शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटप करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:34 IST

.... बँकांचे व्यवहार ठप्प धानोरा : कोरोना लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील बँकांचे व्यवहार ठप्प आहेत. अनेक बँकांचे कामकाज गेट बंद ...

....

बँकांचे व्यवहार ठप्प

धानोरा : कोरोना लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील बँकांचे व्यवहार ठप्प आहेत. अनेक बँकांचे कामकाज गेट बंद करुन चालते. बँकेत ग्राहकांंना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे चेकबुक, एटीएम कार्ड, पासबुकांवरील नोंद करणे अशी अनेक कामे खोळंबली आहेत. लॉकडाऊन उठताच या कामांना बँकांनी प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.

....

पेट्रोल दरवाढीचा शेतकऱ्यांना ही फटका

बीड : पेट्रोल, डिझेलची मोठी दरवाढ झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरची नांगरणी, कोळपणीचे भाव वाढले आहेत. तसेच जेसीबीचे दर वाढले आहेत. बाजारात माल विक्रीसाठी नेण्यासाठी मालवाहतुकीचे दरवाढ झाली आहे. परंतु शेतीमालाला भाव नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

....

पाणी अडविण्याची गरज

कडा : आष्टी तालुक्याच्या डोंगराळ भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. डोंगरी भागात अजून पाणी अडविण्यासाठी हजारो ठिकाणे आहेत. याठिकाणी छोटे व मध्यम प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. अनेक नद्यांचे पाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून अडविणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने पाणी अडविल्याने पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

....

तूर पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

आष्टी : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस आला की शेतकरी पेरणीच्या तयारीला लागणार आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, मूग पेरणी शिवाय यंदा तूर पिकांकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. याचे कारण तूर पिकांच्या काढणीसाठी हार्वेस्टर मशीन सहज उपलब्ध होत आहे.

....

बोअरवेल पंप, टीव्ही जळाले

धानोरा : गेल्या १५ दिवसांपूर्वी हिवरा, पिंपरखेड परिसरात जादा दाबाने वीजपुरवठा झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल वरील मोटारी जळाल्या. अनेक नागरिकांचे घरातील टीव्ही व इतर इलेक्ट्रिकल वस्तूही नामशेष झाल्या आहेत. मोटारी जळाल्याचा शेतकऱ्यांचा मोठा फटका बसला. याबाबत महावितरणकडे विचारणा केली असता येथील सबस्टेशन मधील डिपींना आर्थिंगसाठी पाणी उपलब्ध नसल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.

....

दूध दरवाढ करण्याची मागणी

आष्टी : तालुक्यात अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. दूध डेअरीवर शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. जनावरांना लागणारा चारा, पशुखाद्याचे भाव वाढले आहेत. यामुळे खर्चाचा ताळमेळ बसत नाही. तरी शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ मिळावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी वर्गातून होत आहे.

....