शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पिके अजूनही पाण्यात, काढणी खर्च काढायचा तरी कसा...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:37 IST

सलग दोन वर्षे दुष्काळाची गेली. खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे कसाबसा पार पडेल असे वाटले होते. पण परतीच्या पावसाने जे हाती आले तेही गमावावे लागले.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा कहर : अंबाजोगाई तालुक्यात ९ हजार हेक्टर क्षेत्रातील खरिपाच्या नुकसानीचा प्रथम अंदाज

अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : सलग दोन वर्षे दुष्काळाची गेली. खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे कसाबसा पार पडेल असे वाटले होते. पण परतीच्या पावसाने जे हाती आले तेही गमावावे लागले. होत्याचं नव्हतं झालं साहेब. माझ्या तीन एकर सोयाबीनमध्ये पाणी शिरले आहे. आता हे सोयाबीन काढायचे म्हणले तर प्रति बॅग एकरी ४ हजार रुपये खर्च येतो. केवळ काढणीसाठी १२ हजार रुपये लागतात. पुन्हा उगवलेले तण नष्ट करण्यासाठीचा खर्च वेगळा. अशा स्थितीत उत्पादन तर काहीच नाही. खर्च कसा काढायचा, अशी व्यथा पूस येथील शेतकरी त्रिंबक ज्ञानोबा कचरे यांनी मांडली. दरम्यान तालुक्यातील पूस शिवारात शेती करणारे प्रकाश चोरमले यांचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अडीच एकरातील सोयाबीनचे पीक हातचे गेले. कौटुंबिक अडचणींसह मुलीच्या लग्नाबाबत ते चिंतेत होते.अंबाजोगाई तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रस्तुत प्रतिनिधीने पूस येथे जाऊन पाहणी केली. सोयाबीनचा मोठा पेरा असणाºया या परिसरात आभाळच फाटल्याचे निदर्शनास आले. तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीपाणी झाले. अनेकांच्या सोयाबीनमध्ये पाणी घुसले. पिके पाण्यावर तरंगू लागली. काढून ठेवलेली बाजरी व पिवळ्याच्या ढिगाºयाला आता कोंबे फुटली आहेत. पाऊस उघडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक उन्हात वाळवायला ठेवले. मात्र, पुन्हा पाऊस आल्याने आहे ते ढिगारेही भिजून कुजून जाऊ लागले आहेत. सोमवारी तिसºया दिवशीही अनेक शेतकºयांच्या शेतामध्ये पाणी तसेच होते. सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसले. आता हे सोयाबीन काढायचे कसे? हा मोठा प्रश्न भेडसावू लागल्याचे नरसिंग जोशी यांनी सांगितले. परिसरातील शेतांमध्ये लावलेला कापूसही भिजला. कापसाच्या आलेल्या बोंडात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने ही बोंडे फुगून त्या आतील कापसाच्या वाती झाल्याचे सांगताना महेश गौरशेटे भावनिक झाले.तालुक्यात ३० हजार शेतकºयांनी नुकसान भरपाई संदर्भात अर्ज दाखल केल्याचे तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी लोकमतला सांगितले. पाऊस पडून तीन दिवस झाल्यानंतर सोमवारी पूस येथील तलाठी गावात पीकपाहणी व पंचनाम्यासाठी हजर झाले होते. तलाठ्यांना गराडा घालून आमची पाहणी करा अशी मागणी करत शेतकºयांनी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस