शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव तालुक्यात २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:54 IST

माजलगाव तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या गारपिटीने जवळपास २०० हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज येथील महसूल विभागाचा अहवालावरुन दिसुन आहे. दोन दिवस उलटूनही अद्याप गारपीट झालेल्या गावात प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरुवात झालेली नसल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपंचनाम्याला अद्यापही सुरूवातच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या गारपिटीने जवळपास २०० हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज येथील महसूल विभागाचा अहवालावरुन दिसुन आहे. दोन दिवस उलटूनही अद्याप गारपीट झालेल्या गावात प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरुवात झालेली नसल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यातील गोदावरी पात्राशेजारील गावांसह अनेक गावांमध्ये वादळी वाºयासह गारांचा तडाखा बसला होता. त्यामुळे शेतांमध्ये उभे असलेले पीक अक्षरश: नेस्तनाबूत झाले. येथील महसुल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यातील सहापैकी दोन सर्कल हे गारांच्या तडाख्यात सापडले. मंगरुळ नं. २, हिवरा, रामपिंपळगांव, काळेगांव थडी, डुब्बाथडी, गव्हाणथडी, जदीदजवळा या गावांमधील ४४२ शेतक-यांच्या एकूण १९५ हेक्टर जमिनीमधील पिकांची पार वाताहत लागली आहे. यात पपई ५ हेक्टर, हरभरा ११६ हेक्टर, गहू ६९ हेक्टर, मोसंबी ५ हेक्टर असे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाच्या अहवालावरुन दिसतो.

गारपीट होवून दोन दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप पिकांचे पंचनामे करण्यासंदर्भात प्रशासनाने कुठलेही पाउल उचलल्याचे दिसून येत नाही. अद्याप तलाठी, मंडळाधिकारी यांना कसल्याही प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गारपिटीचे पंचनामे कधी होणार आणि आम्हाला कधी मदत मिळणार अशी शंका उपस्थित होत आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे सुरु करावेत, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.

वादळी तडाख्यात दीड एकर पपईची लागली वाताहतमंगरुळ नं. २ येथील शेतकरी रवींद्र राजेभाऊ बापमारे यांना केवळ दीड एकर जमीन आहे व त्यात त्यांनी पपईचे पीक घेतले होते. पपईच्या फळांचा सौदा देखील झाला होता. आठ दिवसांपासून व्यापारी आज माल नेतो उद्या नेतो असे म्हटल्यामुळे पपई शेतातच राहिली. परंतु आस्मानीने या शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यासाठी शेतकरी बापमारे याने जवळपास दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. आता हे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत शेतकरी असून, शासनाच्या मदतीशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही. तर काळेगाव येथील शेतकरी सुनिल गोविंदराव तौर याचे ६० एकरांवर असलेले हरभºयाचे पीक धुळीस मिळाले असून, त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ते हतबल झाले आहेत.