शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पिके सडली, फळबागांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:40 IST

गेवराई : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून दहाही मंडळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी ...

गेवराई : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून दहाही मंडळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यात शेतकऱ्यांचे मूग, सोयाबीन, कापूस, बाजरी पावसाने सडून गेली. मोसंबी, डाळिंब, पपईच्या फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. जवळपास ९९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

...

पेरणीलायक क्षेत्र (हेक्टरमध्ये) - १ लाख ३८ हजार

पेरणी झालेले-१ लाख ८ हजार

फळबागा-१९००

नुकसानग्रस्त पिके-९९ हजार हेक्टर.

...

गेवराई, जातेगांव, मादळमोही, पाचेगाव, धोंडराई, रेवकी, तलवाडा, चकलांबा, उमापूर, गढी या दहाही मंडळात या महिन्यात १६८ मि.मी. पाऊस पडतो. मात्र या आठ दिवसात हा टप्पा ओलांडून सरासरीपेक्षा २८० मि.मी. पाऊस झाला आहे.

....

आम्ही यावर्षी आमच्या शेतात कापूस, तूर, सोयाबीन, मुगाची लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असल्याचे राजपिपंरी येथील शेतकरी देवीदास भोसले यांनी सांगितले.

.....

गेवराई तालुक्यात गेल्या आठ दिवसांच्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे नुकसान मोठे असल्याचे येथील तहसीलदार सचिन खाडे यांनी सांगितले.

080921\sakharam shinde_img-20210831-wa0091_14.jpg~080921\sakharam shinde_img-20210905-wa0038_14.jpg