शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

परळीच्या राखमिश्रित विटांना चार राज्यांत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:43 IST

येथील औष्णिक विद्युत केंद्रातील अनेक संच बंद असतानाही वीजनिर्मितीसाठी पूर्वी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. राखेपासून तयार झालेली वीट तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकराज्यात लोकप्रिय झाली आहे. या व्यवसायामुळे कामगारांना रोजगार मिळत आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेला आधार। औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कोळसा जाळल्यानंतर तयार होणाऱ्या राखेतून मोठा रोजगार

संजय खाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रातील अनेक संच बंद असतानाही वीजनिर्मितीसाठी पूर्वी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. राखेपासून तयार झालेली वीट तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकराज्यात लोकप्रिय झाली आहे. या व्यवसायामुळे कामगारांना रोजगार मिळत आहे.राखमिश्रित वीट बांधकामासाठी वजनांस हलकी व टिकण्यास मजबूत असल्याने परळीच्या विटास मोठी मागणी आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईपर्यंत ही वीट जाते. शिवाय इतर राज्यातही पुरवठा होतो. तालुक्यातील टोकवाडी, नागापूर, दाऊतपूर, चांदापूर रोडवर, सिरसाळा व इतर प्रत्येक वीटभट्टीवर किमान ५० वीट कामगारांना दुष्काळात आधार मिळाला आहे. तर तालुक्यात ३० हजार कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परिणामी आठवडी बाजाराच्या दिवशी दर सोमवारी हे वीटभट्टी कामगार कपडे, किराणा, भाजीपाला व खरेदीसाठी परळीच्या बाजारपेठेत गर्दी करतात. बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल होते. नोव्हेंबर ते मे दरम्यान विटेचे उत्पादन केले जाते. वीटभट्टीवर कामासाठी जिंतूर, परभणी, गंगाखेड, लातूर येथून कामगार आलेले आहेत. कामगारांना ३५० रु पये रोज हजेरी मिळते. ७० टक्के राख व ३० टक्के मातीचा वापर करून वीट बनविली जाते. राखेमुळे वीट दर्जेदार बनते. पाणी विकत घेतले जाते. वीजनिर्मितीसाठी दगडी कोळशाचा वापर केला जातो. सध्या एक संच चालू आहे. दगडी कोळसा रेल्वेने कोळशाच्या खाणीतून परळीत येतो. कोळसा वीजनिर्मितीसाठी जाळल्यानंतरची राख दाऊतपूर व इंदपवाडी- टोकवाडी यथील राख तळ्यात पाण्यावाटे पाईपमधून सोडली जाते. ही राख ट्रॅक्टर, हायवा या वाहनातून वाहतूक केली जाते. ती राख वीटभट्टी चालक घेतात व सिमेंट उत्पादनासाठीही घेतली जाते. दहा वर्षांपासून परळी तालुक्यातील वीट उद्योग फोफावला आहे. यातून अनेकांचे जीवनमान उंचावले आहे तर कामगारांना रोजगार मिळत आहे. परळी शहर व परिसर राखेच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत.अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर याच राखेने अनेकांचे म्हणजे वीट उद्योग चालकांचे व कामगारांचे जीवन फुलल्याचे टोकवाडीचे बालाजी मुंडे, दाऊतपूरचे श्रीकांत फड म्हणाले.राखमिश्रित वीट टिकाऊ, मजबूतऔष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मितीसाठी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर राखतळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. या राखेपासून तयार झालेली वीट राखमिश्रित वीट टिकण्यास मजबूत असल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या चार राज्यात मागणी वाढली आहे. यामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :Beedबीड