शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

ढगाळ वातावरणामुळे ३ लाख ३३ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST

बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. याचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी व भाजीपाला पिकांवर होणार ...

बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. याचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी व भाजीपाला पिकांवर होणार असून, उत्पादनात घट होण्याची देखील शक्यता वर्तवली आहे. रब्बी हंगामातील ३ लाख ३३ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावर्षी चांगला पाऊस खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील पिके जोमात आली आहेत. मात्र, आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे याचा परिणाम रब्बी पिकांवर होत आहे. यामध्ये हरभरा, गहू व ज्वारी या पिकांवर मावा किडीचा प्रादुर्भाव तसेच घाटे अळ‌ी तसेच रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट देखील होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात जेणेकरून ढगाळ वातावरणामुळे पिकांवर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होईल तसेच विविध प्रकारची फवारणी करून ‌उपाययोजना केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे.

सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारी, हरभरा, गहू

रब्बी हंगामात यावर्षी ज्वारी १ लाख ५९ हजार ७६९ हेक्टरवर पेरा आहे. तर, त्याखालोखाल हरभरा १ लाख ३८ हजार ६७ हेक्टर तर, ३३ हजार हेक्टरवर गहू या पिकाचा पेरा करण्यात आला आहे. इतर क्षेत्रावर मका व भाजीपाला आहे.

या कराव्यात उपाययोजना

हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर, प्रत्येक रोपावर २ ते ३ आळ्या आढळल्यास नियंत्रण करणे गरजेचे आहे. यामध्ये ५ टक्के निंबोळी अर्क किंवा एन.पी.व्ही.२५० मिली प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, तसेच क्लोरोपायरिफॉस २० ईसी, क्विनॉफॉस २५ ईसी, इमामेक्टीन बेंजोएट ५ एसी यापैकी एका औषधाची फवारणी कृषी विभागाच्या सल्ल्याने करावी. मावा किडीच्या किंवा चिकटा नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० ईसी १.५ मिलि. प्रति लिटरपाणी याप्रमाणे फवारणी करावी अशी माहिती आष्टीचे तालुका कृषी अधिकारी आर.बी.सुपेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया

शेतकऱ्यांनी फवारणीचा सल्ला घेण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, त्यांना देखील शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर कोणी माहिती देण्यास टाळाटाळ केली तर त्यांची तक्रार कृषी अधीक्षक कार्यालयात करावी.

-सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (प्रभारी) बीड