शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:24 IST

अंबाजोगाई : सध्या कोरोना संकटामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला असून, खरीप आणि रब्बी हंगाम अतिवृष्टीमुळे हाती लागला नाही. ...

अंबाजोगाई :

सध्या कोरोना संकटामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला असून, खरीप आणि रब्बी हंगाम अतिवृष्टीमुळे हाती लागला नाही. सोयाबीन धानाला सोन्याचा भाव असला तरी यंदा शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी विमा भरलेला असून, तो तत्काळ मंजूर करून वाटप करावा, अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.

जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नावर लक्ष घालण्याची गरज आहे. पंकजा मुंडे या पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पीक विमा आला, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली आहे.

कोरोना संकटाचा काळ असून, लॉकडाऊनमुळे सर्व व्यवस्थाही ठप्प आहे. मागच्या वर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणापर झाली. परिणामी, खरिपाची पिके हाती लागली नाहीत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विमा भरलेला आहे. रब्बी पिकेसुद्धा अवकाळी वादळात सापडली, एकूणच काय तर शेतकरी मेटाकुटीला आला असून, विमा जर लवकर वाटप झाला तर अशा संकटात मदत झाल्याशिवाय राहणार नाही. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार असताना आणि पंकजा मुंडे या पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यासाठी नाही म्हटले तरी दरवर्षी किमान ९०० कोटींपेक्षा जास्त विमा पदरात पडला; मात्र आज एक वर्ष झाले तरी विम्याची साधी दमडीही शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नावर विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. बीडचे जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नावर तत्काळ लक्ष घालावे आणि विमा वाटप करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राम कुलकर्णी यांनी केली आहे.