शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:25 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या आठवड्यापासून दररोज पाऊस सुरूच आहे. प्रारंभीच्या काळातच समाधानकारक पाऊस पडल्याने पेरणीची तयारी सुरू झाली ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या आठवड्यापासून दररोज पाऊस सुरूच आहे. प्रारंभीच्या काळातच समाधानकारक पाऊस पडल्याने पेरणीची तयारी सुरू झाली आहे. तालुक्यातील शेतकरी बियाणे, रासायनिक खते व विविध प्रकारची शेतीची औजारे खरेदी करण्यासाठी मोंढ्यात गर्दी करू लागले आहेत.

व्यावसायिक अडचणीत

अंबाजोगाई : गेल्या दीड वर्षापासून लग्नसराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्यात जमा आहे. याशिवाय लॉजिंगही बंद आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने वसतिगृहेही ओस पडली आहेत. परिणामी, गाद्यांची मागणी कमालीची घटली असून, गादी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या गादी व्यावसायिकांना कुटुंबाचा चरितार्थ चालवणे अवघड झाल्याने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल पेडगावकर यांनी केली आहे.

धूम्रपानामुळे आजार

अंबाजोगाई : आहाराच्या बदलत्या सवयी, अमली पदार्थाचे मोठ्या प्रमाणात केले जाणारे सेवन, मद्यपान, धूम्रपानामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील बदलामुळे खाजगी रुग्णालयांमध्येही गर्दी वाढू लागली आहे. धूम्रपानावर बंदी असतानाही धूम्रपान करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. अशा प्रकारावर निर्बंध घालावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर देशपांडे यांनी केली आहे.

कर्जवसुली थांबवा

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ बंद आहे. सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यांतील महिला बचत गटांना बँकांनी दिलेली कर्जवसुली काही काळ थांबविण्यात यावी. या कालावधीतील व्याजही रद्द करावे, अशी मागणी नगरसेवक संतोष शिनगारे यांनी केली आहे.

ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांची दैना

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील विविध उपनगरांमध्ये अनेक बांधकामे सुरू आहेत. यासाठी खडी, वीट, वाळू, घेऊन येणाऱ्या ओव्हरलोड टिप्पर, ट्रॅक्टरमुळे रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे, तसेच या वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश दहातोंडे यांनी केली आहे.