शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

माजलगाव तालुक्यात २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:54 IST

माजलगाव तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या गारपिटीने जवळपास २०० हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज येथील महसूल विभागाचा अहवालावरुन दिसुन आहे. दोन दिवस उलटूनही अद्याप गारपीट झालेल्या गावात प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरुवात झालेली नसल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपंचनाम्याला अद्यापही सुरूवातच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या गारपिटीने जवळपास २०० हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज येथील महसूल विभागाचा अहवालावरुन दिसुन आहे. दोन दिवस उलटूनही अद्याप गारपीट झालेल्या गावात प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरुवात झालेली नसल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यातील गोदावरी पात्राशेजारील गावांसह अनेक गावांमध्ये वादळी वाºयासह गारांचा तडाखा बसला होता. त्यामुळे शेतांमध्ये उभे असलेले पीक अक्षरश: नेस्तनाबूत झाले. येथील महसुल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यातील सहापैकी दोन सर्कल हे गारांच्या तडाख्यात सापडले. मंगरुळ नं. २, हिवरा, रामपिंपळगांव, काळेगांव थडी, डुब्बाथडी, गव्हाणथडी, जदीदजवळा या गावांमधील ४४२ शेतक-यांच्या एकूण १९५ हेक्टर जमिनीमधील पिकांची पार वाताहत लागली आहे. यात पपई ५ हेक्टर, हरभरा ११६ हेक्टर, गहू ६९ हेक्टर, मोसंबी ५ हेक्टर असे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाच्या अहवालावरुन दिसतो.

गारपीट होवून दोन दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप पिकांचे पंचनामे करण्यासंदर्भात प्रशासनाने कुठलेही पाउल उचलल्याचे दिसून येत नाही. अद्याप तलाठी, मंडळाधिकारी यांना कसल्याही प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गारपिटीचे पंचनामे कधी होणार आणि आम्हाला कधी मदत मिळणार अशी शंका उपस्थित होत आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे सुरु करावेत, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.

वादळी तडाख्यात दीड एकर पपईची लागली वाताहतमंगरुळ नं. २ येथील शेतकरी रवींद्र राजेभाऊ बापमारे यांना केवळ दीड एकर जमीन आहे व त्यात त्यांनी पपईचे पीक घेतले होते. पपईच्या फळांचा सौदा देखील झाला होता. आठ दिवसांपासून व्यापारी आज माल नेतो उद्या नेतो असे म्हटल्यामुळे पपई शेतातच राहिली. परंतु आस्मानीने या शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यासाठी शेतकरी बापमारे याने जवळपास दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. आता हे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत शेतकरी असून, शासनाच्या मदतीशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही. तर काळेगाव येथील शेतकरी सुनिल गोविंदराव तौर याचे ६० एकरांवर असलेले हरभºयाचे पीक धुळीस मिळाले असून, त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ते हतबल झाले आहेत.