शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

दहावी परीक्षेबाबत उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

.... ढगाळ वातावरणाने उकाडा वाढला कडा : परिसरात गेल्या चार, पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाडा वाढला आहे. ...

....

ढगाळ वातावरणाने उकाडा वाढला

कडा : परिसरात गेल्या चार, पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाडा वाढला आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शेतीच्या मशागती पूर्ण झाल्या आहेत. हवामान विभागानेही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

....

धानोरा येथील पुलाची उंची वाढवा

धानोरा : नगर-जामखेड रस्त्यावरील धानोरा येथे कांबळी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. हा पूल आता जुनाट झाला आहे. पुलाचे कठडे तुटले आहेत. तरी या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

....

कढाणी प्रकल्पाचा दरवाजा खुला करा

धानोरा : आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे कढाणी प्रकल्पाचा नदीत पाणी सोडण्याचा दरवाजा उंदरखेल ग्रामस्थांनी बुजविला आहे. तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा दरवाजा खुला होता. त्यामुळे उन्हाळ्यात कांबळी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. परंतु, हा दरवाजा ग्रामस्थांनी सिमेंट टाकून बुजविला आहे. यामुळे तलावाखालील सुलेमान देवळा, हिवरा, पिंपरखेड या गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तरी या तलावाचा दरवाजा पाटबंधारे खात्याने खुला करावा, अशी मागणी तीन गावांतील ग्रामस्थांकडून होत आहे.

.....

भोजेवाडी-दादेगाव रस्त्याचे डांबरीकरण उखडले

धानोरा : दादेगाव-भोजेवाडी रस्त्याचे गेल्या दहा वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते. यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली होती. आता या रस्त्यावरील डांबरीकरण उखडले आहे. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तरी या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

.....

वाळू उपसा थांबवा

आष्टी : तालुक्यातील सीना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. सीना नदी नगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील महसूल यंत्रणेचे वाळू उपशाकडे दुर्लक्ष होते. यामुळे वर्षभर सीना नदीतून वाळू उपसा सुरू असतो. त्यामुळे वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी होत आहे.

....

रस्ता रुंदीकरणाची मागणी

बीड : नगर-बीड जामखेड मार्गे रस्ता रुंदीकरणाच्या अनेक वेळा घोषणा झाल्या. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम झाले नाही. इतर अनेक रस्ते चकचकीत झाले. या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ असूनही त्याचे रुंदीकरण झाले नाही. तरी या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

....

वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी

आष्टी : तालुक्यात कडा, धानोरा परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. शेतकऱ्यांनी फळबागा उभ्या केल्या आहेत. या बागांना पाणी देण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. यंदा पाणी असूनही वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. तरी वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.