शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

माजलगाव तालुक्यात कापसाच्या उत्पादनात घट, उत्पन्न 50 कोटीने झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 15:31 IST

माजलगाव तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे उत्पन्न कमालीचे घटले असुन यावर्षी 56 हजार क्विंटल कापुस कमी झाला आहे. यामुळे शेतक-यांना तब्बल शेतक-यांना 50 कोटींचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देतालुक्यात खरीप हंगामात एकुण जमीनीपैकी 50 टक्के पेरा हा कापुस या पिकाचा असतो. मागील वर्षी 35 हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती त्या तुलनेत या वर्षी 38 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती.बोंडअळीच्या प्रभावामुळे शेवटच्या टप्प्यात उत्पादनात घट झाली.याचा फटका थेट शहराच्या बाजारपेठेवर झाला असून त्यातून 50 कोटी कमी झाले आहेत. 

- पुरुषोत्तम करवा 

माजलगाव (बीड) : तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे उत्पन्न कमालीचे घटले असुन यावर्षी 56 हजार क्विंटल कापुस कमी झाला आहे. यामुळे शेतक-यांना तब्बल शेतक-यांना 50 कोटींचा फटका बसला आहे. याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर पडला असून ती ओस पडल्याचे चित्र सद्या पहावयास मिळत आहे. 

पांढर सोनं म्हणून ओळखण्यात येत असलेल्या कापसाच्या उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळते. यामुळे माजलगांव तालुक्यात कापसाचे पिक मोठया प्रमाणावर घेण्यात येते. कापसाच्या पिकावर शेतक-यांची भिस्त असते,यातून मिळणा-या उत्पन्नातूनच  शहराची बाजारपेठ देखील मोठयाप्रमाणावर चालते. तालुक्यात खरीप हंगामात एकुण जमीनीपैकी 50 टक्के पेरा हा कापुस या पिकाचा असतो. मागील वर्षी 35 हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती त्या तुलनेत या वर्षी 38 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र, क्षेत्रात वाढ होऊनही उत्पन्नत मात्र वाढ झाली नाही. 

शेवटच्या टप्प्यात बोंडअळीचा फटका या वर्षी पडलेल्या पावसाची सरासरी पाहता शेवटच्या टप्प्यात कापसाचे चांगले उत्पन्न शेतक-यांनी गृहित धरले होते. मात्र, बोंडअळीच्या प्रभावामुळे शेवटच्या टप्प्यात उत्पादनात घट झाली. 80 टक्के शेतक-यांच्या एक दोन वेचण्या झाल्यानंतर कापसाचा झाडा झाला. 

गेल्यावर्षी कापसाला सरासरी 4 हजार 150 ते 5 हजार 575 इतका भाव मिळाला होता. गेल्यावर्षी 31 डिसेंबर 2016 पर्यंत 2 लाख 41 हजार 114 क्विंटल कापुस बाजार समिती कार्यक्षेत्रात 10 जिनींगच्या माध्यमातुन खरेदी झाला. यातुन शेतक-यांना 126 कोटी 91 लाख 86 हजार 127 रुपये मिळाले होते. या वर्षी 31 डिसेंबर 2017 पर्यंत बाजार समिती कार्यक्षेत्रात 10 जिनींग मार्फत 1 लाख 85 हजार 350 क्विंटल कापसाची खरेदी झाली जी गेल्यावर्षीच्या तुलनेत 55 हजार 764 क्विंटलने कमी आहे. शेतक-यांना यावर्षी सरासरी 4 हजार 200 ते 5 हजार 200 इतका भाव मिळाला यातुन शेतक-यांना 82 कोटी 30 लाख 66 हजार 148 येवढी रक्कम मिळाली ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 44 कोट 61 लाख 19 हजार 997 रुपयांनी कमी झाले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव डी.बी. फुके यांनी दिली. गेल्यावर्षी कापसाचे उत्पन्न चांगले झाल्यामुळे यावर्षी माजलगांव तालुक्यात कापसाची लागवड ही 3 हजार हेक्टरने वाढली. त्या तुलनेत उत्पन्नात मात्र घट झाली. याचा परिणाम थेट येथील बाजार पेठेवर झाला असुन मागील दोन महिन्यांपासुन बाजारपेठेत शुकशुकाट पहावयास मिळत आहे. 

५० कोटीचा फटका बसला यावर्षी कापसाचे उत्पादन घटल्याने यातून कमी उत्पन्न मिळाले आहे. याचा फटका थेट शहराच्या बाजारपेठेवर झाला असून त्यातून 50 कोटी कमी झाले आहेत. - अशोक डक, सभापती, माजलगाव बाजार समिती 

टॅग्स :cottonकापूसBeedबीड