दगडी कोळशाचा वापर केला जातो. सध्या एक संच चालू आहे. दगडी कोळसा रेल्वेने कोळशाच्या खाणीतून परळीत येतो. कोळसा वीजनिर्मितीसाठी जाळल्यानंतरची राख दाऊतपूर व इंदपवाडी- टोकवाडी यथील राख तळ्यात पाण्यावाटे पाईपमधून सोडली जाते. ही राख ट्रॅक्टर, हायवा या वाहनातून वाहतूक केली जाते. ती राख वीटभट्टी चालक घेतात व सिमेंट उत्पादनासाठीही घेतली जाते. दहा वर्षांपासून परळी तालुक्यातील वीट उद्योग फोफावला आहे. यातून अनेकांचे जीवनमान उंचावले आहे तर कामगारांना रोजगार मिळत आहे. परळी शहर व परिसर राखेच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत.अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर याच राखेने अनेकांचे म्हणजे वीट उद्योग चालकांचे व कामगारांचे जीवन फुलल्याचे टोकवाडीचे बालाजी मुंडे, दाऊतपूरचे श्रीकांत फड म्हणाले.राखमिश्रित वीट टिकाऊ, मजबूतऔष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मितीसाठी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर राखतळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. या राखेपासून तयार झालेली वीट राखमिश्रित वीट टिकण्यास मजबूत असल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या चार राज्यात मागणी वाढली आहे. यामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :Beedबीड