शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव तालुक्यात २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:54 IST

माजलगाव तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या गारपिटीने जवळपास २०० हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज येथील महसूल विभागाचा अहवालावरुन दिसुन आहे. दोन दिवस उलटूनही अद्याप गारपीट झालेल्या गावात प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरुवात झालेली नसल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपंचनाम्याला अद्यापही सुरूवातच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या गारपिटीने जवळपास २०० हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज येथील महसूल विभागाचा अहवालावरुन दिसुन आहे. दोन दिवस उलटूनही अद्याप गारपीट झालेल्या गावात प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरुवात झालेली नसल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यातील गोदावरी पात्राशेजारील गावांसह अनेक गावांमध्ये वादळी वाºयासह गारांचा तडाखा बसला होता. त्यामुळे शेतांमध्ये उभे असलेले पीक अक्षरश: नेस्तनाबूत झाले. येथील महसुल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यातील सहापैकी दोन सर्कल हे गारांच्या तडाख्यात सापडले. मंगरुळ नं. २, हिवरा, रामपिंपळगांव, काळेगांव थडी, डुब्बाथडी, गव्हाणथडी, जदीदजवळा या गावांमधील ४४२ शेतक-यांच्या एकूण १९५ हेक्टर जमिनीमधील पिकांची पार वाताहत लागली आहे. यात पपई ५ हेक्टर, हरभरा ११६ हेक्टर, गहू ६९ हेक्टर, मोसंबी ५ हेक्टर असे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाच्या अहवालावरुन दिसतो.

गारपीट होवून दोन दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप पिकांचे पंचनामे करण्यासंदर्भात प्रशासनाने कुठलेही पाउल उचलल्याचे दिसून येत नाही. अद्याप तलाठी, मंडळाधिकारी यांना कसल्याही प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गारपिटीचे पंचनामे कधी होणार आणि आम्हाला कधी मदत मिळणार अशी शंका उपस्थित होत आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे सुरु करावेत, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.

वादळी तडाख्यात दीड एकर पपईची लागली वाताहतमंगरुळ नं. २ येथील शेतकरी रवींद्र राजेभाऊ बापमारे यांना केवळ दीड एकर जमीन आहे व त्यात त्यांनी पपईचे पीक घेतले होते. पपईच्या फळांचा सौदा देखील झाला होता. आठ दिवसांपासून व्यापारी आज माल नेतो उद्या नेतो असे म्हटल्यामुळे पपई शेतातच राहिली. परंतु आस्मानीने या शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यासाठी शेतकरी बापमारे याने जवळपास दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. आता हे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत शेतकरी असून, शासनाच्या मदतीशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही. तर काळेगाव येथील शेतकरी सुनिल गोविंदराव तौर याचे ६० एकरांवर असलेले हरभºयाचे पीक धुळीस मिळाले असून, त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ते हतबल झाले आहेत.