शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव तालुक्यात कापसाच्या उत्पादनात घट, उत्पन्न 50 कोटीने झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 15:31 IST

माजलगाव तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे उत्पन्न कमालीचे घटले असुन यावर्षी 56 हजार क्विंटल कापुस कमी झाला आहे. यामुळे शेतक-यांना तब्बल शेतक-यांना 50 कोटींचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देतालुक्यात खरीप हंगामात एकुण जमीनीपैकी 50 टक्के पेरा हा कापुस या पिकाचा असतो. मागील वर्षी 35 हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती त्या तुलनेत या वर्षी 38 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती.बोंडअळीच्या प्रभावामुळे शेवटच्या टप्प्यात उत्पादनात घट झाली.याचा फटका थेट शहराच्या बाजारपेठेवर झाला असून त्यातून 50 कोटी कमी झाले आहेत. 

- पुरुषोत्तम करवा 

माजलगाव (बीड) : तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे उत्पन्न कमालीचे घटले असुन यावर्षी 56 हजार क्विंटल कापुस कमी झाला आहे. यामुळे शेतक-यांना तब्बल शेतक-यांना 50 कोटींचा फटका बसला आहे. याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर पडला असून ती ओस पडल्याचे चित्र सद्या पहावयास मिळत आहे. 

पांढर सोनं म्हणून ओळखण्यात येत असलेल्या कापसाच्या उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळते. यामुळे माजलगांव तालुक्यात कापसाचे पिक मोठया प्रमाणावर घेण्यात येते. कापसाच्या पिकावर शेतक-यांची भिस्त असते,यातून मिळणा-या उत्पन्नातूनच  शहराची बाजारपेठ देखील मोठयाप्रमाणावर चालते. तालुक्यात खरीप हंगामात एकुण जमीनीपैकी 50 टक्के पेरा हा कापुस या पिकाचा असतो. मागील वर्षी 35 हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती त्या तुलनेत या वर्षी 38 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र, क्षेत्रात वाढ होऊनही उत्पन्नत मात्र वाढ झाली नाही. 

शेवटच्या टप्प्यात बोंडअळीचा फटका या वर्षी पडलेल्या पावसाची सरासरी पाहता शेवटच्या टप्प्यात कापसाचे चांगले उत्पन्न शेतक-यांनी गृहित धरले होते. मात्र, बोंडअळीच्या प्रभावामुळे शेवटच्या टप्प्यात उत्पादनात घट झाली. 80 टक्के शेतक-यांच्या एक दोन वेचण्या झाल्यानंतर कापसाचा झाडा झाला. 

गेल्यावर्षी कापसाला सरासरी 4 हजार 150 ते 5 हजार 575 इतका भाव मिळाला होता. गेल्यावर्षी 31 डिसेंबर 2016 पर्यंत 2 लाख 41 हजार 114 क्विंटल कापुस बाजार समिती कार्यक्षेत्रात 10 जिनींगच्या माध्यमातुन खरेदी झाला. यातुन शेतक-यांना 126 कोटी 91 लाख 86 हजार 127 रुपये मिळाले होते. या वर्षी 31 डिसेंबर 2017 पर्यंत बाजार समिती कार्यक्षेत्रात 10 जिनींग मार्फत 1 लाख 85 हजार 350 क्विंटल कापसाची खरेदी झाली जी गेल्यावर्षीच्या तुलनेत 55 हजार 764 क्विंटलने कमी आहे. शेतक-यांना यावर्षी सरासरी 4 हजार 200 ते 5 हजार 200 इतका भाव मिळाला यातुन शेतक-यांना 82 कोटी 30 लाख 66 हजार 148 येवढी रक्कम मिळाली ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 44 कोट 61 लाख 19 हजार 997 रुपयांनी कमी झाले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव डी.बी. फुके यांनी दिली. गेल्यावर्षी कापसाचे उत्पन्न चांगले झाल्यामुळे यावर्षी माजलगांव तालुक्यात कापसाची लागवड ही 3 हजार हेक्टरने वाढली. त्या तुलनेत उत्पन्नात मात्र घट झाली. याचा परिणाम थेट येथील बाजार पेठेवर झाला असुन मागील दोन महिन्यांपासुन बाजारपेठेत शुकशुकाट पहावयास मिळत आहे. 

५० कोटीचा फटका बसला यावर्षी कापसाचे उत्पादन घटल्याने यातून कमी उत्पन्न मिळाले आहे. याचा फटका थेट शहराच्या बाजारपेठेवर झाला असून त्यातून 50 कोटी कमी झाले आहेत. - अशोक डक, सभापती, माजलगाव बाजार समिती 

टॅग्स :cottonकापूसBeedबीड