शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

धारूर पोलिसांना निष्काळजीपणा अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:43 IST

धारूर तालुक्यातील गावंदरा येथे सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी केवळ चौघांचे पथक गेले. आरोपीला पकडणे तर दुरच उलट त्यांचा मार खाऊन परतणाºया धारूर पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा या मागचा नेमका उद्देश काय होता? याबाबत तर्कवितर्क लावले जात असून पोलीस उपनिरीक्षकांची खात्याअंतर्गत चौकशी लागल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देगावंदरा हल्ला प्रकरण : सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले सहज; खात्यांतर्गत चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : धारूर तालुक्यातील गावंदरा येथे सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी केवळ चौघांचे पथक गेले. आरोपीला पकडणे तर दुरच उलट त्यांचा मार खाऊन परतणाºया धारूर पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा या मागचा नेमका उद्देश काय होता? याबाबत तर्कवितर्क लावले जात असून पोलीस उपनिरीक्षकांची खात्याअंतर्गत चौकशी लागल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, निष्काळजीपणामुळे विलास बडेने पलायन केले होते, त्यानंतर याप्रकरणातही आरोपीने पलायन केले आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला भाऊसाहेब राठोड हा सराईत गुन्हेगार आहे. तो गावंदरा येथे असल्याची माहिती मिळताच धारूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे हे इतर तीन कर्मचाºयांसह गावंदरा तांड्यावर गेले. सहज जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु अचानक मोठा जमाव अंगावर आला आणि पोलिसांच्या हातातील आरोपी सहज पळवून नेला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर पोलिसांना उसाने मारले. तशी फिर्याद धारूर ठाण्यात नोंद आहे.

त्यानंतर गुन्हा दाखल झाला. परंतु धारूर पोलिसांच्या कामगिरीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या सर्वांची उपविभागीय पोलीस अधिकाºयांमार्फत चौकशी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यामुळे धारुर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.यापूर्वीही ठाण्यातून गुन्हेगाराचे पलायनदोन महिन्यापूर्वी धारूर पोलीस ठाण्यातून विलास बडे नामक अट्टल गुन्हेगाराने पलायन केले होते.पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडून दिलेल्या आरोपीला धारूर पोलिसांना सांभाळण्यात अपयशी ठरले होते. आता पुन्हा गावंदरा प्रकरण घडल्याने येथील पोलिसांच्या कामगिरीबद्दल टीका होत आहे.

पीआय, पीएसआयच्या बोलण्यात तफावतपोउपनि घोळवे म्हणतात, आम्ही केवळ चौकशीसाठी गेलो होतो. आरोपी असल्याची माहिती नव्हती. तर पोनि गंधम म्हणतात, आरोपीला पकडण्यासाठीच आमचे कर्मचारी गेले होते. दोघांच्या बोलण्यात तफावत असल्याने संशायाची दोरी बळकट बनत चालली आहे. आता यामध्ये काय तथ्य? हे तपासातूनच समोर येणार आहे.

काय म्हणतात अधिकारी?कर्मचारी आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. याची कल्पना दिली होती. पुरेसा फोर्सही होता. आरोपीला पकडण्यापुर्वीच त्यांनी हल्ला केल्याचे समजले. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. -सुरेश गंधमपोलीस निरीक्षक, धारूर

आम्ही चौकशीसाठी गेलो होतो. आरोपीलाही पकडले होते. परंतु जमावाने आमच्या हातून त्याला पळविले. उलट आमच्यावर हल्ला केला. तो आरोपी तिथे आहे, हे आम्हाला माहिती असते, तर जास्त फोर्स नेला असता. आमच्याकडे कमी फोर्स होता आणि ते लोक जास्त होते.-चंद्रकांत घोळवेपोलीस उपनिरीक्षक, धारूर