शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

पिके अजूनही पाण्यात, काढणी खर्च काढायचा तरी कसा...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:37 IST

सलग दोन वर्षे दुष्काळाची गेली. खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे कसाबसा पार पडेल असे वाटले होते. पण परतीच्या पावसाने जे हाती आले तेही गमावावे लागले.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा कहर : अंबाजोगाई तालुक्यात ९ हजार हेक्टर क्षेत्रातील खरिपाच्या नुकसानीचा प्रथम अंदाज

अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : सलग दोन वर्षे दुष्काळाची गेली. खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे कसाबसा पार पडेल असे वाटले होते. पण परतीच्या पावसाने जे हाती आले तेही गमावावे लागले. होत्याचं नव्हतं झालं साहेब. माझ्या तीन एकर सोयाबीनमध्ये पाणी शिरले आहे. आता हे सोयाबीन काढायचे म्हणले तर प्रति बॅग एकरी ४ हजार रुपये खर्च येतो. केवळ काढणीसाठी १२ हजार रुपये लागतात. पुन्हा उगवलेले तण नष्ट करण्यासाठीचा खर्च वेगळा. अशा स्थितीत उत्पादन तर काहीच नाही. खर्च कसा काढायचा, अशी व्यथा पूस येथील शेतकरी त्रिंबक ज्ञानोबा कचरे यांनी मांडली. दरम्यान तालुक्यातील पूस शिवारात शेती करणारे प्रकाश चोरमले यांचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अडीच एकरातील सोयाबीनचे पीक हातचे गेले. कौटुंबिक अडचणींसह मुलीच्या लग्नाबाबत ते चिंतेत होते.अंबाजोगाई तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रस्तुत प्रतिनिधीने पूस येथे जाऊन पाहणी केली. सोयाबीनचा मोठा पेरा असणाºया या परिसरात आभाळच फाटल्याचे निदर्शनास आले. तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीपाणी झाले. अनेकांच्या सोयाबीनमध्ये पाणी घुसले. पिके पाण्यावर तरंगू लागली. काढून ठेवलेली बाजरी व पिवळ्याच्या ढिगाºयाला आता कोंबे फुटली आहेत. पाऊस उघडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक उन्हात वाळवायला ठेवले. मात्र, पुन्हा पाऊस आल्याने आहे ते ढिगारेही भिजून कुजून जाऊ लागले आहेत. सोमवारी तिसºया दिवशीही अनेक शेतकºयांच्या शेतामध्ये पाणी तसेच होते. सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसले. आता हे सोयाबीन काढायचे कसे? हा मोठा प्रश्न भेडसावू लागल्याचे नरसिंग जोशी यांनी सांगितले. परिसरातील शेतांमध्ये लावलेला कापूसही भिजला. कापसाच्या आलेल्या बोंडात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने ही बोंडे फुगून त्या आतील कापसाच्या वाती झाल्याचे सांगताना महेश गौरशेटे भावनिक झाले.तालुक्यात ३० हजार शेतकºयांनी नुकसान भरपाई संदर्भात अर्ज दाखल केल्याचे तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी लोकमतला सांगितले. पाऊस पडून तीन दिवस झाल्यानंतर सोमवारी पूस येथील तलाठी गावात पीकपाहणी व पंचनाम्यासाठी हजर झाले होते. तलाठ्यांना गराडा घालून आमची पाहणी करा अशी मागणी करत शेतकºयांनी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस