शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

माहिती अपलोड करण्याच्या दिरंगाईमुळे जिल्हा नियोजन बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:50 IST

बीड : मागील वर्षी कोरोना संकटामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या कामांचा निधी रखडला होता. विकासकामांची गती मंदावली होती. वेळोवेळी सूचना ...

बीड : मागील वर्षी कोरोना संकटामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या कामांचा निधी रखडला होता. विकासकामांची गती मंदावली होती. वेळोवेळी सूचना देऊनदेखील विविध प्रशासकीय विभागप्रमुखांनी ‘आयपास’ या ऑनलाइन प्रणालीवर झालेल्या कामांची माहिती अपलोड केली नाही. त्यामुळे शासनाकडून जिल्हा नियोजनचा वार्षिक निधी मिळण्यास विलंब झाला, तसेच त्यानंतरही अनेक विभागांकडून कामांची मागणी अपलोड न झाल्यामुळे निधी वितरण रखडले. याचा परिणाम जिल्हा नियोजन बिघडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

२०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोनामुळे राज्य शासनाकडून निधी मिळाला नव्हता. त्यामुळे अनेक कामे झाल्यानंतरदेखील कंत्राटदारांची देयके रखडली होती. दरम्यान, नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यांत जिल्हा नियोजन समितीला राज्य शासनाकडून २९९ कोटी रुपये निधी प्राप्त झाला. त्यापूर्वी २०१९ मध्ये केलेल्या कामांची सर्व माहिती ‘आयपास’ ऑनलाइन प्रणालीवर अपलोड करण्याचे आदेश शासनाने सर्व प्रशासकीय कार्यालयप्रमुखांना दिले होते. मात्र, अनेक विभागप्रमुखांकडून ती माहिती पाठवण्यास दिरंगाई झाली, तसेच चुकीची माहिती भरण्यात आली. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्याला वार्षिक विकास निधीचे २९९ कोटी मिळण्यास विलंब झाला.

दरम्यान, जिल्हा नियोजन समितीकडे शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर २ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. त्यानंतर निधी वितरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र, विविध प्रशासकीय विभागांतील अधिकाऱ्यांना ‘आयपास’ यंत्रणेतील बारकावे माहिती नसल्यामुळे माहिती अपलोड करण्यास विलंब होत आहे.

कोणत्या विभागाला किती मिळणार निधी

जिल्हा परिषद - १३७ कोटी ७३ लाख

नगरविकास - ३६ कोटी ९ लाख

राज्यस्तरीय यंत्रणा - ७६ कोटी ६७ लाख

चौकट,

जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले खडे बोल

‘आयपास’ प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर राज्य शासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनदेखील बहुतांश विभागांकडून माहिती अपलोड केली नाही. त्यामुळे शासनाकडून पैसे येण्यास इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उशीर झाला आहे. त्यामुळे तात्काळ माहिती अपलोड न करणाऱ्या विभागप्रमुखांना जिल्हाधिकाऱ्यांनी खडे बोल सुनावले असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. जिल्हा नियोजनचा विकास निधी मार्चपूर्वी खर्च व्हावा यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी स्वत: लक्ष घातले आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा नियोजन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सुटीच्या दिवशीदेखील कर्तव्य बजावत आहेत.

प्रतिक्रिया

जिल्हा नियोजनचा पैसा विभागांना वेळेत मिळावा, तसेच त्या माध्यमातून विकासाला गती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काम सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत खर्चाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी कामकाज करत आहेत.

-रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी बीड