शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

पीक विमा कंपनीला मोठा नफा, शेतकऱ्यांना मिळू शकतात हेक्टरी १० हजार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ‘बीड पॅटर्न’अंतर्गत जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव : राज्य शासनाने मंजुरी दिली तर, मिळणार हेक्टरी १० हजारांची मदत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

‘बीड पॅटर्न’अंतर्गत जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव : राज्य शासनाने मंजुरी दिली तर, मिळणार हेक्टरी १० हजारांची मदत

बीड : पीक विम्यासाठीच्या ‘बीड पॅटर्न’ ची राज्यभरात चर्चा झालेली असतानाच आता या संदर्भातील विविध पत्रांच्या आधारे पीक विमा कंपनीला मागील हंगामात झालेल्या नफ्यातून सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केल्याची सूत्रांची माहिती आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केल्यास मागील वर्षी पीक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी १० हजाराची मदत मिळू शकते.

बीड जिल्ह्यात मागील वर्षी (२०२०-२१ ) तब्बल १७ लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यापोटी शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा हिस्सा मिळून ७९८ कोटी पीक विमा कंपनीला भरला होता. मागील हंगामात कंपनीने केवळ १७ हजार शेतकऱ्यांना साडे तेरा कोटी नुकसान भरपाई वाटप केली. म्हणजे एका अर्थाने ७८५ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. यातील २० टक्के म्हणजे १६० कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली तरी ६२५ कोटी शिल्लक राहणार आहे. ही रक्कम एका अर्थाने नफा असून, ती रक्कम शासनाकडे जमा होणार आहे. या रकमेतून ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी विमा भरला होता त्यांना सरसकट मदत केली जावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येत आहे. यासंदर्भात अधिकृतपणे बोलण्यास प्रशासनातील अधिकारी तयार नाहीत. मात्र असा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

---

असा आहे बीड पीक विमा पॅटर्न

बीड जिल्ह्यात पीक विमा स्वीकारण्यास खाजगी कंपन्या तयार होत नसल्याने राज्य सरकारने विशेष असा ‘बीड पॅटर्न’ तयार केला होता. त्यानुसार विमा कंपनीला द्यावी लागणारी नुकसान भरपाई ११० टक्के पेक्षा अधिक असेल तर, वरची रक्कम राज्य सरकार देईल आणि सदर नुकसान भरपाई ८० टक्के पेक्षा कमी असेल तर, कंपनीला खर्चापोटी २० टक्के रक्कम देऊन उर्वरित रक्कम राज्य सरकार घेईल असा बीड पॅटर्न ठरविण्यात आला होता.

---

‘लोकमत’ने फोडली होती वाचा

पीक विमा कंपनीकडे भरण्यात आलेली रक्कम ही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा आहे. त्यामुळे झालेला नफा हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरावा अशा स्वरूपाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.

शासनाकडे ६२५.४ कोटी रुपये शिल्लक

शेतकरी, राज्य व केंद्र सरकार मिळून विमा कंपनीकडे ७९८. ५८ कोटी रुपये भरणा केला होता. यापैकी २०२० खरीप हंगामात शेतकऱ्यांना १३ कोटी ४७ लाखाची मदत दिली आहे. त्यामुळे शिल्लक रक्कम ७८५. ११ कोटी इतकी असून, बीड पॅटर्ननुसार २० टक्के कंपनी नफा १५९. ७१ कोटी इतका झाला असून, शासनाकडे असलेली शिल्लक रक्कम ६२५.४ कोटी इतकी आहे.

090921\09_2_bed_10_09092021_14.jpg

लोकमत  प्रसिद्ध केलेले वृत्त