शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

धारूर पोलिसांना निष्काळजीपणा अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:43 IST

धारूर तालुक्यातील गावंदरा येथे सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी केवळ चौघांचे पथक गेले. आरोपीला पकडणे तर दुरच उलट त्यांचा मार खाऊन परतणाºया धारूर पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा या मागचा नेमका उद्देश काय होता? याबाबत तर्कवितर्क लावले जात असून पोलीस उपनिरीक्षकांची खात्याअंतर्गत चौकशी लागल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देगावंदरा हल्ला प्रकरण : सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले सहज; खात्यांतर्गत चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : धारूर तालुक्यातील गावंदरा येथे सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी केवळ चौघांचे पथक गेले. आरोपीला पकडणे तर दुरच उलट त्यांचा मार खाऊन परतणाºया धारूर पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा या मागचा नेमका उद्देश काय होता? याबाबत तर्कवितर्क लावले जात असून पोलीस उपनिरीक्षकांची खात्याअंतर्गत चौकशी लागल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, निष्काळजीपणामुळे विलास बडेने पलायन केले होते, त्यानंतर याप्रकरणातही आरोपीने पलायन केले आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला भाऊसाहेब राठोड हा सराईत गुन्हेगार आहे. तो गावंदरा येथे असल्याची माहिती मिळताच धारूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे हे इतर तीन कर्मचाºयांसह गावंदरा तांड्यावर गेले. सहज जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु अचानक मोठा जमाव अंगावर आला आणि पोलिसांच्या हातातील आरोपी सहज पळवून नेला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर पोलिसांना उसाने मारले. तशी फिर्याद धारूर ठाण्यात नोंद आहे.

त्यानंतर गुन्हा दाखल झाला. परंतु धारूर पोलिसांच्या कामगिरीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या सर्वांची उपविभागीय पोलीस अधिकाºयांमार्फत चौकशी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यामुळे धारुर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.यापूर्वीही ठाण्यातून गुन्हेगाराचे पलायनदोन महिन्यापूर्वी धारूर पोलीस ठाण्यातून विलास बडे नामक अट्टल गुन्हेगाराने पलायन केले होते.पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडून दिलेल्या आरोपीला धारूर पोलिसांना सांभाळण्यात अपयशी ठरले होते. आता पुन्हा गावंदरा प्रकरण घडल्याने येथील पोलिसांच्या कामगिरीबद्दल टीका होत आहे.

पीआय, पीएसआयच्या बोलण्यात तफावतपोउपनि घोळवे म्हणतात, आम्ही केवळ चौकशीसाठी गेलो होतो. आरोपी असल्याची माहिती नव्हती. तर पोनि गंधम म्हणतात, आरोपीला पकडण्यासाठीच आमचे कर्मचारी गेले होते. दोघांच्या बोलण्यात तफावत असल्याने संशायाची दोरी बळकट बनत चालली आहे. आता यामध्ये काय तथ्य? हे तपासातूनच समोर येणार आहे.

काय म्हणतात अधिकारी?कर्मचारी आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. याची कल्पना दिली होती. पुरेसा फोर्सही होता. आरोपीला पकडण्यापुर्वीच त्यांनी हल्ला केल्याचे समजले. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. -सुरेश गंधमपोलीस निरीक्षक, धारूर

आम्ही चौकशीसाठी गेलो होतो. आरोपीलाही पकडले होते. परंतु जमावाने आमच्या हातून त्याला पळविले. उलट आमच्यावर हल्ला केला. तो आरोपी तिथे आहे, हे आम्हाला माहिती असते, तर जास्त फोर्स नेला असता. आमच्याकडे कमी फोर्स होता आणि ते लोक जास्त होते.-चंद्रकांत घोळवेपोलीस उपनिरीक्षक, धारूर