शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

बीडमध्ये मॉर्निंग वाॅकला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:35 IST

कमी दाबाने पाणी बीड : शहरातील ईदगाह पाणी टाकी ते कनकालेश्वर मंदिर, नाळवंडी रोड, तेलगाव नाकापर्यंत मुख्य पाईपलाईनवर काही ...

कमी दाबाने पाणी

बीड : शहरातील ईदगाह पाणी टाकी ते कनकालेश्वर मंदिर, नाळवंडी रोड, तेलगाव नाकापर्यंत मुख्य पाईपलाईनवर काही नागरिकांनी नळजोडणी केली असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ही नळजोडणी बंद करावी, अशी मागणी नगरसेविका शेख बिसमिल्लाह आणि हाफीज अशफाक यांनी केली आहे.

ढगाळ वातावरणाने शेतकरी हवालदिल

बीड : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोमवारी बीड परिसरात भुरभुर झाली. हे वातावरण गहू, हरभरा या पिकांसाठी पोषक नसून, नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. ज्वारीच्या पिकावरही मावा, तसेच चिकटाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पथदिवे बंदच

वडवणी : शहरातील मुख्य भागातील तसेच गल्ली बोळातील काही भागात रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी चालणे अवघड होऊन बसले आहे. तसेच भुरट्या चोऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. पथदिवे सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वडवणी बसस्थानकात कचऱ्याचे ढिगारे

वडवणी : बसस्थानकाभोवती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. परिसरातील व्यापारी आणि नागरिक येथे कचरा आणून टाकत आहेत. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास येथील प्रवाशांना सहन करावा लागत आहे. स्वच्छतेची मागणी होत आहे.

तलाठी शोधण्याची वेळ

पाटोदा : तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयाच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणच्या इमारती अनेक महिन्यांपासून धूळ खात असून महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. तलाठी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या कामांचा खोळंबा होत आहे. सज्जावर तलाठ्यांना थांबण्याची सक्ती करण्याची मागणी होत आहे.