शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

ढगाळ वातावरणामुळे ३ लाख ३३ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST

बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. याचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी व भाजीपाला पिकांवर होणार ...

बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. याचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी व भाजीपाला पिकांवर होणार असून, उत्पादनात घट होण्याची देखील शक्यता वर्तवली आहे. रब्बी हंगामातील ३ लाख ३३ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावर्षी चांगला पाऊस खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील पिके जोमात आली आहेत. मात्र, आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे याचा परिणाम रब्बी पिकांवर होत आहे. यामध्ये हरभरा, गहू व ज्वारी या पिकांवर मावा किडीचा प्रादुर्भाव तसेच घाटे अळ‌ी तसेच रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट देखील होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात जेणेकरून ढगाळ वातावरणामुळे पिकांवर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होईल तसेच विविध प्रकारची फवारणी करून ‌उपाययोजना केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे.

सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारी, हरभरा, गहू

रब्बी हंगामात यावर्षी ज्वारी १ लाख ५९ हजार ७६९ हेक्टरवर पेरा आहे. तर, त्याखालोखाल हरभरा १ लाख ३८ हजार ६७ हेक्टर तर, ३३ हजार हेक्टरवर गहू या पिकाचा पेरा करण्यात आला आहे. इतर क्षेत्रावर मका व भाजीपाला आहे.

या कराव्यात उपाययोजना

हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर, प्रत्येक रोपावर २ ते ३ आळ्या आढळल्यास नियंत्रण करणे गरजेचे आहे. यामध्ये ५ टक्के निंबोळी अर्क किंवा एन.पी.व्ही.२५० मिली प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, तसेच क्लोरोपायरिफॉस २० ईसी, क्विनॉफॉस २५ ईसी, इमामेक्टीन बेंजोएट ५ एसी यापैकी एका औषधाची फवारणी कृषी विभागाच्या सल्ल्याने करावी. मावा किडीच्या किंवा चिकटा नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० ईसी १.५ मिलि. प्रति लिटरपाणी याप्रमाणे फवारणी करावी अशी माहिती आष्टीचे तालुका कृषी अधिकारी आर.बी.सुपेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया

शेतकऱ्यांनी फवारणीचा सल्ला घेण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, त्यांना देखील शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर कोणी माहिती देण्यास टाळाटाळ केली तर त्यांची तक्रार कृषी अधीक्षक कार्यालयात करावी.

-सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (प्रभारी) बीड