शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धारूर पोलिसांना निष्काळजीपणा अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:43 IST

धारूर तालुक्यातील गावंदरा येथे सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी केवळ चौघांचे पथक गेले. आरोपीला पकडणे तर दुरच उलट त्यांचा मार खाऊन परतणाºया धारूर पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा या मागचा नेमका उद्देश काय होता? याबाबत तर्कवितर्क लावले जात असून पोलीस उपनिरीक्षकांची खात्याअंतर्गत चौकशी लागल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देगावंदरा हल्ला प्रकरण : सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले सहज; खात्यांतर्गत चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : धारूर तालुक्यातील गावंदरा येथे सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी केवळ चौघांचे पथक गेले. आरोपीला पकडणे तर दुरच उलट त्यांचा मार खाऊन परतणाºया धारूर पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा या मागचा नेमका उद्देश काय होता? याबाबत तर्कवितर्क लावले जात असून पोलीस उपनिरीक्षकांची खात्याअंतर्गत चौकशी लागल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, निष्काळजीपणामुळे विलास बडेने पलायन केले होते, त्यानंतर याप्रकरणातही आरोपीने पलायन केले आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला भाऊसाहेब राठोड हा सराईत गुन्हेगार आहे. तो गावंदरा येथे असल्याची माहिती मिळताच धारूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे हे इतर तीन कर्मचाºयांसह गावंदरा तांड्यावर गेले. सहज जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु अचानक मोठा जमाव अंगावर आला आणि पोलिसांच्या हातातील आरोपी सहज पळवून नेला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर पोलिसांना उसाने मारले. तशी फिर्याद धारूर ठाण्यात नोंद आहे.

त्यानंतर गुन्हा दाखल झाला. परंतु धारूर पोलिसांच्या कामगिरीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या सर्वांची उपविभागीय पोलीस अधिकाºयांमार्फत चौकशी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यामुळे धारुर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.यापूर्वीही ठाण्यातून गुन्हेगाराचे पलायनदोन महिन्यापूर्वी धारूर पोलीस ठाण्यातून विलास बडे नामक अट्टल गुन्हेगाराने पलायन केले होते.पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडून दिलेल्या आरोपीला धारूर पोलिसांना सांभाळण्यात अपयशी ठरले होते. आता पुन्हा गावंदरा प्रकरण घडल्याने येथील पोलिसांच्या कामगिरीबद्दल टीका होत आहे.

पीआय, पीएसआयच्या बोलण्यात तफावतपोउपनि घोळवे म्हणतात, आम्ही केवळ चौकशीसाठी गेलो होतो. आरोपी असल्याची माहिती नव्हती. तर पोनि गंधम म्हणतात, आरोपीला पकडण्यासाठीच आमचे कर्मचारी गेले होते. दोघांच्या बोलण्यात तफावत असल्याने संशायाची दोरी बळकट बनत चालली आहे. आता यामध्ये काय तथ्य? हे तपासातूनच समोर येणार आहे.

काय म्हणतात अधिकारी?कर्मचारी आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. याची कल्पना दिली होती. पुरेसा फोर्सही होता. आरोपीला पकडण्यापुर्वीच त्यांनी हल्ला केल्याचे समजले. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. -सुरेश गंधमपोलीस निरीक्षक, धारूर

आम्ही चौकशीसाठी गेलो होतो. आरोपीलाही पकडले होते. परंतु जमावाने आमच्या हातून त्याला पळविले. उलट आमच्यावर हल्ला केला. तो आरोपी तिथे आहे, हे आम्हाला माहिती असते, तर जास्त फोर्स नेला असता. आमच्याकडे कमी फोर्स होता आणि ते लोक जास्त होते.-चंद्रकांत घोळवेपोलीस उपनिरीक्षक, धारूर